शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तब्बल ८१ गावांवर पुराचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

कऱ्हाड : कृष्णा आणि कोयना नदीकाठावर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी ८१ गावांना प्रत्येक वेळी पुराचा फटका बसतो. मात्र, ...

कऱ्हाड : कृष्णा आणि कोयना नदीकाठावर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी ८१ गावांना प्रत्येक वेळी पुराचा फटका बसतो. मात्र, वारंवार घोषणा होऊनही या गावांमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना झालेल्या नाहीत. केवळ पावसाळ्यात संरक्षक भिंतीसह पुनर्वसनाच्या घोषणा केल्या जातात. आणि पावसाबरोबर पूर ओसरताच या घोषणांचाही प्रशासनाला विसर पडतो.

कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांतील नदीकाठावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा फटका बसतो. पावसाळा सुरू होताच या गावांमध्ये पुराची धास्ती निर्माण होते. सलग दोन वर्षे आलेल्या पुराच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत. मात्र, ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पूर आला की संबंधित गावांमध्ये उपाययोजनांचे आडाखे बांधले जातात. आणि पूर ओसरला की उपाययोजनांचा विषयही विस्मृतीत जातो. कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील ८१ गावांना पुराचा सामना करावा लागतो. यंदाही ही गावे पुराच्या भीतीमुळे धास्तावलेली आहेत. मात्र, तरीही संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्या गेलेल्या नाहीत.

अनेक कुटुंबांच्या पुनर्वसनासह नदीकाठावरील अतिक्रमणाचा प्रश्नही कायम आहे. पावसाळा आला की, पुनर्वसन, अतिक्रमण, संरक्षक भिंत हे विषय चर्चेत येतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नेते मंडळीही त्या वेळी आश्वासनांची खैरात करतात. मात्र, त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नाही, हे दुर्दैव.

- चौकट

पुरबाधित गावे

कऱ्हाड : ३१

पाटण : ५०

- चौकट

प्रमुख नद्या व उपनद्या

१) पाटण

मुख्य नद्या - कोयना, केरा, मोरणा

उपनद्या - वांग, काफणा, उत्तरमांड, तारळी, काजळी

२) कऱ्हाड

मुख्य नद्या - कोयना, कृष्णा

उपनद्या - दक्षिण मांड, उत्तर मांड, तारळी, वांग

- चौकट

... या गावांना बसतो फटका

१) कऱ्हाड तालुका

कृष्णा : कऱ्हाड शहर, गोटे, कापिल, आटके, जाधवमळा, सयापूर, पाचवडवस्ती, गोळेश्वर, मालखेड, रेठरे खुर्द, दुशेरे, शेरे, वाठार, रेठरे बुद्रूक, कार्वे, कोडोली, पवारमळी, खुबी, गोंदी, खोडशी

कोयना : वारूंजी, तांबवे, म्होप्रे, येरवळे, चचेगाव, पोतले, साजूर

२) पाटण तालुका

कोयना : हेळवाक, पाटण, निसरे, मंद्रुळ हवेली, नावडी, मुळगाव, सांगवड

- चौकट

केवळ घोषणाच, कार्यवाही शून्य!

१) २००५ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कऱ्हाड तालुक्यात नदीकाठावरील गावांना संरक्षक भिंती बांधून देण्याची घोषणा केली होती.

२) २०१९ साली भाजप-शिवसेनेच्या काळातही तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कऱ्हाड शहरासह तालुक्यातील गावांत संरक्षक भिंतीचे अश्वासन दिले होते.

३) पाटण तालुक्यातील नदीकाठच्या घरांच्या पुनर्वसनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याबाबतही काही हालचाली झाल्या नाहीत.

४) कऱ्हाड शहराला संरक्षक भिंतीच्या कामावरून केवळ राजकारण झाल्याने भिंतीचे काम आजअखेर रखडलेले आहे. भिंतही अर्धवटच झाली आहे.

फोटो : १८केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाड शहराला आॅगस्ट २०१९ मधील महापुराचा मोठा फटका बसला होता. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या दत्त चौकापर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. (संग्रहित फोटो)

फोटो : १८केआरडी०२

कॅप्शन : प्रतीकात्मक