भरारी पथक रोखणार शेतकऱ्यांची फसवणूक
By Admin | Updated: June 8, 2014 00:52 IST2014-06-08T00:50:04+5:302014-06-08T00:52:32+5:30
पंचायत समिती : कृषी विभागामार्फत पथकांची नेमणूक

भरारी पथक रोखणार शेतकऱ्यांची फसवणूक
सातारा : मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकरी परेणीपूर्व मशागतीच्या तयारीत आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बियाणे, खते औषधे खरेदी करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन सातारा पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे बियाणे व खते मिळावी व त्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत तालुकास्तरावर भरारी पथक नेमण्यात आले आहे.
बी-बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावी, खरेदीची पक्की पावती घ्यावी, त्या पावतीवर पिकाचे नाव, प्रकार, नाव, विक्रीची किंमत, पॅकिंग दिनांक, अंतिम दिनांक पाहावा, किमतीपेक्षा जादा भावाने खरेदी करू नये, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे. रासायनिक खतांची खरेदी करताना देखील ते अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करने तसेच लेबल क्लेम असलेल्या व कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
देण्यात आली आहे. दरम्यान, खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे बियाणे, खते, औषधे मिळावी व त्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत तालुकास्तरावर भरारी पथक नेमण्यात आल्याची माहिती ही अधिकाऱ्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)