शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील ४ लाख १०३ हजार ३८४ कुटुंबांतील १८ लाख ८ हजार ५९१ लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश सेवा बंद राहणार असल्याने हातावर पोट असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यापैकी अनेक जण दोन वेळच्या अन्नाला वंचित राहू शकतात, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनिंगवर मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप किती धान्य मोफत दिले जाणार आहे, याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही, तरीदेखील किती लोकांना धान्य देता येईल, याची इत्थंभूत माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे तयार ठेवण्यात आलेली आहे. राज्य शासनाचा आदेश आल्यानंतर तसेच धान्य उपलब्ध झाल्यानंतर या धान्याचे वाटप पुढील महिनाभर सुरू ठेवण्यात येणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

१) जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या - १८०८५९१

२) तालुकानिहाय संख्या

जावळी : ८२९४४, कऱ्हाड : ३५६३२९, खंडाळा : ६२१६८, खटाव : १८६२८१, कोरेगाव : १३६८४८, महाबळेश्वर : ३५४७०, माण : १४४५०२, पाटण : २२१४७७, फलटण : १९७१९४, सातारा : २७२२३४, वाई : ११३१४४

३) काय मिळणार?

तांदूळ

गहू

प्रतिक्रिया १

कोरोनाचे भले मोठे संकट आपल्यासमोर उभे राहिले आहे. आम्हाला तर रोजचे काम केल्याशिवाय हातात पैसा मिळत नाही. आता कामे थांबल्याने सरकारतर्फे धान्य मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

- संतोष कुंभार

प्रतिक्रिया २

सरकारतर्फे गहू, तांदूळ मोफत देण्यात येणार आहे, त्याच पद्धतीने साखर, डाळ, तेल अशा वस्तूदेखील रेशनिंगवर द्याव्यात. सवलतीच्या दरात या वस्तू दिल्या तरी चालतील.

- बाळकृष्ण मोरे

प्रतिक्रिया ३

जगण्यापुरते सरकारने धान्य दिले आहे. मात्र बँकांचे आणि पतसंस्थांचे काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे लागतात. सरकारने ही कर्जेदेखील माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा.

- वसंत धुमाळ