शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
3
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
4
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
5
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
6
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
7
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
8
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
9
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
10
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
11
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
12
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
13
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
14
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
15
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
16
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
17
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
18
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
19
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावर पहिली दुर्ग परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:52 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध विषयांवर राजधानी सातारा येथे झालेल्या पहिल्या दुर्ग परिषदेत व्यापक विचारमंथन झाले. त्याचबरोबर गडकोट संवर्धनासाठी एकमेकांच्या हातात हात घालून जिल्ह्यातील गडकोटांची शोभा वाढवण्याचा निर्धार करत संवर्धनासाठी झटणाऱ्या संस्थांची एक समितीही स्थापन करण्यात आली.

ठळक मुद्देगडकोटांची शोभा वाढविण्याचा निर्धारजिल्ह्यातील २२ संस्था एकवटल्या

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध विषयांवर राजधानी सातारा येथे झालेल्या पहिल्या दुर्ग परिषदेत व्यापक विचारमंथन झाले.त्याचबरोबर गडकोट संवर्धनासाठी एकमेकांच्या हातात हात घालून जिल्ह्यातील गडकोटांची शोभा वाढवण्याचा निर्धार करत संवर्धनासाठी झटणाऱ्या संस्थांची एक समितीही स्थापन करण्यात आली.सातारा जिल्ह्यातील २२ विविध दुर्ग संस्थांनी एकत्रित येत किल्ले अजिंक्यतारा येथे बुधवारी पहिली दुर्ग परिषद आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या परिषदेस प्रारंभ झाल्यानंतर सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर गडकोटांवरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना घ्यावयाची काळजी, गडावर तसेच तटबंदी परिसरात वृक्ष लागवड आणि संगोपन करताना घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सोशल मीडियासह विविध समाज माध्यमांचा वापर करून गडकोट संवर्धनासाठी व्यापक प्रमाणावर महाविद्यालयीन युवक - युवती यांच्यामध्ये जनजागृती करणे, गडसंवर्धन चळवळ शाळा, महाविद्यालयापर्यंत नेण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याबाबतही पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले. ऐतिहासिक वास्तूंना वृक्षामुळे धोका निर्माण झाल्यास कोणती उपाययोजना करावी, याबाबत दुर्ग संस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.किल्ले सुभानमंगल, चंदनवंदन, कमळगड, पांडवगड यासह काही किल्ल्याकडे राज्य शासनासह केंद्र सरकारचे झालेले दुर्लक्ष आणि यामुळे किल्ल्याच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यावर चर्चा करण्यात आली. तसेच याप्रश्नी जिल्हाधिकारी तसेच शासनाकडे दाद मागण्यासह प्रसंगी लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धारही यावेळी एकमताने करण्यात आला. जलसंधारण आणि सीएसआर फंडातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याबाबतही विचारविनिमय व मार्गदर्शन करण्यात आले. किल्ले अजिंक्यतारा येथे श्रमदान करून पहिल्या दुर्ग परिषदेची सांगता झाली.

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर