शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

किसनवीर मध्ये साखर उत्पादन खर्चाचे गाैडबंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:23 IST

सातारा : किसनवीर साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालात साखरेचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च २८०८ रुपये दिसत असून, तो अन्य कारखान्यांच्या ...

सातारा : किसनवीर साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालात साखरेचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च २८०८ रुपये दिसत असून, तो अन्य कारखान्यांच्या तुलनेत दुप्पट-अडीचपट इतका प्रचंड आहे. कारखान्याचा साखर उतारा इतर कारखान्यांच्या तुलनेत पाच वर्षांपासून सतत कमी आहे. यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल कारखान्याच्या सभासदांनी उपस्थित केला आहे.

कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर सभासदांना प्राप्त झालेल्या आर्थिक अहवालावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, यासंदर्भात ज्येष्ठ सभासद बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे, धर्मराज जगदाळे आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या ३१ मार्च २०२० च्या अहवालानुसार कारखान्यावर कर्ज व देणे असा एकूण ८५८ कोटी रुपयांचा बोजा दिसत आहे. या अहवालात कारखान्याला एकूण १७४ कोटी रुपयांचा तोटा दिसत आहे. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत कारखान्याची पुढील वाटचाल कशी राहणार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखाचे दिवस कधी येणार, अशी विचारणा सभासदांनी केली आहे. यावर्षी चालू हंगामात २३ मार्चपर्यंत साखर उतारा सरासरी ९.२० इतका कमी आहे. उतारा इतका कमी येण्याचे ( की दाखवण्याचे..? ) गौड बंगाल नेमके काय? .., साखर उतारा जाणीवपूर्वक कमी दाखवल्याने ऊसदर कमी देता येतो आणि बेहिशेबी साखरही तयार करता येते आणि तशी ती होत आहे काय, असा संशय सर्वदूर दृढ होऊ लागला आहे.

‘कोरोना’मुळे स्थगित झालेली ही सभा आता जवळपास एक वर्षाच्या अंतराने होत आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षही संपले. अहवालात जर गत आर्थिक वर्षातील डोळे पांढरे करणारी ही आकडेवारी असेल, तर चालू आर्थिक वर्षात विद्यमान संचालकांनी फार मोठा उजेड पाडला नसणारच. उलट अधिकचा अंधार असेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

कामगारांना पगारापोटी मार्च २०२० अखेर सतरा कोटी रुपये देणे दिसत आहे. त्यांना गेल्या चार वर्षांपासून बोनसही मिळालेला नाही. त्यांच्या 'पीएफ' ची रक्कमही वेळेवर भरली जात नाही. चार-पाच हंगामात साखर उतारा जाणीवपूर्वक कमी दाखवून ऊस उत्पादकांना एफआरपी रक्कम इतर कारखान्यांच्या तुलनेत प्रतिटन सरासरी तीनशे ते पाचशे रुपये कमी देऊन उत्पादकांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. तसेच गेल्या दोन अहवालात दिसत असलेली २६ कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम भाग अनामत म्हणून दाखवली जात आहे. एवढी मोठी रक्कम अनामत ठेवणारे शेतकरी नेमके कोण आहेत व त्यांना सभासद का करणे जात नाही, की ही सगळी रक्कम निनावी-पोकळ आहेत, याचा खुलासा होण्याची गरज आहे. वार्षिक सभेत विषय क्रमांक ८ नुसार 'किसन वीर' ने भागीदारीत उभा केलेला खंडाळा कारखाना अन्य कुणाला चालवण्यास देण्याचा विषय उपस्थित होणार आहे. आपण जवळपास १०० कोटी रुपये गुंतवलेला भागीदारीतील हा कारखाना सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज असताना आता तो 'तिसऱ्याला' देण्याचा घाट कशासाठी घातला जातोय, याबद्दल विचारणा केली आहे. प्रतापगड कारखान्यातही आपण जवळपास ८० कोटी रुपये गुंतवले आहेत. गेल्या आठ वर्षांतील गेली सलग दोन वर्षे हा कारखाना बंद आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापगडबाबत व्यवस्थापनाचे नेमके काय धोरण असेल, अशी

विचारणाही या सभासदांनी केली आहे.

चौकट..

अल्कोहोल विक्रीतही लपवालपवी

अल्कोहोल निर्मितीची क्षमता प्रतिदिन एक लाख लिटर वाढवण्यात आली. कर्ज काढून विस्तारित केलेल्या या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने उत्पादन झालेले दिसत नसून, अल्कोहोल आदी उपपदार्थ विक्रीचा सरासरी विक्रीदर अहवालात कोठेच नमूद दिसत नाही. ही लपवालपवी व्यवस्थापनाच्या कारभाराबद्दल आमच्या मनात संशय निर्माण करणारी असल्याचे नमूद केले आहे.