शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

किसनवीर मध्ये साखर उत्पादन खर्चाचे गाैडबंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:23 IST

सातारा : किसनवीर साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालात साखरेचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च २८०८ रुपये दिसत असून, तो अन्य कारखान्यांच्या ...

सातारा : किसनवीर साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालात साखरेचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च २८०८ रुपये दिसत असून, तो अन्य कारखान्यांच्या तुलनेत दुप्पट-अडीचपट इतका प्रचंड आहे. कारखान्याचा साखर उतारा इतर कारखान्यांच्या तुलनेत पाच वर्षांपासून सतत कमी आहे. यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल कारखान्याच्या सभासदांनी उपस्थित केला आहे.

कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर सभासदांना प्राप्त झालेल्या आर्थिक अहवालावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, यासंदर्भात ज्येष्ठ सभासद बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे, धर्मराज जगदाळे आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या ३१ मार्च २०२० च्या अहवालानुसार कारखान्यावर कर्ज व देणे असा एकूण ८५८ कोटी रुपयांचा बोजा दिसत आहे. या अहवालात कारखान्याला एकूण १७४ कोटी रुपयांचा तोटा दिसत आहे. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत कारखान्याची पुढील वाटचाल कशी राहणार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखाचे दिवस कधी येणार, अशी विचारणा सभासदांनी केली आहे. यावर्षी चालू हंगामात २३ मार्चपर्यंत साखर उतारा सरासरी ९.२० इतका कमी आहे. उतारा इतका कमी येण्याचे ( की दाखवण्याचे..? ) गौड बंगाल नेमके काय? .., साखर उतारा जाणीवपूर्वक कमी दाखवल्याने ऊसदर कमी देता येतो आणि बेहिशेबी साखरही तयार करता येते आणि तशी ती होत आहे काय, असा संशय सर्वदूर दृढ होऊ लागला आहे.

‘कोरोना’मुळे स्थगित झालेली ही सभा आता जवळपास एक वर्षाच्या अंतराने होत आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षही संपले. अहवालात जर गत आर्थिक वर्षातील डोळे पांढरे करणारी ही आकडेवारी असेल, तर चालू आर्थिक वर्षात विद्यमान संचालकांनी फार मोठा उजेड पाडला नसणारच. उलट अधिकचा अंधार असेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

कामगारांना पगारापोटी मार्च २०२० अखेर सतरा कोटी रुपये देणे दिसत आहे. त्यांना गेल्या चार वर्षांपासून बोनसही मिळालेला नाही. त्यांच्या 'पीएफ' ची रक्कमही वेळेवर भरली जात नाही. चार-पाच हंगामात साखर उतारा जाणीवपूर्वक कमी दाखवून ऊस उत्पादकांना एफआरपी रक्कम इतर कारखान्यांच्या तुलनेत प्रतिटन सरासरी तीनशे ते पाचशे रुपये कमी देऊन उत्पादकांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. तसेच गेल्या दोन अहवालात दिसत असलेली २६ कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम भाग अनामत म्हणून दाखवली जात आहे. एवढी मोठी रक्कम अनामत ठेवणारे शेतकरी नेमके कोण आहेत व त्यांना सभासद का करणे जात नाही, की ही सगळी रक्कम निनावी-पोकळ आहेत, याचा खुलासा होण्याची गरज आहे. वार्षिक सभेत विषय क्रमांक ८ नुसार 'किसन वीर' ने भागीदारीत उभा केलेला खंडाळा कारखाना अन्य कुणाला चालवण्यास देण्याचा विषय उपस्थित होणार आहे. आपण जवळपास १०० कोटी रुपये गुंतवलेला भागीदारीतील हा कारखाना सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज असताना आता तो 'तिसऱ्याला' देण्याचा घाट कशासाठी घातला जातोय, याबद्दल विचारणा केली आहे. प्रतापगड कारखान्यातही आपण जवळपास ८० कोटी रुपये गुंतवले आहेत. गेल्या आठ वर्षांतील गेली सलग दोन वर्षे हा कारखाना बंद आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापगडबाबत व्यवस्थापनाचे नेमके काय धोरण असेल, अशी

विचारणाही या सभासदांनी केली आहे.

चौकट..

अल्कोहोल विक्रीतही लपवालपवी

अल्कोहोल निर्मितीची क्षमता प्रतिदिन एक लाख लिटर वाढवण्यात आली. कर्ज काढून विस्तारित केलेल्या या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने उत्पादन झालेले दिसत नसून, अल्कोहोल आदी उपपदार्थ विक्रीचा सरासरी विक्रीदर अहवालात कोठेच नमूद दिसत नाही. ही लपवालपवी व्यवस्थापनाच्या कारभाराबद्दल आमच्या मनात संशय निर्माण करणारी असल्याचे नमूद केले आहे.