शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

फटाक्यानं रोपं जळाली.. वधुपित्यानं पुन्हा लावली!-- लोकमत विशेष

By admin | Updated: April 20, 2016 00:23 IST

लग्नाच्या वरातीतील प्रताप : संतप्त सातारकर पोलिस ठाण्यात पोहोचताच वऱ्हाडी मंडळीकडून तातडीनं चूक दुरुस्त :

सातारा : लग्नाच्या वरातीतील उत्साही वऱ्हाडी मंडळींनी लावलेल्या फटाक्यांमुळे रस्तादुभाजकातील शंभर रोपं जळून खाक झाली. हे पाहून हळहळलेल्या काही सर्वसामान्य सातारकरांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथं संबंधित वऱ्हाडी मंडळींना बोलावून घेताच त्यांनी जळालेली सर्व रोपं परत लावून देण्याचं कबूल केलं. लगेच रस्तादुभाजकातील जळालेली रोपं बाजूला काढून त्याठिकाणी नवी रोपं लावण्यात वधुपित्यानंच पुढाकार घेतला.एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशी घटना सातारा शहरातील विसावा नाका परिसरात घडली. राष्ट्रीय महामार्गापासून ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्तादुभाजकात नुकतीच काही रोपं लावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुष्कर मंगल कार्यालयात लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वरात निघताना या दुभाजकातच फटाक्याची भलीमोठी माळ पेटविली. यात शंभरपेक्षाही जास्त नाजूक रोपं अक्षरश: जळून खाक झाली. हे पाहून आजूबाजूचे नागरिक हळहळले. यातीलच एक उद्योजक प्रशांत मोदी यांना राहवले नाही. त्यांनी थेट शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनीही सातारकरांच्या भावना समजून घेऊन तत्काळ पुष्कर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाला बोलावून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो, याची जाणीव करून देताच संबंधित व्यवस्थापकानेही तातडीने संबंधित वऱ्हाडी मंडळींशी संपर्क साधला.रिझर्व्ह बँकेत कामाला असलेले वधुपिता सुभाष फडतरे यांनी पोलिस ठाण्यात चूक कबूल केली अन् जळालेल्या रोपांची नुकसानभरपाई करून देण्यासाठी याच ठिकाणी दुप्पट रोपं लावण्याचा शब्द दिला. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी रोपं लावण्यास प्रारंभ झाला. यावेळी प्रशांत मोदी, आशिष जेऊरकर, विपुल मोरे, प्रशांत पवार, अमित कांबळे, जावेद डांगे अन् सारंग गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाटल्याही जळून खाक..विसावा नाका परिसरातील रस्तादुभाजकात लावण्यात आलेली रोपं जगविण्यासाठी ‘रयत पॅरेंटस्’ परिवाराने याठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचीही सोय केली होती. या बाटल्याही फटाक्यांच्या उष्णतेमुळे जळून खाक झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा याठिकाणी बाटल्या लावण्यासाठी ही मंडळी मोठ्या जिद्दीने कामाला लागली आहेत. विशेष म्हणजे, पुष्कर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनानेही या परिसरातील रोपांना स्वत:हून रोज पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.पोलिस अधिकाऱ्यांची भावनिकताखून, मारामाऱ्यांसारख्या गंभीर प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिस खाते व्यवस्थित पुढाकार घेत नाही, अशी तक्रार बऱ्याच वेळा केली जाते. मात्र रोपांसारख्या छोट्याशा भावनिक प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी ज्या पद्धतीने संबंधितांना कामाला लावले, ते पाहून पोलिस खात्यातील भावनिकता अद्याप जिवंत असल्याचाच अनुभव सातारकरांना आला.