शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मलकापूरसह परिसरात शेतकऱ्यांची कामे खोळंबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी ...

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेली काही दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पावसाची रिपरिप सुरूच आहे. शेतात पाणीच पाणी साचल्याने भाजीपाल्यासह भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूला शेतकऱ्यांना अतिपाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून भाजीपाला पिकांचे जतन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा पद्धतीने शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.

काही दिवसांपूर्वी रोजच सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील बहुतांशी शेतांत पाणी साचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीसह टोकणीची कामे खोळंबली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी टोकणीसह पेरणीही केली. मात्र सततच्या पावसाने दलदल निर्माण झाल्यामुळे अंतर्गत मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. महामार्ग पश्चिम बाजू व नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. या भागात पेरलेले भाताचे पीक धोक्यात आले आहे. त्याच पद्धतीने मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगाव परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय व भेंडी, गवारीसारख्या शेंगवर्गीय भाज्यांची पिके घेतली जातात. सततची रिपरिप सुरू असल्यामुळे पालेभाज्याची पिके रानातच कुजत आहेत. तर अनेक पर्यायकरून जतन केलेल्या पिकांवर ढगाळ वातावरण व धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत आहे. गेली आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे रानात पाणीच पाणी झाल्याने या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चौकट (फोटो आहे.)

पाण्यामुळे उसाची वाढ खुंटली...

नदीकाठचा परिसर म्हटलं की ऊसशेती आलीच. त्यामुळे मलकापूरसह आसपासच्या गावांत उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. अतिपावसामुळे उसाच्या रानात पाणी साचून अनेक ठिकाणी ऊसपीक भुईसपाट झाले आहे. ऊसतोडीनंतर काही शेतकऱ्यांनी खोडवा जतन केला, अशा शेतात गुडघाभर पाणी असल्यामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होत आहे. तर काही शेतकऱ्यांनी लागणीसाठी तयार केलेल्या रानात दलदल असल्यामुळे लागणीची कामेही खोळंबली आहेत.

२७मलकापूर

नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगावच्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीच पाणी साचल्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया : माणिक डोंगरे)

===Photopath===

270621\img_20210627_143638.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

महामार्ग पश्चिम बाजू , नारायणवाडी गावच्या परिसरात व आगाशिवनगरसह चचेगांव च्या नदीकडेच्या शेतकऱ्यांच्या शेतातही पाणीचपाणी साचल्यामुळे पाण्या-पाण्यामुळे पेरलेली पिके पिवळी पडत आहेत. (छाया- माणिक डोंगरे)