शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

मलकापूरसह परिसरात शेतकऱ्यांची कामे खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी ...

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी साचल्याने भाजीपाल्यासह भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला शेतकऱ्यांना अतिपाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून भाजीपाला पिकांचे जतन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा पद्धतीने शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी रोजच सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील बहुतांशी शेतांत पाणी साचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीसह टोकणीची कामे खोळंबली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी टोकणीसह पेरणीही केली. मात्र सततच्या पावसाने दलदल निर्माण झाल्यामुळे अंतर्गत मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. महामार्ग पश्चिम बाजू व नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. या भागात पेरलेले भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्याच पद्धतीने मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगाव परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय व भेंडी, गवारीसारख्या शेंगवर्गीय भाज्यांची पिके घेतली जातात. सततची रिपरिप सुरू असल्यामुळे पालेभाज्याची पिके रानातच कुजत आहेत. तर अनेक पर्यायकरून जतन केलेल्या पिकांवर ढगाळ वातावरण व धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत आहे. गेली आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे रानात पाणीच पाणी झाल्याने या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चौकट (फोटो आहे.)

पाण्यामुळे उसाची वाढ खुंटली...

नदीकाठचा परिसर म्हटलं की ऊसशेती आलीच. त्यामुळे मलकापूरसह आसपासच्या गावांत उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. अतिपावसामुळे उसाच्या रानात पाणी साचून अनेक ठिकाणी ऊसपीक भुईसपाट झाले आहे. ऊसतोडीनंतर काही शेतकऱ्यांनी खोडवा जतन केला, अशा शेतात गुडघाभर पाणी असल्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. तर काही शेतकऱ्यांनी लागणीसाठी तयार केलेल्या रानात दलदल असल्यामुळे लागणीची कामेही खोळंबली आहेत.

२७मलकापूर

नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया : माणिक डोंगरे)

===Photopath===

270621\img_20210627_143638.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

महामार्ग पश्चिम बाजू , नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगांव च्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीचपाणी साचल्यामुळे पाण्या-पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया- माणिक डोंगरे)