शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त 

By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 17:26 IST

शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान

कऱ्हाड : बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने कृष्णाकाठावर धुमाकूळ घातला असून बेलवडेतील वीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. कित्येक मीटर लांबीच्या वायर चोरट्यांनी चोरल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कृष्णा नदीकाठावर असलेल्या वीज पंपांची वायर चोरून नेण्याच्या घटना सध्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. बेलवडे हवेली येथे गत पाच दिवसांत चोरट्यांनी नदीकाठच्या तब्बल वीसहून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल रात्री कापून चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेलवडे हवेली गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीतूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजना करून शेतीसाठी पाणी नेले आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्याचा विद्युत पंप नदीवर आहे. प्रत्येक वर्षी नदीला पूर येत असल्यामुळे नदीपासून सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर प्रत्येकाने विद्युत पेटी बसवली आहे. त्या विद्युत पेटीपासून नदीपर्यंत केबल टाकत पंपाला वीज पुरवठा करण्यात आला आहे. वीज केबलमध्ये तांबे धातू असतो. आणि त्या धातूला बाजारात चांगली किंमत मिळते. त्यामुळे या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.वीज पंपाच्या केबल चोरीस गेल्यामुळे उन्हाळ्यात शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वारंवार होणाऱ्या चोरीमुळे मोठे नुकसान होत आहे. तळबीड पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, ऐन उन्हाळ्यातच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. आर्थिक नुकसानीबरोबरच विद्युत पंप बंद राहत असल्यामुळे पाण्याअभावी पिके वाया जाण्याचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसानबेलवडे हवेलीत गत काही दिवसांपासून केबल कापून चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी तर एकाच रात्री दहा ते बारा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला जोडलेल्या केबल रात्रीच्या वेळी कापून चोरून नेण्यात आल्या आहेत. नारायण पवार, माजी सभापती दाजी पवार, संग्राम पवार, दत्तात्रय पवार, अंकुश पवार, मारुती पवार, विजयसिंह पाटील, रमेश पाटील, संग्राम पवार यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरीला गेल्या आहेत. त्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीelectricityवीजtheftचोरी