शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

पाण्यासाठी चार गावांचा बावीस वर्षे लढा : जमिनीची भरपाईही नाही, शेती राहणार कोरडवाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:43 IST

धरणाच्या बांधकामास सुरुवात करताना पुनर्वसित गावांना जमिनी देण्यासाठी या गावातील शेतकºयांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर या चार गावातील शेतक-यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देमराठवाडी प्रकल्पग्रस्त , रोख रकमेची मागणी

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील शितपवाडी, जानुगडेवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द ही चार गावे २२ वर्षांपासून या धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. येथील धरणग्रस्तांच्या जमिनी पुनर्वसनावेळी काढून घेतल्या. मात्र, त्यांना त्या जमिनीची भरपाई मिळाली नाही. चार एकराचा स्लॅब लावून येथील ग्रामस्थांवर अन्याय केला आहे. शिवाय वाटप केलेल्या जमिनी कायम कोरडवाहूच राहणार आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर कायम अन्याय होणार आहे.

शितपवाडी, जानुगडेवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द या गावातील जमिनी ओलिताखाली येण्यासाठी त्यांना महिंद धरणाशिवाय पर्याय नाही. येथील शेतकऱ्यांनी वांग मराठवाडी धरणाच्या प्रकल्पातून आमची गावे वगळण्यात यावीत, यासाठी २२ वर्षे संघर्ष सुरू ठेवला आहे. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. प्रकल्पग्रस्तांना शासनाने या गावातील शेतकºयांच्या जमिनी वाटप केल्या. त्यावर प्रकल्पग्रस्तांचे उतारे झाले. मात्र, ज्या शेतक-यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकºयांना अद्याप एक रुपयासुद्धा दिला नाही आणि पाणीही नाही. त्यामुळे या गावांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. धरणाच्या बांधकामास सुरुवात करताना पुनर्वसित गावांना जमिनी देण्यासाठी या गावातील शेतकºयांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर या चार गावातील शेतक-यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाय शासनाकडेही दाद मागितली आहे. या प्रकल्पाखालील पुनर्वसित लोकांनी या गावांतील जमिनी नापीक व खडकाळ असल्याने त्या रद्द करून रोख रकमेची मागणी केली आहे.

क-हाड आणि पाटण तालुक्यातील लाभक्षेत्रामध्ये चार एकराचा स्लॅब लावून जमिनी संपादन केल्या. मात्र, या जमिनीला प्रत्यक्षात पाण्याचा लाभ मिळत नाही. कारण ४६ गावांतील शेतकऱ्यांनी वांग नदीवर बांधलेल्या बंधाºयातून स्वत:च्या खर्चाने पाणी उचलून न्यायचे आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना जमिनी मिळूनही या पाण्याचा लाभ होणार नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्यावर व ज्या शेतकºयांच्या जमिनी गेल्या आहेत. त्या शेतकºयांच्यावर अन्याय होत आहे.- जगन्नाथ विभूते, सदस्य

 

पुनर्वसन प्राधिकरण नियंत्रण समितीवांग मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्राचा चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून कृष्णा खोरे विकास महामंडळाने या चार गावांतील ग्रामस्थांवर अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात लढा सुरू असून, या गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार आहे. याअगोदर शासनाकडे व जलसंपदामंत्री यांच्याकडे या चुकीच्या सर्व्हेबाबत दाद मागितली आहे.- हिंदुराव पाटील, प्रतिनिधी ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीकपात