शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाशी चर्चा निष्फळ; सातारा जिह्यातील धरणग्रस्त आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:41 IST

तामकणे गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला चुकीची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्दे नाथाची पाग प्रकरण : सातारा जिह्यातील धरणग्रस्त आंदोलनात सहभागी होणारआंदोलन मागे घेतो; पण पाणी योजनेचे काम थांबवत असल्याचे पत्र द्या,

सातारा : तामकणे गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला चुकीची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याशी धरणग्रस्तांनी चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने श्रमिक मुक्ती दलातर्फे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाथाची पाग या कोयना धरणातील धरणग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाचा १० वा दिवस होता. सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.

या चर्चेवेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर यांनी नाथाची पाग येथील पाणी योजना मंजूर करताना चुकीच्या पद्धतीने तांत्रिक मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना रद्द करावी व दुसºया जवळच्या पाण्याच्या उद्भवापासून म्हणजेच चिटेघर धरण किंवा केरा नदीवरून पाणी योजना तामकणे गावासाठी करावी, अशी भूमिका मांडली. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ही योजना पूर्ण करण्याबाबत पालकमंत्र्यांचे आदेश असून, ती योजना कुठल्याही परिस्थितीत बंद करता येणार नाही, असे स्पष्ट केले. तर धरणग्रस्तांनी सूचविलेल्या जागेतून योजना करायची झाल्यास तिचा खर्च वाढेल, असे मत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी मांडले.

तसेच पालकमंत्री व संबंधित आमदारांच्या उपस्थितीत बैठक लावून निर्णय घेता येईल, असेही स्पष्ट केले. दोन आठवड्यानंतर नियोजन समितीची बैठक घेण्यात येण्यात येणार आहे, या बैठकीत निर्णय होईल, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याची सूचना जिल्हाधिकाºयांनी केली.आंदोलन मागे घेतो; पण पाणी योजनेचे काम थांबवत असल्याचे पत्र द्या, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली.

मात्र, प्रशासनाने त्याला स्पष्ट नकार दिल्याने धरणग्रस्त कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट करत धरणग्रस्त चर्चेतून बाहेर पडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी परतलेल्या धरणग्रस्तांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी चैतन्य दळवी, अ‍ॅड. व्यासदेव शेळके, जयराम शेळके, कृष्णात शेळके, सचिन शेळके आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण