शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Satara: धरणातील पाणी चोरी थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागात धडक, जिहे-कटापूर योजनेबाबतही आक्रमक पवित्रा

By नितीन काळेल | Updated: January 23, 2024 18:58 IST

जिल्हाधिकारी आज निर्णय घेणार..

सातारा : जिहे-कठापूर योजना चारमाही असून पावसाळ्यात पाणी उचलण्याची परवानगी आहे. तरीही सध्या बेकायदेशीररित्या पाणी उपसा सुरू आहे. तर कण्हेर, धोम, उरमोडी धरण लाभक्षेत्रात दुष्काळ असतानाही पाणी चोरले जात आहे ते थांबवावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागात धडक मारुन आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आश्वासन दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सातारा, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह अर्जूनभाऊ साळुंखे, मनोहर येवले, रमेश पिसाळ, राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, राजेंद्र शेडगे, बजरंग कणसे, वसिम इनामदार, धोम संघर्ष समितीचे सदस्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.जिहे-कठापूर पाणी योजना ही पावसाळ्यात राबवायची आहे. पावसाळ्यात कृष्ण नदीपात्रातून वाहून जाणारे ३.१७ टीएमसी पाणी दुष्काळी भागासाठी आहे. खरीप हंगामापर्यंतच हे पाणी उचलण्याची परवानगी असताना पाटबंधारे विभागाने पूर्वीही बेकायदेशीररित्या पाणी योजनेसाठी सोडले होते. त्यावेळी आम्ही आंदोलन केले. राष्ट्रीय संपत्तीची चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. परंतु, आतापर्यंत कारवाईसाठी सोयस्कररित्या टाळाटाळ करण्यात करण्यात आली. असे असतानाच पुन्हा जिहे-कठापूर योजनेसाठी १९ जानेवारीपासून बेकायदा पाणी उपसा सुरू करण्यात येत आहे. बेकायदेशीररित्या जाणारे हे पाणी ताबडतोब बंद करावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी साताऱ्यातील कृष्णानगरच्या पाटबंधारे विभागात मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनास सुरूवात केली. तसेच कार्यालयाच्या समोरील जागेत ठिय्या मांडला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात सुरूवात केली.शेतकऱ्यांच्या या पवित्र्यानंतर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन शेतकऱ्यांशी बोलणी सुरू केली. पण, शेतकरी पाणी थांबविल्याशिवाय माघार घेणार नाही या मागणीवर ठाम होते. तसेच टंचाई असताना कण्हेर, उरमोडी, धोम धरणातून आमच्या हक्काची पाण्याची चोरी होत आहे हेही थांबवा, असाही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर दुष्काळाने शेतकरी होरपळला असून आता हक्काचे पाणी चोरण्याने पिके वाया जाणार आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहे, याला अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला. तसेच मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले.

जिल्हाधिकारी आज निर्णय घेणार..सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने आंदोलनकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लेखी आश्वासन दिले आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांच्या मागण्या आणि जिहे-कटापूर पाणी योजनेविषयी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च्या कार्यालयात बुधवार, दि. २४ रोजी सकाळी सवा दहाला बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. आता बुधवारच्या या बैठकीत धरणांतील आणि जिहे-कठापूर पाणी योजनेबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी