शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी चार गावांचा बावीस वर्षे लढा : जमिनीची भरपाईही नाही, शेती राहणार कोरडवाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:43 IST

धरणाच्या बांधकामास सुरुवात करताना पुनर्वसित गावांना जमिनी देण्यासाठी या गावातील शेतकºयांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर या चार गावातील शेतक-यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देमराठवाडी प्रकल्पग्रस्त , रोख रकमेची मागणी

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील शितपवाडी, जानुगडेवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द ही चार गावे २२ वर्षांपासून या धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. येथील धरणग्रस्तांच्या जमिनी पुनर्वसनावेळी काढून घेतल्या. मात्र, त्यांना त्या जमिनीची भरपाई मिळाली नाही. चार एकराचा स्लॅब लावून येथील ग्रामस्थांवर अन्याय केला आहे. शिवाय वाटप केलेल्या जमिनी कायम कोरडवाहूच राहणार आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर कायम अन्याय होणार आहे.

शितपवाडी, जानुगडेवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द या गावातील जमिनी ओलिताखाली येण्यासाठी त्यांना महिंद धरणाशिवाय पर्याय नाही. येथील शेतकऱ्यांनी वांग मराठवाडी धरणाच्या प्रकल्पातून आमची गावे वगळण्यात यावीत, यासाठी २२ वर्षे संघर्ष सुरू ठेवला आहे. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. प्रकल्पग्रस्तांना शासनाने या गावातील शेतकºयांच्या जमिनी वाटप केल्या. त्यावर प्रकल्पग्रस्तांचे उतारे झाले. मात्र, ज्या शेतक-यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकºयांना अद्याप एक रुपयासुद्धा दिला नाही आणि पाणीही नाही. त्यामुळे या गावांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. धरणाच्या बांधकामास सुरुवात करताना पुनर्वसित गावांना जमिनी देण्यासाठी या गावातील शेतकºयांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर या चार गावातील शेतक-यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाय शासनाकडेही दाद मागितली आहे. या प्रकल्पाखालील पुनर्वसित लोकांनी या गावांतील जमिनी नापीक व खडकाळ असल्याने त्या रद्द करून रोख रकमेची मागणी केली आहे.

क-हाड आणि पाटण तालुक्यातील लाभक्षेत्रामध्ये चार एकराचा स्लॅब लावून जमिनी संपादन केल्या. मात्र, या जमिनीला प्रत्यक्षात पाण्याचा लाभ मिळत नाही. कारण ४६ गावांतील शेतकऱ्यांनी वांग नदीवर बांधलेल्या बंधाºयातून स्वत:च्या खर्चाने पाणी उचलून न्यायचे आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना जमिनी मिळूनही या पाण्याचा लाभ होणार नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्यावर व ज्या शेतकºयांच्या जमिनी गेल्या आहेत. त्या शेतकºयांच्यावर अन्याय होत आहे.- जगन्नाथ विभूते, सदस्य

 

पुनर्वसन प्राधिकरण नियंत्रण समितीवांग मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्राचा चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून कृष्णा खोरे विकास महामंडळाने या चार गावांतील ग्रामस्थांवर अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात लढा सुरू असून, या गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार आहे. याअगोदर शासनाकडे व जलसंपदामंत्री यांच्याकडे या चुकीच्या सर्व्हेबाबत दाद मागितली आहे.- हिंदुराव पाटील, प्रतिनिधी ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीकपात