शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

एका वर्षाचा ‘गेमप्लॅन’ अन् यशाला गवसणी, ‘लोकमत’मधून प्रेरणा मिळाल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 06:45 IST

‘विद्या तोच भाग्यवंत’ या उक्तीला मूर्तरुप देणारा प्रसाद चौगुले हा महावितरण कंपनीमधील आॅपरेटरचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी झाला.

सागर गुजर सातारा : क-हाडातील विद्यानगरीत वास्तव्य करून ‘विद्या तोच भाग्यवंत’ या उक्तीला मूर्तरुप देणारा प्रसाद चौगुले हा महावितरण कंपनीमधील आॅपरेटरचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात उपजिल्हाधिकारी झाला. संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याची किमयाही केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रसादचे यश प्रेरणा देणारे आहे.

अधिकारी होण्याचे ध्येय पूर्वीपासूनच होते काय?शालेय शिक्षण घेत असतानाच नवोदय विद्यालयात सामान्य ज्ञानाचा पाया पक्का झाला. प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा तेव्हापासूनच होती. सनदी अधिकारी लोकांसाठी वजावत असलेल्या सेवेच्या ‘लोकमत’मध्ये आलेल्या बातम्या वाचून त्यातून अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली.घरातील आर्थिक परिस्थिती कशी होती?माझ्या घरातील आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. आई, वडील, मी आणि माझ्या दोन बहिणी, असं आमचं कुटुंब. वडील वीज कंपनीत आॅपरेटर म्हणून काम करतात. मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावं, ही त्यांची इच्छा तिन्ही भावंडांनी अभियांत्रिकीची पदवी घेऊन पूर्ण केली.स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात राहून तयारी कशी केली?इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच माझी फियाट कंपनीमध्ये निवड झाली होती. एक वर्ष या नोकरीतून पैसे साठवले. हे पैसे जवळ होते. त्यातूनच पुस्तके खरेदी केली. क्लास लावला. या क्लासमध्ये भाऊजी प्रमोद चौगुले यांचे मला मार्गदर्शन लाभले.स्पर्धा परीक्षेचा एका वर्षातील गेम प्लॅन कसा होता?एकाच वर्षात यशस्वी व्हायचा असा गेम प्लॅन मी अभ्यास करताना आखला होता. स्पर्धा परीक्षा देणाºया युवक-युवतींनी परीक्षेची प्रत्येक संधी ही शेवटची आहे, असा विचार करून अभ्यास केला पाहिजे.>अभ्यासाची बैठक ठरली फायद्याचीमाझ्याकडे बुद्धी हेच भांडवल होते. अभ्यास करताना कधीही कंटाळा केला नाही. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना तर अत्यंत मन लावून अभ्यास केला. अभ्यासाची हीच बैठक पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाही फायद्याची ठरली. खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असताना देखील रूमवर पोहोचल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायचो.>शालेय शिक्षणातच स्पर्धात्मक तयारीखावली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयात शालेय शिक्षण घेत असतानाच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी झाली. स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत होण्यासाठी येथील वास्तव्य फायद्याचे ठरले. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक असे मोठे अधिकारी शाळेत येऊन आपले मनोगत व्यक्त करायचे. त्यांच्या अमोघ वाणीतूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची ऊर्जा मिळाली.>आर्थिक परिस्थिती बेताची असूनही आई-वडिलांनी आम्हा तिन्ही भावंडांना अभियांत्रिकीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांच्यावर आर्थिक ताण येऊ नये, याची काळजी घेतली. नोकरी करुन पैसे साठवले.-प्रसाद चौगुले,उपजिल्हाधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम