शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त 

By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 17:26 IST

शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान

कऱ्हाड : बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने कृष्णाकाठावर धुमाकूळ घातला असून बेलवडेतील वीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. कित्येक मीटर लांबीच्या वायर चोरट्यांनी चोरल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कृष्णा नदीकाठावर असलेल्या वीज पंपांची वायर चोरून नेण्याच्या घटना सध्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. बेलवडे हवेली येथे गत पाच दिवसांत चोरट्यांनी नदीकाठच्या तब्बल वीसहून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल रात्री कापून चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेलवडे हवेली गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीतूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजना करून शेतीसाठी पाणी नेले आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्याचा विद्युत पंप नदीवर आहे. प्रत्येक वर्षी नदीला पूर येत असल्यामुळे नदीपासून सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर प्रत्येकाने विद्युत पेटी बसवली आहे. त्या विद्युत पेटीपासून नदीपर्यंत केबल टाकत पंपाला वीज पुरवठा करण्यात आला आहे. वीज केबलमध्ये तांबे धातू असतो. आणि त्या धातूला बाजारात चांगली किंमत मिळते. त्यामुळे या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.वीज पंपाच्या केबल चोरीस गेल्यामुळे उन्हाळ्यात शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वारंवार होणाऱ्या चोरीमुळे मोठे नुकसान होत आहे. तळबीड पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, ऐन उन्हाळ्यातच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. आर्थिक नुकसानीबरोबरच विद्युत पंप बंद राहत असल्यामुळे पाण्याअभावी पिके वाया जाण्याचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसानबेलवडे हवेलीत गत काही दिवसांपासून केबल कापून चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी तर एकाच रात्री दहा ते बारा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला जोडलेल्या केबल रात्रीच्या वेळी कापून चोरून नेण्यात आल्या आहेत. नारायण पवार, माजी सभापती दाजी पवार, संग्राम पवार, दत्तात्रय पवार, अंकुश पवार, मारुती पवार, विजयसिंह पाटील, रमेश पाटील, संग्राम पवार यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरीला गेल्या आहेत. त्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीelectricityवीजtheftचोरी