शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

महाबळेश्वर सर्वसाधारण सभेतच पेपरलेसला ‘खो’-पर्यावरणप्रेमींतून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:30 IST

महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो

ठळक मुद्दे३५ ठरावांसाठी १०० पानांचे संच प्रत्येक नगरसेवकाला दिले

महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो दिल्याचे दिसून येते. पालिकेच्या सर्व नगरसेवकांना ३५ ठरावांचे शंभर पानी संच दिले आहेत.महाबळेश्वर नगरपरिषद ही ‘क’ वर्गातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका आहे. या पालिकेत मुख्याधिकारी, लोकनियुक्त सतरा व दोन स्वीकृत असे १९ नगरसेवक शहराच्या कारभार नियोजनासाठी आहेत. प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी १९ नगरसेवकांना सर्वसाधारण सभेत होणाऱ्या विषयांचा संच व त्यासोबत मुख्याधिकारी यांचा अभिप्राय असा संच त्यांना पाठविण्यात येतो. त्याचबरोबर हा संच त्यांना त्यांच्या कार्यालयात, घरी किंवा त्यांच्या अभ्यासासाठी देण्यात येतो.त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या दिवशी प्रत्यक्ष पालिकेच्या सभागृहात असाच संच प्रत्येकाला सभागृहात चर्चेसाठी देण्यात येतो. दरवेळी सुमारे १० ते १५ पानांमध्ये सर्वसाधारण सभेचा अजेंडा व अभिप्रायाचा संच असतो; परंतु नवीन आराखड्यानुसार नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ३५ विषयांसाठी सुमारे शंभर पानांचा संच प्रत्येक नगरसेवकाला देण्यात आला.वास्तविक प्रत्येक नगरसेवकाला सर्वसाधारण सभेचा अजेंडा व अभिप्रायाचे दोन संच, मुख्याधिकारी यांच्याकडे एक संच असे एकूण २० जणांसाठी प्रत्येकी शंभर याप्रमाणे किमान दोन हजार पानांचा किमान वापर एका सर्वसाधारण सभेत होत आहे.त्याचबरोबर सभेत झालेल्या निर्णय प्रक्रियेसाठी ठराव करताना वापरण्यात येणारी पाने असे प्रत्येक सर्वसाधारण सभेत किमान दहा हजार पानांचा वापर होत आहे. संपूर्ण जगात झाडे वाचविण्याच्या उद्देशाने पेपरलेसकडे वाटचाल सुरू आहे. येथे मात्र कागद व शाईचा वारेमाप वापर होत आहे. यामुळे येथील पर्यावरणाचे एक प्रकारे नुकसानच होत आहे.सोळा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेमधून सुरुवातीला पालिकेचे अनावश्यक खर्च वाचविण्यासाठी चांगले निर्णय राबविण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. त्यामध्ये मुख्यत्वे सर्वसाधारण सभेमध्ये व पालिकेत प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या हद्दपार करण्याचा महत्त्वाचा निर्णयाचे कौतुक शहरातून झाले होते. शहरातील स्वच्छतेसाठी जोरदार प्रयत्न पालिकेने केले आहेत. ही दोन्ही कामे शहरातून चर्चेचे विषय ठरले आहेत. परंतु पालिकेतील अनावश्यक कागदांच्या वापरावरही निश्चित धोरण ठरवून निर्णय घेणे आवश्यक आहे.एकीकडे सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये पेपरलेस करण्याचा शासनाचे धोरण असताना दुसरीकडे मात्र, पेपरचाच वापर होत असल्याचे दिसून येत आहे. पेपरसाठी होणारा आवाढव्य खर्च पालिका प्रशासनाने टाळणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.डिजिटलचा पर्याय आवश्यकसध्या स्मार्टफोनचा वापर हा सतत होताना दिसतो. डिजिटल युगामध्ये आजच्या मितीला कागदाऐवजी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सभागृहात प्रोजेक्टरच्या माध्यमातून देखील चर्चा करणे सोयीचे आहे. स्मार्टफोनवर प्रत्येकाला फाईल उपलब्ध करून दिल्यास तो नगरसेवकांना व इतरांनाही सोयीचा पर्याय होऊ शकते. यामुळे पालिकेच्या स्टेशनरीच्या खर्चात मोठी बचत करता येऊ शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण