शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मलकापूरसह परिसरात शेतकऱ्यांची कामे खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी ...

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी साचल्याने भाजीपाल्यासह भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला शेतकऱ्यांना अतिपाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून भाजीपाला पिकांचे जतन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा पद्धतीने शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी रोजच सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील बहुतांशी शेतांत पाणी साचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीसह टोकणीची कामे खोळंबली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी टोकणीसह पेरणीही केली. मात्र सततच्या पावसाने दलदल निर्माण झाल्यामुळे अंतर्गत मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. महामार्ग पश्चिम बाजू व नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. या भागात पेरलेले भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्याच पद्धतीने मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगाव परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय व भेंडी, गवारीसारख्या शेंगवर्गीय भाज्यांची पिके घेतली जातात. सततची रिपरिप सुरू असल्यामुळे पालेभाज्याची पिके रानातच कुजत आहेत. तर अनेक पर्यायकरून जतन केलेल्या पिकांवर ढगाळ वातावरण व धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत आहे. गेली आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे रानात पाणीच पाणी झाल्याने या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चौकट (फोटो आहे.)

पाण्यामुळे उसाची वाढ खुंटली...

नदीकाठचा परिसर म्हटलं की ऊसशेती आलीच. त्यामुळे मलकापूरसह आसपासच्या गावांत उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. अतिपावसामुळे उसाच्या रानात पाणी साचून अनेक ठिकाणी ऊसपीक भुईसपाट झाले आहे. ऊसतोडीनंतर काही शेतकऱ्यांनी खोडवा जतन केला, अशा शेतात गुडघाभर पाणी असल्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. तर काही शेतकऱ्यांनी लागणीसाठी तयार केलेल्या रानात दलदल असल्यामुळे लागणीची कामेही खोळंबली आहेत.

२७मलकापूर

नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया : माणिक डोंगरे)

===Photopath===

270621\img_20210627_143638.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

महामार्ग पश्चिम बाजू , नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगांव च्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीचपाणी साचल्यामुळे पाण्या-पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया- माणिक डोंगरे)