शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जनतेच्या करातून शिक्षणासाठी दिला जाणारा निधी--विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 8:33 PM

सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात.

ठळक मुद्देराज्यातील पुढची पिढी घडविण्याची गुंतवणूक असल्याचे केले प्रतिपादनशिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही बोर्डांचा पॅटर्न आपल्यापेक्षा कसा वेगळा असून, आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा करतो?

सातारा : ‘शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आपला पती शहीद झाल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तडफ दाखवितात. आणि सैन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट होतात. त्या स्वाती महाडिकांचा उभ्या महाराष्ट्राला अभिमान असून, खरेतर त्यांच्या दोन्ही मुलांना तुम्ही विद्यार्थ्यांनी अभिनंदनाचं पत्र आपण होऊन पाठवायला हवे,’ असे उद्गार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी मंचावर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पतंगराव कदम, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत,भाजपचेजिल्हाध्यक्षविक्रमपावसकरउपस्थित होते.

‘राज्यातील कराच्या रूपातून मिळणाºया प्रत्येकी २ रुपये ४० पैशांपैकी ५७ पैसे आपण राज्यातील शिक्षणासाठी देतो. हा निधी म्हणजे खर्च नसून गुंतवणूक आहे,’ असे सांगून विनोद तावडे म्हणाले, ‘ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवत्ता एकाच मापात मोजता येणार नाही. त्यासाठी आपली परीक्षापद्धती जी घोकंपट्टीवर आधारलेली आहे. ती बदलावी लागणार असल्याचे सांगून शिक्षणमंत्र्यांनी काही उदाहरणे देऊन हे पटवून दिले. आता महाराष्ट्रातील शिक्षणात ते बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची वाटचाल विषद केली. रयतच्या भविष्यातील योजना सांगितल्या तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी किती पराकोटीचे प्रयत्न केले, हे उदाहरण देऊन सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ. पतंगराव कदम यांनी रयत शिक्षण संस्थेमुळे बहुजनांची मुलं कशी शिकली. ज्या काळात ज्या शिक्षणाची गरज होती. ते शिक्षण कर्मवीरांनी दिल्याचे सांगून शिक्षणमंत्र्यांच्या कामाचे कौतुकही केले.या कार्यक्रमाच्यापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे पहिले शाहू बोर्डींग सुरू केले, त्याची पाहणी केली. त्यांनतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणमंत्र्यांची उत्तरेशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणाच्या नंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायची मुभा दिली. ते मंचावरून खाली उतरून विद्यार्थ्यांमध्ये आले. विद्यार्थ्यांनी मनसोक्त प्रश्न विचारले. शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या प्रश्नांना त्यांचे समाधान होईल, अशी उत्तरे दिली. आरती पाटील या विद्यार्थिनीने एसएससीमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि सीबीएसई व आयएससीई विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत का फरक पडतो? हे विचारले असता त्यावर शिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही बोर्डांचा पॅटर्न आपल्यापेक्षा कसा वेगळा असून, आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास कसा करतो? हे सांगितले. त्यात बदल करायची आवश्यकता असून, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.