शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

पाच गावे आणि एक आण्णासाहेब... त्यात सर्व्हर डाऊन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:39 IST

कोपर्डे हवेली : महसुली विभागाचा गाव पातळीवर प्रत्येक माणसाचा संबंध तलाठी यांच्याशी येत असतो. त्यामुळे कामासाठी तलाठी सजात लोकांची ...

कोपर्डे हवेली : महसुली विभागाचा गाव पातळीवर प्रत्येक माणसाचा संबंध तलाठी यांच्याशी येत असतो. त्यामुळे कामासाठी तलाठी सजात लोकांची कायमच गर्दी असते. सध्या कोपर्डे हवेली परिसरातील गावांमध्ये एक तलाठी आणि पाच गावे अशी अवस्था असून वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत असल्याने अनेकांची कामे रखडली असून कोपर्डे हवेली सारख्या मोठ्या गावाला पूर्ण वेळ तलाठी मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

कोपर्डे हवेलीत सध्या संजय सावंत हे तलाठी म्हणून पाच गावे संभाळत आहेत. त्यामध्ये पार्ले, बनवडी,वडोली निळेश्र्वर आदी गावांचा समावेश असून कोपर्डे हवेली आणि उत्तर कोपर्डे या गावांचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे.

सध्या सोसायटीची कर्ज प्रकरणे सुरू असल्याने इ कराराची ऑनलाईन कामे प्रलंबित आहेत. अनेक कागदांची पूर्तता तलाठी कार्यालयाकडून करावी लागते. पण एक तलाठी आणि पाच गावे असल्याने आणि वेळोवेळी सर्व्हर डाऊन होत असल्याने वेळेत शेतकऱ्यांना कागदपत्रे मिळत नाहीत. शिवाय वर्षांपासून अनेकांच्या वारस नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे तलाठी कार्यालयात वादावादीचे प्रकार घडत असतात. कोपर्डे हवेली सारख्या मोठ्या गावात खातेदारांची संख्या मोठी आहे.

सतत सातबारा, खाते उतारे, उत्पन्नाचे दाखले, अल्पभूधारक दाखले‌, नोंदी, वाटणी पत्र आदी कामांसाठी लोक सतत कार्यालयात असतात. पण इतर गावाला तलाठी वेळ देताना कोपर्डे हवेली गावाला पूर्ण वेळ मिळत नसल्याने कामे रखडली आहेत. त्यामुळे पूर्ण वेळ तलाठी मिळावा अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.

चौकट

शेतकऱ्यांचे निवेदन

तलाठ्यांनी त्वरित कामे करावी यासाठी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, रवी चव्हाण आदीसह शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

फोटो : कोपर्डे हवेली येथील तलाठी कार्यालयात लोकांनी गर्दी केली.