शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तब्बल ८१ गावांवर पुराचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

कऱ्हाड : कृष्णा आणि कोयना नदीकाठावर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी ८१ गावांना प्रत्येक वेळी पुराचा फटका बसतो. मात्र, ...

कऱ्हाड : कृष्णा आणि कोयना नदीकाठावर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी ८१ गावांना प्रत्येक वेळी पुराचा फटका बसतो. मात्र, वारंवार घोषणा होऊनही या गावांमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना झालेल्या नाहीत. केवळ पावसाळ्यात संरक्षक भिंतीसह पुनर्वसनाच्या घोषणा केल्या जातात. आणि पावसाबरोबर पूर ओसरताच या घोषणांचाही प्रशासनाला विसर पडतो.

कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांतील नदीकाठावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा फटका बसतो. पावसाळा सुरू होताच या गावांमध्ये पुराची धास्ती निर्माण होते. सलग दोन वर्षे आलेल्या पुराच्या कटू आठवणी आजही ताज्या आहेत. मात्र, ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पूर आला की संबंधित गावांमध्ये उपाययोजनांचे आडाखे बांधले जातात. आणि पूर ओसरला की उपाययोजनांचा विषयही विस्मृतीत जातो. कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील ८१ गावांना पुराचा सामना करावा लागतो. यंदाही ही गावे पुराच्या भीतीमुळे धास्तावलेली आहेत. मात्र, तरीही संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्या गेलेल्या नाहीत.

अनेक कुटुंबांच्या पुनर्वसनासह नदीकाठावरील अतिक्रमणाचा प्रश्नही कायम आहे. पावसाळा आला की, पुनर्वसन, अतिक्रमण, संरक्षक भिंत हे विषय चर्चेत येतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नेते मंडळीही त्या वेळी आश्वासनांची खैरात करतात. मात्र, त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नाही, हे दुर्दैव.

- चौकट

पुरबाधित गावे

कऱ्हाड : ३१

पाटण : ५०

- चौकट

प्रमुख नद्या व उपनद्या

१) पाटण

मुख्य नद्या - कोयना, केरा, मोरणा

उपनद्या - वांग, काफणा, उत्तरमांड, तारळी, काजळी

२) कऱ्हाड

मुख्य नद्या - कोयना, कृष्णा

उपनद्या - दक्षिण मांड, उत्तर मांड, तारळी, वांग

- चौकट

... या गावांना बसतो फटका

१) कऱ्हाड तालुका

कृष्णा : कऱ्हाड शहर, गोटे, कापिल, आटके, जाधवमळा, सयापूर, पाचवडवस्ती, गोळेश्वर, मालखेड, रेठरे खुर्द, दुशेरे, शेरे, वाठार, रेठरे बुद्रूक, कार्वे, कोडोली, पवारमळी, खुबी, गोंदी, खोडशी

कोयना : वारूंजी, तांबवे, म्होप्रे, येरवळे, चचेगाव, पोतले, साजूर

२) पाटण तालुका

कोयना : हेळवाक, पाटण, निसरे, मंद्रुळ हवेली, नावडी, मुळगाव, सांगवड

- चौकट

केवळ घोषणाच, कार्यवाही शून्य!

१) २००५ साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कऱ्हाड तालुक्यात नदीकाठावरील गावांना संरक्षक भिंती बांधून देण्याची घोषणा केली होती.

२) २०१९ साली भाजप-शिवसेनेच्या काळातही तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कऱ्हाड शहरासह तालुक्यातील गावांत संरक्षक भिंतीचे अश्वासन दिले होते.

३) पाटण तालुक्यातील नदीकाठच्या घरांच्या पुनर्वसनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याबाबतही काही हालचाली झाल्या नाहीत.

४) कऱ्हाड शहराला संरक्षक भिंतीच्या कामावरून केवळ राजकारण झाल्याने भिंतीचे काम आजअखेर रखडलेले आहे. भिंतही अर्धवटच झाली आहे.

फोटो : १८केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाड शहराला आॅगस्ट २०१९ मधील महापुराचा मोठा फटका बसला होता. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या दत्त चौकापर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. (संग्रहित फोटो)

फोटो : १८केआरडी०२

कॅप्शन : प्रतीकात्मक