शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प साताऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 17:04 IST

सातारा जिल्ह्याने विविध अभियान, योजनांत नावलौकिक मिळविला आहे. या प्रकल्पांना राज्य शासनानेही मान्यता दिली असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्याने विविध अभियान, योजनांत नावलौकिक मिळविला आहे. आता अनोखे पाऊल उचलले असून राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प फलटण तालुक्यातील कोळकी तर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प कऱ्हाड तालुक्यातील मसूरला होणार आहे. या प्रकल्पांना राज्य शासनानेही मान्यता दिली असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

सातारा जिल्ह्याचा डंका दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. राज्य असो किंवा केंद्र शासन दोघांच्याही योजना आणि अभियान जिल्ह्याने यशस्वी केली आहेत. तसेच जिल्हा परिषदेचा नावलौकिकही देशपातळीवर राहिला आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानात तर विजयी पताका फडकवली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील गावे निर्मलग्राम केली. लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणत शौचालय बांधकाम व त्याचा नियमित वापर होण्यासाठी प्रयत्न केले. त्यातच स्वच्छ भारत मिशन टप्पा २ सुरु झाल्यापासून संपूर्ण गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी घर तेथे शौचालय उपक्रम यशस्वीपणे राबवला. तसेच कुटुंबापासून सार्वजनिक स्तरापर्यंत घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

आता राज्याला मार्गदर्शक ठरणारा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प कोळकी येथे होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी जिल्हा परिषदेने राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे प्रकल्प आराखडा पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून ७५ लाखांचा निधी मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे कोळकी व आसपासच्या गावातील शौचालयांच्या शोषखड्ड्यातील मैला आणि सेप्टिक टँकमधील बाहेर न पडणाऱ्या मैलावर प्रक्रिया करुन व्यवस्थापन होणार आहे. यामधून उत्कृष्ट खत निर्मिती करुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मानवी जीवनास घातक ठरणारे व न कुजणाऱ्या प्लास्टिकवरही व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यासाठीचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प मसूर येथे होणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या प्रयत्नांना यामध्ये यश आले आहे. राज्य शासनाने याही प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तसेच १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे.

राज्यातील हे दोन प्रकल्प साताऱ्यात होत असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर