शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील ४ लाख १०३ हजार ३८४ कुटुंबांतील १८ लाख ८ हजार ५९१ लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश सेवा बंद राहणार असल्याने हातावर पोट असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यापैकी अनेक जण दोन वेळच्या अन्नाला वंचित राहू शकतात, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनिंगवर मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप किती धान्य मोफत दिले जाणार आहे, याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही, तरीदेखील किती लोकांना धान्य देता येईल, याची इत्थंभूत माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे तयार ठेवण्यात आलेली आहे. राज्य शासनाचा आदेश आल्यानंतर तसेच धान्य उपलब्ध झाल्यानंतर या धान्याचे वाटप पुढील महिनाभर सुरू ठेवण्यात येणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

१) जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या - १८०८५९१

२) तालुकानिहाय संख्या

जावळी : ८२९४४, कऱ्हाड : ३५६३२९, खंडाळा : ६२१६८, खटाव : १८६२८१, कोरेगाव : १३६८४८, महाबळेश्वर : ३५४७०, माण : १४४५०२, पाटण : २२१४७७, फलटण : १९७१९४, सातारा : २७२२३४, वाई : ११३१४४

३) काय मिळणार?

तांदूळ

गहू

प्रतिक्रिया १

कोरोनाचे भले मोठे संकट आपल्यासमोर उभे राहिले आहे. आम्हाला तर रोजचे काम केल्याशिवाय हातात पैसा मिळत नाही. आता कामे थांबल्याने सरकारतर्फे धान्य मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

- संतोष कुंभार

प्रतिक्रिया २

सरकारतर्फे गहू, तांदूळ मोफत देण्यात येणार आहे, त्याच पद्धतीने साखर, डाळ, तेल अशा वस्तूदेखील रेशनिंगवर द्याव्यात. सवलतीच्या दरात या वस्तू दिल्या तरी चालतील.

- बाळकृष्ण मोरे

प्रतिक्रिया ३

जगण्यापुरते सरकारने धान्य दिले आहे. मात्र बँकांचे आणि पतसंस्थांचे काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे लागतात. सरकारने ही कर्जेदेखील माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा.

- वसंत धुमाळ