शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ८१ गावांवर पुराचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

कऱ्हाड : कृष्णा आणि कोयना नदीकाठावर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी ८१ गावांना प्रत्येक वेळी पुराचा फटका बसतो. मात्र, ...

कऱ्हाड : कृष्णा आणि कोयना नदीकाठावर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी ८१ गावांना प्रत्येक वेळी पुराचा फटका बसतो. मात्र, वारंवार घोषणा होऊनही या गावांमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना झालेल्या नाहीत. केवळ पावसाळ्यात संरक्षक भिंतीसह पुनर्वसनाच्या घोषणा केल्या जातात. आणि पावसाबरोबर पूर ओसरताच या घोषणांचाही प्रशासनाला विसर पडतो.

कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांतील नदीकाठावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा फटका बसतो. पावसाळा सुरू होताच या गावांमध्ये पुराची धास्ती निर्माण होते. सलग दोन वर्षे आलेल्या पुराच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत. मात्र, ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पूर आला की संबंधित गावांमध्ये उपाययोजनांचे आडाखे बांधले जातात. आणि पूर ओसरला की उपाययोजनांचा विषयही विस्मृतीत जातो. कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील ८१ गावांना पुराचा सामना करावा लागतो. यंदाही ही गावे पुराच्या भीतीमुळे धास्तावलेली आहेत. मात्र, तरीही संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्या गेलेल्या नाहीत.

अनेक कुटुंबांच्या पुनर्वसनासह नदीकाठावरील अतिक्रमणाचा प्रश्नही कायम आहे. पावसाळा आला की, पुनर्वसन, अतिक्रमण, संरक्षक भिंत हे विषय चर्चेत येतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नेते मंडळीही त्या वेळी आश्वासनांची खैरात करतात. मात्र, त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नाही, हे दुर्दैव.

- चौकट

पुरबाधित गावे

कऱ्हाड : ३१

पाटण : ५०

- चौकट

प्रमुख नद्या व उपनद्या

१) पाटण

मुख्य नद्या - कोयना, केरा, मोरणा

उपनद्या - वांग, काफणा, उत्तरमांड, तारळी, काजळी

२) कऱ्हाड

मुख्य नद्या - कोयना, कृष्णा

उपनद्या - दक्षिण मांड, उत्तर मांड, तारळी, वांग

- चौकट

... या गावांना बसतो फटका

१) कऱ्हाड तालुका

कृष्णा : कऱ्हाड शहर, गोटे, कापिल, आटके, जाधवमळा, सयापूर, पाचवडवस्ती, गोळेश्वर, मालखेड, रेठरे खुर्द, दुशेरे, शेरे, वाठार, रेठरे बुद्रूक, कार्वे, कोडोली, पवारमळी, खुबी, गोंदी, खोडशी

कोयना : वारूंजी, तांबवे, म्होप्रे, येरवळे, चचेगाव, पोतले, साजूर

२) पाटण तालुका

कोयना : हेळवाक, पाटण, निसरे, मंद्रुळ हवेली, नावडी, मुळगाव, सांगवड

- चौकट

केवळ घोषणाच, कार्यवाही शून्य!

१) २००५ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कऱ्हाड तालुक्यात नदीकाठावरील गावांना संरक्षक भिंती बांधून देण्याची घोषणा केली होती.

२) २०१९ साली भाजप-शिवसेनेच्या काळातही तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कऱ्हाड शहरासह तालुक्यातील गावांत संरक्षक भिंतीचे अश्वासन दिले होते.

३) पाटण तालुक्यातील नदीकाठच्या घरांच्या पुनर्वसनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याबाबतही काही हालचाली झाल्या नाहीत.

४) कऱ्हाड शहराला संरक्षक भिंतीच्या कामावरून केवळ राजकारण झाल्याने भिंतीचे काम आजअखेर रखडलेले आहे. भिंतही अर्धवटच झाली आहे.

फोटो : १८केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाड शहराला आॅगस्ट २०१९ मधील महापुराचा मोठा फटका बसला होता. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या दत्त चौकापर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. (संग्रहित फोटो)

फोटो : १८केआरडी०२

कॅप्शन : प्रतीकात्मक