शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर सर्वसाधारण सभेतच पेपरलेसला ‘खो’-पर्यावरणप्रेमींतून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:30 IST

महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो

ठळक मुद्दे३५ ठरावांसाठी १०० पानांचे संच प्रत्येक नगरसेवकाला दिले

महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो दिल्याचे दिसून येते. पालिकेच्या सर्व नगरसेवकांना ३५ ठरावांचे शंभर पानी संच दिले आहेत.महाबळेश्वर नगरपरिषद ही ‘क’ वर्गातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका आहे. या पालिकेत मुख्याधिकारी, लोकनियुक्त सतरा व दोन स्वीकृत असे १९ नगरसेवक शहराच्या कारभार नियोजनासाठी आहेत. प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी १९ नगरसेवकांना सर्वसाधारण सभेत होणाऱ्या विषयांचा संच व त्यासोबत मुख्याधिकारी यांचा अभिप्राय असा संच त्यांना पाठविण्यात येतो. त्याचबरोबर हा संच त्यांना त्यांच्या कार्यालयात, घरी किंवा त्यांच्या अभ्यासासाठी देण्यात येतो.त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या दिवशी प्रत्यक्ष पालिकेच्या सभागृहात असाच संच प्रत्येकाला सभागृहात चर्चेसाठी देण्यात येतो. दरवेळी सुमारे १० ते १५ पानांमध्ये सर्वसाधारण सभेचा अजेंडा व अभिप्रायाचा संच असतो; परंतु नवीन आराखड्यानुसार नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ३५ विषयांसाठी सुमारे शंभर पानांचा संच प्रत्येक नगरसेवकाला देण्यात आला.वास्तविक प्रत्येक नगरसेवकाला सर्वसाधारण सभेचा अजेंडा व अभिप्रायाचे दोन संच, मुख्याधिकारी यांच्याकडे एक संच असे एकूण २० जणांसाठी प्रत्येकी शंभर याप्रमाणे किमान दोन हजार पानांचा किमान वापर एका सर्वसाधारण सभेत होत आहे.त्याचबरोबर सभेत झालेल्या निर्णय प्रक्रियेसाठी ठराव करताना वापरण्यात येणारी पाने असे प्रत्येक सर्वसाधारण सभेत किमान दहा हजार पानांचा वापर होत आहे. संपूर्ण जगात झाडे वाचविण्याच्या उद्देशाने पेपरलेसकडे वाटचाल सुरू आहे. येथे मात्र कागद व शाईचा वारेमाप वापर होत आहे. यामुळे येथील पर्यावरणाचे एक प्रकारे नुकसानच होत आहे.सोळा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेमधून सुरुवातीला पालिकेचे अनावश्यक खर्च वाचविण्यासाठी चांगले निर्णय राबविण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. त्यामध्ये मुख्यत्वे सर्वसाधारण सभेमध्ये व पालिकेत प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या हद्दपार करण्याचा महत्त्वाचा निर्णयाचे कौतुक शहरातून झाले होते. शहरातील स्वच्छतेसाठी जोरदार प्रयत्न पालिकेने केले आहेत. ही दोन्ही कामे शहरातून चर्चेचे विषय ठरले आहेत. परंतु पालिकेतील अनावश्यक कागदांच्या वापरावरही निश्चित धोरण ठरवून निर्णय घेणे आवश्यक आहे.एकीकडे सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये पेपरलेस करण्याचा शासनाचे धोरण असताना दुसरीकडे मात्र, पेपरचाच वापर होत असल्याचे दिसून येत आहे. पेपरसाठी होणारा आवाढव्य खर्च पालिका प्रशासनाने टाळणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.डिजिटलचा पर्याय आवश्यकसध्या स्मार्टफोनचा वापर हा सतत होताना दिसतो. डिजिटल युगामध्ये आजच्या मितीला कागदाऐवजी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सभागृहात प्रोजेक्टरच्या माध्यमातून देखील चर्चा करणे सोयीचे आहे. स्मार्टफोनवर प्रत्येकाला फाईल उपलब्ध करून दिल्यास तो नगरसेवकांना व इतरांनाही सोयीचा पर्याय होऊ शकते. यामुळे पालिकेच्या स्टेशनरीच्या खर्चात मोठी बचत करता येऊ शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण