शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प साताऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 17:04 IST

सातारा जिल्ह्याने विविध अभियान, योजनांत नावलौकिक मिळविला आहे. या प्रकल्पांना राज्य शासनानेही मान्यता दिली असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्याने विविध अभियान, योजनांत नावलौकिक मिळविला आहे. आता अनोखे पाऊल उचलले असून राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प फलटण तालुक्यातील कोळकी तर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प कऱ्हाड तालुक्यातील मसूरला होणार आहे. या प्रकल्पांना राज्य शासनानेही मान्यता दिली असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

सातारा जिल्ह्याचा डंका दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. राज्य असो किंवा केंद्र शासन दोघांच्याही योजना आणि अभियान जिल्ह्याने यशस्वी केली आहेत. तसेच जिल्हा परिषदेचा नावलौकिकही देशपातळीवर राहिला आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानात तर विजयी पताका फडकवली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील गावे निर्मलग्राम केली. लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणत शौचालय बांधकाम व त्याचा नियमित वापर होण्यासाठी प्रयत्न केले. त्यातच स्वच्छ भारत मिशन टप्पा २ सुरु झाल्यापासून संपूर्ण गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी घर तेथे शौचालय उपक्रम यशस्वीपणे राबवला. तसेच कुटुंबापासून सार्वजनिक स्तरापर्यंत घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

आता राज्याला मार्गदर्शक ठरणारा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प कोळकी येथे होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी जिल्हा परिषदेने राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे प्रकल्प आराखडा पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून ७५ लाखांचा निधी मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे कोळकी व आसपासच्या गावातील शौचालयांच्या शोषखड्ड्यातील मैला आणि सेप्टिक टँकमधील बाहेर न पडणाऱ्या मैलावर प्रक्रिया करुन व्यवस्थापन होणार आहे. यामधून उत्कृष्ट खत निर्मिती करुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मानवी जीवनास घातक ठरणारे व न कुजणाऱ्या प्लास्टिकवरही व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यासाठीचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प मसूर येथे होणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या प्रयत्नांना यामध्ये यश आले आहे. राज्य शासनाने याही प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तसेच १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे.

राज्यातील हे दोन प्रकल्प साताऱ्यात होत असल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर