शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीत 'पृथ्वीराज' दंड थोपटणार?, राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा

By प्रमोद सुकरे | Updated: September 1, 2022 19:23 IST

कराड : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पण पक्षांतर्गत वाद काही थांबायला तयार नाही. या ...

कराड : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पण पक्षांतर्गत वाद काही थांबायला तयार नाही. या निवडणूक प्रक्रियेवरच ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी आक्षेप घेत नुकताच पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आता तर नाराज गट पक्षाध्यक्ष निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सोनिया गांधींचे किचन कॅबिनेट म्हणून परिचित असणारे 'पृथ्वीराज' गांधींविरोधात दंड थोपटणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.वास्तविक पृथ्वीराज चव्हाण यांचा परिवार हा गांधी परिवाराचा निष्ठावंत म्हणून ओळखला जातो. इंदिरा काँग्रेसच्या स्थापनेनंतर पहिली बैठक कराडमध्ये चव्हाणांच्या घरात झाली होती. आणि प्रेमिलाताई चव्हाण या इंदिरा काँग्रेसच्या पहिल्या प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या. याच कुटुंबातील  आनंदराव चव्हाण प्रेमीलाताई चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक वर्ष लोकसभा व राज्यसभेवर खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. आनंदराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळालीच पण पक्षाने केंद्रात मंत्री म्हणून काम करत असताना पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधीही अनपेक्षितपणे उपलब्ध करून दिली. सध्या ते कराड दक्षिणचे आमदार आहेत.पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची निवडणूक झाली .पण पक्षाची सत्ता गेली. त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज झाल्याचे आजही बोलले जाते. पण याच पृथ्वीराजांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण प्रत्यक्षात त्यांना मंत्रिमंडळात किंवा सत्तेमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी कोठे स्थान मिळालेले नाही.उलट त्यांच्या मतदार संघात त्यांना त्रासच सहन करावा होता.

सन १९९५ नंतर माहितीचा विस्फोट झाला. आणि याचा फायदा उठवत १९९९ ला केंद्रात भाजपचे वाजपेयी सरकार आले. डिजिटल च्या जमान्यात ५० ते ६० वर्षे सत्ता सांभाळणाऱ्या काँग्रेसला काळाबरोबर बदलत लोकांना आपलंसं करता आलेलं नाही असंच दुर्दैवाने म्हणावे लागेल. पण भाजपने याचा पुरेपूर फायदा उठवत काँग्रेसला टार्गेट केले आणि हळूहळू काँग्रेसचे पानिपत व्हायला सुरुवात झाली.

गत १० वर्ष मोदी पर्व सुरू आहे. मात्र काँग्रेसला भाजपला तोंड द्यायला फारसे जमलेले दिसत नाही. भाजपच्या झंझावातात सोनियांचे नेतृत्व कमी पडू लागले हे लक्षात आल्यानंतर गत चार-पाच वर्षापासून पक्षाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू आहे .

नेतृत्व बदलाची ही हवा सुप्त होती पण 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून आपली खदखद मांडली. मात्र हे पत्र फुटले त्याने बरेच राजकारण पहायला मिळाले.

 आता पक्षाने निवडणूक कार्यक्रम राबवला आहे खरा पण, या प्रक्रियेवरच आक्षेप घेत गुलाम-नवी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला. या अगोदर कपिल सिबल यांनीही सोडचिट्टी दिलेली आहे. त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी आझाद यांची नुकतीच घेतलेली भेट, त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रिया, नाराज नेत्यांनी मागितलेली मतदार यादी यावरून बराच मोठा  गोंधळ समोर येतोय. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास पृथ्वीराज चव्हाण या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी दंड थोपटणार का? याबाबत चर्चा न झाल्यास नवलच!

पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा

काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला अशी भावना यापूर्वीही पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी पूर्णवेळ अध्यक्षपद स्वीकारले तर अधिक आनंद होईल असेही ते म्हणाले होते. मात्र त्यानंतर ज्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवले त्या पत्रावर 'पृथ्वीराज' यांचीही सही आहे. त्यामुळे गांधी व चव्हाण यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे हे निश्चित!

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण