वाठारस्टेशन : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष वेधलेल्या ऊसदराच्या घोषणेत अजिंक्यतारासह साखर कारखान्याने १८०० रुपये पहिली उचल जाहीर केल्यानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांनीही १८०० रुपये दर देण्याची मानसिकता दाखवली आहे. त्यामुळे सुरू हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम कारखानदारांकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यातील एकूण ११ कारखान्यांमध्ये आज अखेर ११ लाख ५२ हजार ५४४ लाख मे. टन उसाचे गाळप झाले असून, ११ लाख ९४ हजार ९६० क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे.कारखाने सुरू होण्यापूर्वीच उसाची पहिली उचल जाहीर होणे अपेक्षित असताना तब्बल दीड महिन्यांचा कालावधी गेला तरी जिल्ह्यात कोणत्याही कारखान्याने उसाचा हप्ता जाहीर केला नाही. केंद्राच्या एफआरपीनुसार तोडणी वाहतूक वजा करता गतवर्षी ऐवढा तरी दर जाहीर होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. सातारा शेजारील पुणे, सोलापूरकरांनी अनुक्रमे १५०० ते १८०० पहिला हप्ता जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील वाढता साखर उतारा लक्षात घेता २१०० ते २२०० रुपये दर जाहीर केला जाईल, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती.एक नोव्हेंबर पासून गाळप सुरू असताना १४ दिवसांत ‘एफआरपी’ रक्कम द्यावी, असा नियम पायदळी तुडवला गेला. दीड महिन्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करायला लावली. यावर साखर आयुक्तांनी सोमवार ते बुधवारपर्यंत पहिली उचल देण्याचा ठराव द्यावा, अन्यथा आर.आर.सी. अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा जिल्ह्यातील कारखानदारांना दिला होता. मात्र, अजिंक्यतारा वगळताइतर कोणत्याही कारखान्याने दर घोषित करण्याबाबत अजूनही मौन बाळगले आहे.अजिंक्यतारा कारखान्याने जाहीर केलेल्या १८०० रुपये पहिला हप्ताचाच सूर काढीत आता जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी री ओढली आहे. परंतु १८०० रुपये सुद्धा पहिला हप्ता देणे आव्हानात्मक असल्याचीच बाब काही कारखाना प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.सातारा जिल्ह्यात १८०० ची पहिला हप्ता जवळपास निश्चित झाल्यामुळे चालू हंगामात गतवर्षी इतपतही दर उसाला मिळणार नाही, ही परिस्थती आता समोर आली आहे. (वार्ताहर)..अन्यथा हाच अंतीम दरजर शासनाने सबसिडी दिली तर एफ.आर.पी. तोडणी वाहतूक वजा करता २१०० ते २२०० पर्यंत दर देता येईल; अन्यथा १८०० हाच अंतिम दर असेल, असे मत एका कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
कारखान्यांचा पहिला हप्ता १८०० रुपये?
By admin | Updated: December 17, 2014 23:04 IST