शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

कारखान्यांकडून एफआरपीची तुकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:37 IST

महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात इतर पिकांचे उत्पादन घेतले जात असले तरी ऊस पिकाला प्राधान्य दिले जाते.

ठळक मुद्देऊस उत्पादक शेतकरी संकटात : साखर उद्योग अडचणीत असल्याचे कारखानदारांकडून ओरड

स्वप्नील शिंदे ।सातारा : साखर उद्योग अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे बुडीत ऊस काढण्याची गरज आहे, असे सांगून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू केले. दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना कारखान्यांकडून एफआरपीचे तुकडे केले जात आहेत.

महाराष्ट्रातील नगदी पीक आणि हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून ‘ऊस’ या पिकाकडे पाहिले जाते. साताऱ्यात नीरा, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, कोयना आदी नदी व त्यांवर उभारलेल्या धरणांमुळे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यात इतर पिकांचे उत्पादन घेतले जात असले तरी ऊस पिकाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शेतीसोबत साखर कारखानदारी उभी राहिली. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठी मदत झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. हळूहळू जिल्ह्यातील सर्वच सहकारी व खासगी कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले. जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखानांच्या ऊसतोडणी यंत्रणा सध्या जोरात सुरू आहेत.

बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. कायद्यानुसार कारखान्यांनी ऊस गाळपाला नेल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाच्या एफआरपीची रक्कम ही शेतकºयांच्या खात्यात जमा करणे कारखान्यांसाठी बंधनकारक असते. मात्र, एक-दोन कारखाने सोडले तर इतर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीबाबत निर्णय घेतलेला दिसत नाही. फलटणचा श्रीराम, साखरवाडीचा श्रीदत्त, कºहाडातील रयत, सह्याद्री आणि कृष्णा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. मात्र, इतर कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप सुरू केले.

साखर उद्योग अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे बुडीत ऊस काढण्याची गरज आहे, असे सांगून उसाचा दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केले. मात्र, दर जाहीर न करता आणि एफआरपीचे तुकडे पाडले जात आहेत. महापूर आणि अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यात ऊसतोडणी यंत्रणेकडून पैशांची मागणी केली जात आहे. एकीकडे उत्पादनात घट, तोडणी खर्चात वाढ आणि एफआरपी मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे.

 

  • कारखान्यांकडून गतवर्षीची देणी बाकी...

गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी व दोनशे रुपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अजून अनेक कारखान्यांची २०० ते ५०० रुपयांपर्यंतची देणी बाकी आहेत. ती तातडीने मिळावी, अशी मागणी होत आहे.अनेक अडचणींवर मात करीत कारखानदार हा गळीत हंगाम करीत आहेत. त्यात दराची स्पर्धा, गाळपाची स्पर्धा, रिकव्हरीची स्पर्धा पाहायला मिळते. इतर कारखाने गेटकेनद्वारे ऊस पळवत आहेत. त्यामुळे यंदा गळीत हंगाम कमी दिवस होणार आहे. जाहीर केलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असे कारखान्याच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

 

गाळप सुरू होण्यापूर्वी कारखान्यांच्यावतीने एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, गाळप सुरू केल्यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घ्यालावे.- धनंजय महामुलकर,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

  • कारखान्याचे नाव गळीत गळीत साखर रिकव्हरी

दिवस मेट्रिक टन उत्पादनयशवंतराव मोहिते कृष्णा ४४ ३५३८०० ४२२६३० ११.८४कारखाना लि. रेठरे बुद्रुकसह्याद्री कारखाना यशवंतनगर ४२ ३४६१०० ४०५८०० ११.६४किसनवीर कारखाना, भुर्इंज २५ ९८१०० ९७९२० १०.५४जयवंत शुगर, धावरवाडी ४३ १८७६४५ २०४३०० १२.३१अजिंक्यतारा, शेंद्रे ४२ १७५५९० १९३१६० ११.२४बाळासाहेब देसाई कारखाना, मरळी ४२ ६६७१० ७४३०० ११.१५श्रीराम सहकारी, फलटण ४७ १२९७३४ १३४६०० १०.५७न्यू फलटण शुगर, साखरवाडी ३५ ८८६७९ ९१४५० १०.९२जरंडेश्वर कारखाना, कोरेगाव ४० ३२९४३० ३७९८०० ११.२५ग्रीन पावर शुगर, गोपूज ४३ १६५४५० १८२४०० ११.१०अथणी शुगर्स (रयत) शेवाळेवाडी ४१ ९४४०० १०८०२५ ११.८१

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर