शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खून, दरोडा, अपहरणातील चौघेजण सातारा जिल्ह्यातून हद्दपार 

By दत्ता यादव | Updated: October 3, 2023 18:42 IST

अकरा महिन्यांत ३५ जण तडीपार..

सातारा : जबरी चोरी, दरोडा, विनयभंग, खंडणी, खून यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नागठाणे, ता. सातारा येथील चाैघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.टोळी प्रमुख अमित उर्फ कन्हैया सुनील साळुंखे (वय ३२), साहील रुस्तम शिकलगार (२४), अमर उर्फ भरत संजय मोहिते (२६), अशिष बन्सीराम साळुंखे (२७, रा. नागठाणे, ता. सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या संशयितांनी टोळी तयार करून सातारा जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण केली होती. कऱ्हाड, सातारा, बोरगाव, उंब्रज पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये या महाभागांनी अनेक गुन्हे केले. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करणे तसेच खंडणीसाठी अपहरण करून खून करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, कायदेशीर रखवालीमधून पळून जाणे यासारखे गंभीर गुन्हे या टोळीच्या नावावर दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक व कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा आपले उद्योग सुरू करत होते. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला अधीक्षक शेख यांनी मंजुरी दिली असून, वरील चाैघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.या कारवाईसाठी सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाईक प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.

अकरा महिन्यांत ३५ जण तडीपार.. नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत १२ उपद्रवी टोळ्यांमधील ३५ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यांमधील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी