शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

महाबळेश्वर सर्वसाधारण सभेतच पेपरलेसला ‘खो’-पर्यावरणप्रेमींतून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:30 IST

महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो

ठळक मुद्दे३५ ठरावांसाठी १०० पानांचे संच प्रत्येक नगरसेवकाला दिले

महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो दिल्याचे दिसून येते. पालिकेच्या सर्व नगरसेवकांना ३५ ठरावांचे शंभर पानी संच दिले आहेत.महाबळेश्वर नगरपरिषद ही ‘क’ वर्गातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका आहे. या पालिकेत मुख्याधिकारी, लोकनियुक्त सतरा व दोन स्वीकृत असे १९ नगरसेवक शहराच्या कारभार नियोजनासाठी आहेत. प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी १९ नगरसेवकांना सर्वसाधारण सभेत होणाऱ्या विषयांचा संच व त्यासोबत मुख्याधिकारी यांचा अभिप्राय असा संच त्यांना पाठविण्यात येतो. त्याचबरोबर हा संच त्यांना त्यांच्या कार्यालयात, घरी किंवा त्यांच्या अभ्यासासाठी देण्यात येतो.त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या दिवशी प्रत्यक्ष पालिकेच्या सभागृहात असाच संच प्रत्येकाला सभागृहात चर्चेसाठी देण्यात येतो. दरवेळी सुमारे १० ते १५ पानांमध्ये सर्वसाधारण सभेचा अजेंडा व अभिप्रायाचा संच असतो; परंतु नवीन आराखड्यानुसार नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ३५ विषयांसाठी सुमारे शंभर पानांचा संच प्रत्येक नगरसेवकाला देण्यात आला.वास्तविक प्रत्येक नगरसेवकाला सर्वसाधारण सभेचा अजेंडा व अभिप्रायाचे दोन संच, मुख्याधिकारी यांच्याकडे एक संच असे एकूण २० जणांसाठी प्रत्येकी शंभर याप्रमाणे किमान दोन हजार पानांचा किमान वापर एका सर्वसाधारण सभेत होत आहे.त्याचबरोबर सभेत झालेल्या निर्णय प्रक्रियेसाठी ठराव करताना वापरण्यात येणारी पाने असे प्रत्येक सर्वसाधारण सभेत किमान दहा हजार पानांचा वापर होत आहे. संपूर्ण जगात झाडे वाचविण्याच्या उद्देशाने पेपरलेसकडे वाटचाल सुरू आहे. येथे मात्र कागद व शाईचा वारेमाप वापर होत आहे. यामुळे येथील पर्यावरणाचे एक प्रकारे नुकसानच होत आहे.सोळा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेमधून सुरुवातीला पालिकेचे अनावश्यक खर्च वाचविण्यासाठी चांगले निर्णय राबविण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. त्यामध्ये मुख्यत्वे सर्वसाधारण सभेमध्ये व पालिकेत प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या हद्दपार करण्याचा महत्त्वाचा निर्णयाचे कौतुक शहरातून झाले होते. शहरातील स्वच्छतेसाठी जोरदार प्रयत्न पालिकेने केले आहेत. ही दोन्ही कामे शहरातून चर्चेचे विषय ठरले आहेत. परंतु पालिकेतील अनावश्यक कागदांच्या वापरावरही निश्चित धोरण ठरवून निर्णय घेणे आवश्यक आहे.एकीकडे सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये पेपरलेस करण्याचा शासनाचे धोरण असताना दुसरीकडे मात्र, पेपरचाच वापर होत असल्याचे दिसून येत आहे. पेपरसाठी होणारा आवाढव्य खर्च पालिका प्रशासनाने टाळणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.डिजिटलचा पर्याय आवश्यकसध्या स्मार्टफोनचा वापर हा सतत होताना दिसतो. डिजिटल युगामध्ये आजच्या मितीला कागदाऐवजी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सभागृहात प्रोजेक्टरच्या माध्यमातून देखील चर्चा करणे सोयीचे आहे. स्मार्टफोनवर प्रत्येकाला फाईल उपलब्ध करून दिल्यास तो नगरसेवकांना व इतरांनाही सोयीचा पर्याय होऊ शकते. यामुळे पालिकेच्या स्टेशनरीच्या खर्चात मोठी बचत करता येऊ शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण