शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

आधुनिकतेच्या काळात पारंपरिकतेचा पडलाय विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

कुडाळ : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपली शेती पद्धतीची परंपरा फार पुरातन आहे. देशाची अधिकतम लोकसंख्या ही शेतीवरच ...

कुडाळ : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपली शेती पद्धतीची परंपरा फार पुरातन आहे. देशाची अधिकतम लोकसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे. निसर्गाच्या वैविध्यामुळे विविध विभागांतील शेती अवजारांची बनावट गरजेनुसार वेगवेगळी पाहायला मिळते. उपजीविकेसाठी ग्रामीण भागातील शेतकरी बैल, घोडा, रेडा या प्राण्यांचा उपयोग करून पारंपरिक शेती करीत होता. मात्र, कालानुरूप यात बदल होत गेला. शेतीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर होऊ लागल्याने पूर्वीची शेती अवजारे आज शेतीतून हद्दपार होऊ लागली आहेत.

पूर्वी शेतीसाठी पारंपरिक अवजारांचा वापर होत आहे. कुळव, पाभर, पाटोळे, रेगाडे, मोगणा, नांगर, तिफण, आदी शेतीच्या अवजारांच्या मदतीने मशागत व पेरणीची कामे केली जात होती. भल्या पहाटे शेतकरी आपली बैलजोडी घेऊन शेतात जाताना बैलगाडीच्या घुंगरांचा आवाज कानी यायचा. आता ग्रामीण भागातील परिस्थिती बदलली आहे. शिवारात सर्जा-राजाच्या जागी यांत्रिक शेती होत आहे. आधुनिकतेच्या काळात बैलजोड्याही कमी झाल्या आहेत. पारंपरिक अवजारांची जागा आता यंत्राने घेतली आहे. शेतीच्या पद्धतीत सुधारणा झाली असून, त्याकरिता नवनवीन शोध आणि आधुनिक साधनांची मदत होत आहे. कमी वेळात शेतीचे जास्तीत जास्त काम होण्यासाठी शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ होऊ लागला आहे.

शेतीची बहुतेक कामे ट्रॅक्टरच्या मदतीने होत आहेत. अगदी पेरणीपासून ती सर्वच कामे होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रमाची बचत होऊ लागली आहे. गावात पूर्वीसारखे बैलजोडी पाळणारे कमीच आहेत. वाहतुकीचे साधन म्हणून बैलगाडीचा रुबाब आणि गाडीवान आता यांत्रिकीकरणाचा भाग झालेला दिसत आहे. पारंपरिकतेचा विसर होत शेतीसाठी आधुनिक साधनांचाच जास्त वापर होऊ लागला आहे.

चौकट..

युवावर्गाचा कल आधुनिक शेतीकडे

सध्या पारंपरिकतेचा बाज संपत चालला असून, शेतकरीही आधुनिक झाले आहेत. युवावर्गाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आधुनिक शेतीकडे त्यांचा अधिक कल पाहायला मिळत आहे. पारंपरिक अवजारांची जागा आता अडगळीच्या कोपऱ्यात असून क्वचितच प्रसंगानुरूप यांचा उपयोग होत आहे.