शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Satara: गुरसाळेतून मराठा आंदोलकांसाठी पाच हजार भाकरी आझाद मैदानाकडे रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:45 IST

'एक घर एक शिदोरी' घेऊन युवकांची मुंबईकडे कुच

औंध/वडूज : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी राज्यातील लाखो समाजबांधव उपस्थित आहेत. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ते लढत आहेत. त्यांना एक छोटीशी मदत म्हणून खटाव तालुक्यातील गुरसाळे गावाने ‘एक घर एक शिदोरी’ची हाक दिली. रविवारी सर्व शिदोऱ्यांचे संकलन करून मराठा क्रांती मोर्चाचे युवक मुंबईकडे रवाना झाले.मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू झाल्यापासून क्रांतिकारी ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील सर्व मराठा समाजबांधवांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले समाजबांधव जमा झाले आहेत. त्यासाठी त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेत आपलाही हातभार असावा म्हणून शनिवारी गुरसाळे गावातील पदाधिकाऱ्यांनी गावातील ग्रुपद्वारे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी प्रत्येकी पाच भाकरी, ठेचा, लोणचे, शेंगदाणा चटणी एका कापडात व्यवस्थित बांधून गावात एका ठिकाणी जमा केली.सर्वसाधारणपणे पाच हजार भाकरी जमा झाल्या असून, व्यवस्थितपणे एका पिकअप वाहनात शिदोरी भरण्यात आली. दहा ते बारा युवक त्या गाडीत बसून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे आजूबाजूच्या गावांत कौतुक होत आहे. त्यांनीही आता तयारी सुरू केली आहे. खटाव तालुक्यात यानिमित्ताने उपोषणस्थळी मदतीची सुरुवात झाली आहे. हे आंदोलन मोठ्या ताकदीने सुरू राहून व आपल्या मराठा समाजबांधवांना न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. मोठ्या आशेने समाज या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.

पाण्याचे शंभर बॉक्स पोहोचम्हासुर्णे (ता. खटाव) येथील महंमद शेख, मैनुद्दीन शेख, शाहरुख शेख यांच्याकडून उपोषणस्थळी पाण्याचे १०० बॉक्स देण्यात आले आहेत. शक्य होईल तेवढी मदत करणार असल्याचे इंजिनिअर मैनुद्दीन शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कराडवरून पुरणपोळीचा घास!कराड : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गौराईही घरी आल्या आहेत. तरीही लाखो मराठा आंदोलक मुंबईत मराठा आरक्षणासाठी, मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत ठिय्या मांडून बसले आहेत. या आंदोलकांची जेवणाची गैरसोय होऊ नये. आपण सणाला घरी नाही, याची आठवण होऊ नये म्हणून कराड तालुक्यातील हजारो भगिनींनी घरी केलेल्या पुरणपोळ्यांचा घास सोमवारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खास मुंबईला पाठविला आहे. हा मायेचा घास आंदोलकांना बळ देईल, असे मत माता-भगिनी व्यक्त करीत आहेत.