शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

मैदान रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

सातारा : साताऱ्यातील गांधी मैदानावर विक्रेत्यांनी फुलला होता. राजवाडा, देवी चौक दरम्यानच्या रस्त्यावरील विक्रेत्यांना गांधी मैदानावरील रिकाम्या जागेत हलविण्यात ...

सातारा : साताऱ्यातील गांधी मैदानावर विक्रेत्यांनी फुलला होता. राजवाडा, देवी चौक दरम्यानच्या रस्त्यावरील विक्रेत्यांना गांधी मैदानावरील रिकाम्या जागेत हलविण्यात आले होते. त्यामुळे सणाच्या काळात रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत झाली होती. परिसर कायम गजबजलेला असायचा. तो शांत झाला आहे.

सिग्नलची आवश्यकता

सातारा : साताऱ्यातील मोळाचा ओढा येथून एक रस्ता पुण्याकडे तर एक रस्ता महाबळेश्वरकडे गेला आहे. या ठिकाणी सुसाट वाहने अचानक ट्रॅक बदलून पुण्याकडे वळतात. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

मंदिरे अजूनही बंदच

सातारा : राज्य शासनाने कोरोनानंतर बंद केलेली मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे एकीकडे समाधानाचे वातावरण असले तरी कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन काही मंदिरे अजूनही बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतलेला आहे.

मंडईजवळच कचरा

कोरेगाव : कोरेगाव शहरातील आझाद चौकात असलेल्या भाजी मंडईजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साठत आहे. संबंधित कचरा उचलला जात नसल्याने तेथेच भाजीविक्री केली जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शक्यता गृहीत धरुन कचरा हटवावा, अशी मागणी केली जात आहे.

खंबाटकी घाटात प्रखर दिव्यांची मागणी

सातारा : साताऱ्याकडून पुण्याकडे जाण्याच्या मार्गात खंबाटकी बोगदा लागतो. या बोगद्यातूनच दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र अनेक दिवस झालेले असल्याने घाटात मध्यभागात गेल्यानंतर प्रकाश कमी झाल्याचे जाणवत असते. त्यामुळे काही अंतरावरचेही दिसत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी प्रखर प्रकाशाचे दिवे बसविण्याची मागणी होत आहे.

खड्डेमुक्तीमुळे समाधान

वडूज : खटाव तालुक्यातील बहुतांशी मुख्य रस्त्यावरील खड्डे मुजविल्याने चालकांसहित वाहनधारकांना होणारा शारीरिक व आर्थिक त्रासाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, तर संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने चांगली सोय झाली आहे.

रिक्षा वाहतूक धोक्याची

सातारा : साताऱ्यातील नागरिक शहरातील प्रवासासाठी रिक्षाचा आधार घेत आहेत. मात्र, साताऱ्यातील अनेक रिक्षाचालक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना वाहन चालविणे कितपत चांगल्या पद्धतीने जमते याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांना किती अंतरावरचे दिसते हाही प्रश्न निर्माण होत आहे.

बेसुमार उत्खनन

सातारा : सातारा शहर परिसरात बेसुमार वाळू उत्खनन केले जात आहे. त्यामुळे भविष्यात निसर्गाची मोठ्या प्रमाणावर समस्या उद्भवू शकते. यामुळे डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहे. हे उत्खनन थांबविण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.

रात्रगस्तीची मागणी

सातारा : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मद्यपान करून वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. हे तरुण पिढीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रात्रगस्त वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे.

तळ्यांतील पाणी दूषित

सातारा : सातारा शहरात पूर्वीपासून पाणीपुरवठ्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी ठिकठिकाणी तळी तयार केली आहेत. मात्र, त्याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे तळ्यांमधील पाणी हिरवे पडले आहे. त्याचा फटका त्यातील माशांना बसत असून ते मृत्युमुखी पडत आहेत.

टोलनाक्यावर वाहनचालकांची तपासणी

सातारा : अनेक तरुण मद्यपान करून वाहने चालवत असतात. यातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहनचालकांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर काही दिवसांपासून कसून तपासणी केली जात आहे.

पत्रपेटीची सोय

सातारा : बदलत्या काळानुसार मोबाईल क्रांती झाली अन् टपाल सेवेचा वापर कमी झाला, पण तरीही साताऱ्यातील टपाल कार्यालयाने मंगळवार तळे परिसरात पत्राची पेटी बसवली आहे. या परिसरात कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी त्यात टपाल आले का, हे पाहत असतात.