शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्ह्यातील चार कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 16:43 IST

जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी असे एकूण १२ कारखाने, काही कारखान्यांनी ऊस गाळप करून देखील निम्मी रक्कमही दिलेली नाही.

सागर गुजर

सातारा : जिल्ह्यातील अजिंक्यतारा, बाळासाहेब देसाई, सह्याद्री, रयत (अथणी शुगर) या चार कारखान्यांनी चालू हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. मात्र काही कारखान्यांनी ऊस गाळप करून देखील निम्मी रक्कमही दिलेली नाही.

साखर आयुक्त कार्यालयाच्यावतीने चालू हंगामातील एफआरपीबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी असे एकूण १२ कारखाने सुरू आहेत. सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करत आहेत. काही कारखाने बंद असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस देखील गाळपासाठी सुरू असलेले कारखाने नेत आहेत.

साखर आयुक्तांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यातील चार कारखान्यांनी एफआरपीची रक्कम पूर्ण दिली आहे. जयवंत शुगर या कारखान्याने जाहीर केलेल्या एफआरपीपेक्षा ९५.३९ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. कृष्णा कारखान्याने देखील ८१.६१ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे.

फलटण येथील शरयू कारखान्याने मात्र केवळ ३९.१२ टक्के इतकी कमी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. माण-खटाव, स्वराज या कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत तरी एफआरपीची रक्कम दिलेली नव्हती. दत्त इंडिया साखरवाडी या कारखान्याने ६८.५२ टक्के, गोपूज येथील ग्रीन पॉवरने ६९.१४ टक्के, जरंडेश्वर शुगरने ५९.११ टक्के इतकी एफआरपीची रक्कम दिलेली आहे. जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपीच्या व्यतिरिक्त रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही.

उशिरा ऊस जातो म्हणून घाबरू नका

शेतामध्ये ऊस उभा राहिला तर त्याचे टनेज घटेल, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. शेतकऱ्याने ही भीती मनातून काढून टाकली पाहिजे. ऊस उशिरा गेला तरी काही फरक पडत नाही, पण जो कारखाना चांगला दर देत आहे, त्याच कारखान्याला ऊस घातला, तर शेतकऱ्याला खर्च वजा जाता हाती काही पैसा पडू शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने