शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

फटाक्यानं रोपं जळाली.. वधुपित्यानं पुन्हा लावली!-- लोकमत विशेष

By admin | Updated: April 20, 2016 00:23 IST

लग्नाच्या वरातीतील प्रताप : संतप्त सातारकर पोलिस ठाण्यात पोहोचताच वऱ्हाडी मंडळीकडून तातडीनं चूक दुरुस्त :

सातारा : लग्नाच्या वरातीतील उत्साही वऱ्हाडी मंडळींनी लावलेल्या फटाक्यांमुळे रस्तादुभाजकातील शंभर रोपं जळून खाक झाली. हे पाहून हळहळलेल्या काही सर्वसामान्य सातारकरांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथं संबंधित वऱ्हाडी मंडळींना बोलावून घेताच त्यांनी जळालेली सर्व रोपं परत लावून देण्याचं कबूल केलं. लगेच रस्तादुभाजकातील जळालेली रोपं बाजूला काढून त्याठिकाणी नवी रोपं लावण्यात वधुपित्यानंच पुढाकार घेतला.एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशी घटना सातारा शहरातील विसावा नाका परिसरात घडली. राष्ट्रीय महामार्गापासून ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्तादुभाजकात नुकतीच काही रोपं लावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुष्कर मंगल कार्यालयात लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वरात निघताना या दुभाजकातच फटाक्याची भलीमोठी माळ पेटविली. यात शंभरपेक्षाही जास्त नाजूक रोपं अक्षरश: जळून खाक झाली. हे पाहून आजूबाजूचे नागरिक हळहळले. यातीलच एक उद्योजक प्रशांत मोदी यांना राहवले नाही. त्यांनी थेट शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनीही सातारकरांच्या भावना समजून घेऊन तत्काळ पुष्कर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाला बोलावून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो, याची जाणीव करून देताच संबंधित व्यवस्थापकानेही तातडीने संबंधित वऱ्हाडी मंडळींशी संपर्क साधला.रिझर्व्ह बँकेत कामाला असलेले वधुपिता सुभाष फडतरे यांनी पोलिस ठाण्यात चूक कबूल केली अन् जळालेल्या रोपांची नुकसानभरपाई करून देण्यासाठी याच ठिकाणी दुप्पट रोपं लावण्याचा शब्द दिला. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी रोपं लावण्यास प्रारंभ झाला. यावेळी प्रशांत मोदी, आशिष जेऊरकर, विपुल मोरे, प्रशांत पवार, अमित कांबळे, जावेद डांगे अन् सारंग गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाटल्याही जळून खाक..विसावा नाका परिसरातील रस्तादुभाजकात लावण्यात आलेली रोपं जगविण्यासाठी ‘रयत पॅरेंटस्’ परिवाराने याठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचीही सोय केली होती. या बाटल्याही फटाक्यांच्या उष्णतेमुळे जळून खाक झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा याठिकाणी बाटल्या लावण्यासाठी ही मंडळी मोठ्या जिद्दीने कामाला लागली आहेत. विशेष म्हणजे, पुष्कर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनानेही या परिसरातील रोपांना स्वत:हून रोज पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.पोलिस अधिकाऱ्यांची भावनिकताखून, मारामाऱ्यांसारख्या गंभीर प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिस खाते व्यवस्थित पुढाकार घेत नाही, अशी तक्रार बऱ्याच वेळा केली जाते. मात्र रोपांसारख्या छोट्याशा भावनिक प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी ज्या पद्धतीने संबंधितांना कामाला लावले, ते पाहून पोलिस खात्यातील भावनिकता अद्याप जिवंत असल्याचाच अनुभव सातारकरांना आला.