दहा गुंठ्यांत तब्बल पाच लाखांचं आलं शेतामध्येच चर्चासत्र : अंगापूरच्या संजय महाराज यांचा अनोखा प्रयोग
By Admin | Updated: May 10, 2014 23:40 IST2014-05-10T23:40:28+5:302014-05-10T23:40:28+5:30
सातारा : लहरी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात असल्याची ओरड होत असतानाच अंगापूर वंदन येथील शेतकरी संजय महाराज यांनी अनोखा प्रयोग

दहा गुंठ्यांत तब्बल पाच लाखांचं आलं शेतामध्येच चर्चासत्र : अंगापूरच्या संजय महाराज यांचा अनोखा प्रयोग
सातारा : लहरी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात असल्याची ओरड होत असतानाच अंगापूर वंदन येथील शेतकरी संजय महाराज यांनी अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी ठिंबक सिंचनच्या साह्याने अवघ्या दहा गुंठ्यांत तब्बल पाच लाखांचे आले पिकाचे उत्पादन घेतले आहे. अंगापूर वंदन येथील तरुण शेतकर्याने घेतलेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात नुकताच शेतकरी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात आले पीक यासंदर्भात चर्चासत्र घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कणसे म्हणाले, ‘तरुण शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे गरजेचे आहे. माती परीक्षण, खते व औषधांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन व योग्यवेळी पाणी व तणाची काळजी घेतल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो.’ संजय महाराज म्हणाले, ‘मी तीनशे किलोच्या आल्याच्या बियाण्याचे दहा गुंठे क्षेत्रात तुषार सिंचनपद्धतीने पाणी दिले. त्यासाठी मशागत, शेणखत, रासायनिक खत व औषधांचा योग्यवेळी वापर केल्याने दहा गुंठे क्षेत्रात १४ गाड्या म्हणजेच सात हजार किलो आले पिकाचे उत्पादन घेतले. यातून सुमारे पाच लाखांचे उत्पन्न मिळाले.’ यावेळी शिवाजीराव कणसे, सरपंच अण्णा शेळके, शेखर कणसे, अध्यक्ष बापूराव कणसे, जितेंद्र कणसे, बाळू पहिलवान, मंगेश कणसे, प्रमोद पहिलवान, विजय मिस्त्री, प्रदीप पाटील, अप्पा कणसे, राजू कणसे, भानुदास पहिलवान आदी उपस्थित होते. सुभाष जाधव, यांनी सूत्रसंचालन केले. बी. एस. कणसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)