शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

विनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 14:47 IST

पुरामध्ये वाहून गेलेल्या मोटारीचे बिल शेतकऱ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी वाहून गेल्या, त्यांना हजारो रुपयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. चार हजारांचे बिल हातात पडलेल्या शेतकऱ्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देविनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभारबिल माफ करण्यास टाळाटाळ

सागर गुजरसातारा : पुरामध्ये वाहून गेलेल्या मोटारीचे बिल शेतकऱ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी वाहून गेल्या, त्यांना हजारो रुपयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. चार हजारांचे बिल हातात पडलेल्या शेतकऱ्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.गेल्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्या, ओढ्यांना पूर आला. कोर्टी येथील चंद्रकांत यादव या शेतकऱ्यांची आॅगस्ट २०१९ मध्ये विद्युत मोटार पुरात वाहून गेली. इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईन, केबल असे साहित्य वाहून गेल्याने यादव यांचे २४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले. तिथून पुढे पाऊस सतत सुरू होता. तसेच मोटार वाहून गेल्याने ती चालू ठेवण्याचा प्रश्नच आला नव्हता.तरीही यादव यांना वीज कंपनीने ४ हजार ४१० रुपयांचे बिल धाडले. हे बिल माफ करावे, या मागणीसाठी यादव वीज कंपनीत हेलपाटे मारत असून, त्यांची कोणीच दखल घेत नाही, ही स्थिती आहे.

दरम्यान, जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांचा कालावधी हा पावसाळ्याचा असतो. याच पावसाळ्याच्या कालावधीमधील मोटार वापरल्याचे तब्बल ८ हजार २४० रुपयांचे बिल चंद्रकांत यादव यांना पाठविण्यात आले होते. ते बिल यादव यांनी भरले.त्यानंतर पुरात मोटार वाहून जाऊनही वीज विभागाने त्यांना विजेचे बिल पाठवले. वास्तविक, मोटार अस्तित्वातच नसेल तर कसे काय बिल पाठविले गेले, वीज विभाग हे काम अंदाजपंचे करत आहे का? अशी शंका जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यामुळे योग्य ते बील आकारावे, अशी मागणी होत आहे.कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाण्याच्या मोटारी सर्रासपणे वाहून गेल्या. या भागातील १३ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तरीदेखील वीज कंपनीने शेतकऱ्यांना वीज बिले धाडली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातून कसेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू असताना हे बील जास्त आहे.

यंदा मोठा पाऊस झाला. खरीप हंगामात शेती पिके भिजविण्याची गरज पडली नव्हती, तरीही आॅगस्ट महिन्यात आलेले ८ हजार २४० रुपयांचे बिल मी भरले. मात्र, मोटार वाहून गेली तरीही मला बिलाचा भुर्दंड बसला आहे. वीज कंपनीने हे बिल माफ केलेले नाही.- चंद्रकांत यादव, शेतकरी

अतिवृष्टीच्या काळात शेतीपंपासाठी वीज वापर झालेला नाही. तरीही वीज बिले दिली गेलेली आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. वीज कंपनी अंदाजे बिले देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शासनाने अतिवृष्टीच्या काळातील कृषी पंपाची बिले सर्रास माफ करावीत.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीmahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर