शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST2021-08-26T04:41:49+5:302021-08-26T04:41:49+5:30

-राजेंद्र कणसे, शेतकरी बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून ...

Farmers' expenses did not go up ... | शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

-राजेंद्र कणसे, शेतकरी

बाजार समितीत आम्ही शेतमाल नेतो; पण तेथे कमीच दर मिळतो. कारण, बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांपासून कोबी, टोमॅटो, बटाट्याला दर कमीच मिळत आहे; पण बाजारात विकताना तो अधिक किमतीने जातो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.

-रामचंद्र पाटील, शेतकरी

ग्राहकांना परवडेना...

कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई वाढतच चालली आहे. कधी गॅस सिलिंडर टाकीचे दर वाढतात, तर कधी साहित्याचा भाव वाढतो. त्यातच भाजीपालाही आवाक्याबाहेर आहे. कोणतीही भाजी घ्या ४० रुपये किलोच्या पुढेच मिळत आहे.

-किरण पठारे, ग्राहक

...................................

मागील तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेलेच आहेत. फक्त कोबी आणि टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत, तर वाटाणा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मिळतोय, तसेच इतर भाज्यांचे दरही टिकून आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

-सदाशिव काळे, ग्राहक

भावात फरक...

बाजार समितीत शेतकरी भाजीपाला आणतात. तेथे मालाचे दर कमी निघतात; पण हाच माल किरकोळ विक्रेत्यांना व्यापारी विकतात. त्यामुळे विक्रेते हे आपल्याला परवडेल अशा पद्धतीने विकत असतात. त्यामुळे भाज्यांच्या दरात शेतकऱ्यांपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत दर वाढत गेलेले असतात.

...

Web Title: Farmers' expenses did not go up ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.