शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

ऊसदरावरच ठरणार यंदाच्या हंगामाचे भवितव्य

By admin | Updated: November 1, 2015 00:05 IST

जिल्ह्यात गाळपाचा शुभारंभ : एकरकमी दर देण्याची शेतकऱ्यांची कारखान्यांकडे मागणी

वाठार स्टेशन : दसऱ्याच्या मुहूर्तावर अग्निप्रदीपन झाल्यानंतर गाळप हंगामासाठी सर्वच कारखाने सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात चालू हंगामात ६८ ते ७० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट राहणार असून यासाठी जिल्ह्यातील एकूण १३ कारखान्यांनी साखर आयुक्ताकडे गाळप हंगामाचा परवाना मागितला आहे. आत्तापर्यंत न्यू फलटण शुगर व स्वराज इंडिया या कारखान्यांनी गाळपाचा शुभारंभ केला आहे, तर उर्वरीत ११ कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. गत वर्षीच्या गाळप हंगामात ऊसदराबाबत झालेली शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पहाता चालू वर्षी ऊसदराबाबत शासनाची भूमिका काय राहणार? याबाबत शासन मध्यस्थी करणार का, हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. केंद्राने जाहीर करुनही जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कारखान्यांनी अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. असे असताना आता नवीन गाळप हंगामाचा प्रारंभ झाला आहे. चालू हंगामासाठी शासनाने ९.५० साखर उताऱ्यासाठी २३०० व पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २४२ याप्रमाणे एफआरपी जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या हंगामात १२ ते १३ असा साखर उतारा राहिला आहे. तोडणी वाहतून ५५० रुपये खर्च वजा जाता चालू हंगामात २५०० रुपयापर्यंत दर कारखान्यांना द्यावा लागणार आहे. हा दर एकरकमी मिळावा, ही शेतकऱ्यांची व शेतकरी संघटनांची भूमिका आहे, मात्र हा दर तीन टप्प्यात देण्याबाबत कारखानदार विचाराधिन आहेत. (वार्ताहर) वाढती कारखानदारी अन् दराची स्पर्धा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आजही दुष्काळी परिस्थिती भीषण असल्यामुळे उसाच्या क्षेत्रात व उत्पादनात घट होणार आहे. अशा परिस्थितीत अनेक खासगी कारखाने ऊस मिळविण्यासाठी ऊस उत्पादकांना खुश करण्याची भूमिका घेतील. काही खासगी कारखान्यांकडून काटा पेमेंट देण्याच्या हालचाली सुरु आहेत. एकूणच वाढलेल्या खासगी कारखानदारीमुळे असणारे ऊसक्षेत्र या कारखान्यांना कमी पडणार आहे. यासाठी कारखान्यांना ऊसदराच्या स्पर्धेत उतरावे लागणार, हे निश्चित आहे. ...अन्यथा शेवटच्या टप्प्यात उसाची होणार पळवापळवी चालू हंगामात जिल्ह्यातील असणाऱ्या प्रतिदिन गाळप क्षमतेत १५ ते २० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप अधिक होणार असल्याने या हंगामात एकूण १३ कारखान्यांतून जवळपास ५० हजार मेट्रिक टन गाळप प्रतिदिन अधिक होणार आहे. यामुळे अंतिम टप्प्यात उसाची पळवापळवी होणार आहे. २०१४-१५ या हंगामात ज्या कारखान्यांनी समाधानकारक ऊसदर दिला आहे, त्यांनाच ऊस देण्याची शेतकऱ्यांची भूमिका राहणार आहे. अन्यथा उसाअभावी कारखाने अडचणीत येण्याची परिस्थिती असणार आहे.