शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

दिवाळीत फटाकेमुक्त ग्रामपंचायत!, प्रदूषण टाळण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा पुढाकार 

By नितीन काळेल | Updated: November 3, 2023 19:14 IST

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत फटाकेमुक्त ग्रामपंचायत उपक्रम

सातारा : फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत फटाकेमुक्त ग्रामपंचायत उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायतींना गुणही देण्यात येणार आहेत.दिवाळीचा सण आनंदाचा असतो. यामुळे या सणाला फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. कोट्यवधी रुपयांचे फटाके फुटतात; पण या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. तसेच फटाक्याच्या धुरामुळे श्वास घेताना त्रास होतो. हे प्रदूषण टाळण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘फटाकेमुक्त ग्रामपंचायत’ हा उपक्रम राबविला जात आहे.महाराष्ट्र शासनाकडून माझी वसुंधरा अभियान ४.० राबविण्यात येत आहे. हे अभियान भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित आहे. या अभियानाच्या माध्यमातून निसर्गाशी संबंधित वरील पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी राबविण्यात येत आहे. वायू तत्त्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, हा निकष या अभियानात आहे. यामुळे फटाके मुक्त दिवाळीसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास त्यांना या उपक्रमासाठी १५० गुण देय राहणार आहेत.सातारा जिल्हा परिषदेनेही गटविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून याबाबत सूचना केली आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही केले आहे.

फटाक्यांमुळे विषारी वायू वातावरणात पसरतो. त्यामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते. माझी वसुंधरा अभियान ४.० च्या अंमलबजावणीच्या निमित्ताने दिवाळी सणात ग्रामपंचायतींनी फटाकेमुक्त सण साजरा करण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतल्यास प्रदूषणाची पातळी कमीत कमी राहील. तसेच अभियानाच्या मूल्यमापनात ग्रामपंचायतीला १५० गुण मिळतील. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदDiwaliदिवाळी 2023pollutionप्रदूषणgram panchayatग्राम पंचायत