शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबाला मिळणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरोना महामारीतून सावरण्यासाठी ईएसआयसीने कामगारांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ईएसआयसीकडून नोंदणीकृत असणारा कामगार जर कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोना महामारीतून सावरण्यासाठी ईएसआयसीने कामगारांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ईएसआयसीकडून नोंदणीकृत असणारा कामगार जर कोरोनामुळे मृत्युमुखी पडला तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना अवलंबित्व लाभ हा पेन्शन स्वरूपात मिळणार आहे.

ही योजना २४ मार्च २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. ती २३ मार्च २०२२ पर्यंत योजना लागू असेल. यासाठी सदर कामगार कोरोनाचे निदान झालेल्या दिवसाआधी ३ महिने ईएसआयसीकडे नोंदणीकृत असावा. तसेच निदान झाल्यावेळी तो नोकरीवर असावा व त्याने कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टच्या १ वर्ष अगोदर ७० दिवसांचे अंशदान भरलेले असावे.

पात्र कामगारांच्या कुटुंबीयांना सीआरएस हा अर्ज मृत्यू प्रमाणपत्र व कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टसहित आपल्या ईएसआयसी शाखेमध्ये जमा करावा, असे आवाहन ईएसआयसीने केले आहे. अधिकची माहिती ईएसआयसीच्या संकेस्थळावर देण्यात आलेली आहे.

कोरोना महामारीत अनेक कामगारांना देखील गाठले. अनेक जण कोरोनाच्या रजेवर देखील गेले. अनेकांना मृत्यूने गाठले. अनेक कामगारांची कुटुंबे उघड्यावर पडली. या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राहत योजना सुरू करण्यात आली. संबंधित कामगाराला जेवढे वेतन मिळत होते, त्याच्या ९० टक्के पगार प्रतिमाह कामगारांच्या कुटुंबीयांना दिले जाणार आहे. कामगारांच्या कुटुंबीयांनी दावा केल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित वारसाच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत.

कोट..

कोरोनाला बळी पडलेल्या विमीत कामगाराच्या पात्र कुटुंबीयांना या योजनेचा फायदा मिळेल. यासाठी संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांनी तत्काळ अर्ज करावा.

-हेमंतकुमार पांडे, प्रभारी उपनिदेशक, पुणे विभाग