शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील ४ लाख १०३ हजार ३८४ कुटुंबांतील १८ लाख ८ हजार ५९१ लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश सेवा बंद राहणार असल्याने हातावर पोट असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यापैकी अनेक जण दोन वेळच्या अन्नाला वंचित राहू शकतात, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनिंगवर मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप किती धान्य मोफत दिले जाणार आहे, याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही, तरीदेखील किती लोकांना धान्य देता येईल, याची इत्थंभूत माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे तयार ठेवण्यात आलेली आहे. राज्य शासनाचा आदेश आल्यानंतर तसेच धान्य उपलब्ध झाल्यानंतर या धान्याचे वाटप पुढील महिनाभर सुरू ठेवण्यात येणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

१) जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या - १८०८५९१

२) तालुकानिहाय संख्या

जावळी : ८२९४४, कऱ्हाड : ३५६३२९, खंडाळा : ६२१६८, खटाव : १८६२८१, कोरेगाव : १३६८४८, महाबळेश्वर : ३५४७०, माण : १४४५०२, पाटण : २२१४७७, फलटण : १९७१९४, सातारा : २७२२३४, वाई : ११३१४४

३) काय मिळणार?

तांदूळ

गहू

प्रतिक्रिया १

कोरोनाचे भले मोठे संकट आपल्यासमोर उभे राहिले आहे. आम्हाला तर रोजचे काम केल्याशिवाय हातात पैसा मिळत नाही. आता कामे थांबल्याने सरकारतर्फे धान्य मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

- संतोष कुंभार

प्रतिक्रिया २

सरकारतर्फे गहू, तांदूळ मोफत देण्यात येणार आहे, त्याच पद्धतीने साखर, डाळ, तेल अशा वस्तूदेखील रेशनिंगवर द्याव्यात. सवलतीच्या दरात या वस्तू दिल्या तरी चालतील.

- बाळकृष्ण मोरे

प्रतिक्रिया ३

जगण्यापुरते सरकारने धान्य दिले आहे. मात्र बँकांचे आणि पतसंस्थांचे काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे लागतात. सरकारने ही कर्जेदेखील माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा.

- वसंत धुमाळ