शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त 

By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 17:26 IST

शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान

कऱ्हाड : बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने कृष्णाकाठावर धुमाकूळ घातला असून बेलवडेतील वीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. कित्येक मीटर लांबीच्या वायर चोरट्यांनी चोरल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कृष्णा नदीकाठावर असलेल्या वीज पंपांची वायर चोरून नेण्याच्या घटना सध्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. बेलवडे हवेली येथे गत पाच दिवसांत चोरट्यांनी नदीकाठच्या तब्बल वीसहून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल रात्री कापून चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेलवडे हवेली गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीतूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजना करून शेतीसाठी पाणी नेले आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्याचा विद्युत पंप नदीवर आहे. प्रत्येक वर्षी नदीला पूर येत असल्यामुळे नदीपासून सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर प्रत्येकाने विद्युत पेटी बसवली आहे. त्या विद्युत पेटीपासून नदीपर्यंत केबल टाकत पंपाला वीज पुरवठा करण्यात आला आहे. वीज केबलमध्ये तांबे धातू असतो. आणि त्या धातूला बाजारात चांगली किंमत मिळते. त्यामुळे या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.वीज पंपाच्या केबल चोरीस गेल्यामुळे उन्हाळ्यात शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वारंवार होणाऱ्या चोरीमुळे मोठे नुकसान होत आहे. तळबीड पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, ऐन उन्हाळ्यातच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. आर्थिक नुकसानीबरोबरच विद्युत पंप बंद राहत असल्यामुळे पाण्याअभावी पिके वाया जाण्याचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसानबेलवडे हवेलीत गत काही दिवसांपासून केबल कापून चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी तर एकाच रात्री दहा ते बारा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला जोडलेल्या केबल रात्रीच्या वेळी कापून चोरून नेण्यात आल्या आहेत. नारायण पवार, माजी सभापती दाजी पवार, संग्राम पवार, दत्तात्रय पवार, अंकुश पवार, मारुती पवार, विजयसिंह पाटील, रमेश पाटील, संग्राम पवार यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरीला गेल्या आहेत. त्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीelectricityवीजtheftचोरी