शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील ४ लाख १०३ हजार ३८४ कुटुंबांतील १८ लाख ८ हजार ५९१ लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश सेवा बंद राहणार असल्याने हातावर पोट असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यापैकी अनेक जण दोन वेळच्या अन्नाला वंचित राहू शकतात, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनिंगवर मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप किती धान्य मोफत दिले जाणार आहे, याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही, तरीदेखील किती लोकांना धान्य देता येईल, याची इत्थंभूत माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे तयार ठेवण्यात आलेली आहे. राज्य शासनाचा आदेश आल्यानंतर तसेच धान्य उपलब्ध झाल्यानंतर या धान्याचे वाटप पुढील महिनाभर सुरू ठेवण्यात येणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

१) जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या - १८०८५९१

२) तालुकानिहाय संख्या

जावळी : ८२९४४, कऱ्हाड : ३५६३२९, खंडाळा : ६२१६८, खटाव : १८६२८१, कोरेगाव : १३६८४८, महाबळेश्वर : ३५४७०, माण : १४४५०२, पाटण : २२१४७७, फलटण : १९७१९४, सातारा : २७२२३४, वाई : ११३१४४

३) काय मिळणार?

तांदूळ

गहू

प्रतिक्रिया १

कोरोनाचे भले मोठे संकट आपल्यासमोर उभे राहिले आहे. आम्हाला तर रोजचे काम केल्याशिवाय हातात पैसा मिळत नाही. आता कामे थांबल्याने सरकारतर्फे धान्य मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

- संतोष कुंभार

प्रतिक्रिया २

सरकारतर्फे गहू, तांदूळ मोफत देण्यात येणार आहे, त्याच पद्धतीने साखर, डाळ, तेल अशा वस्तूदेखील रेशनिंगवर द्याव्यात. सवलतीच्या दरात या वस्तू दिल्या तरी चालतील.

- बाळकृष्ण मोरे

प्रतिक्रिया ३

जगण्यापुरते सरकारने धान्य दिले आहे. मात्र बँकांचे आणि पतसंस्थांचे काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे लागतात. सरकारने ही कर्जेदेखील माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा.

- वसंत धुमाळ