शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सातारा जिल्ह्यातील कारखाने ऊसाच्या गाळपात पुढे; दर देण्यात मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 19:20 IST

साखर उताराही चांगला; जिल्ह्यातील तीन कारखाने टॉप टेनमध्ये

ठळक मुद्देसाखर उताराही चांगलाजिल्ह्यातील तीन कारखाने टॉप टेनमध्ये

सातारा : ऊस गाळपामध्ये राज्यातील कारखान्यांच्या यादीत दहावा क्रमांक पटकावलेल्या सातारा जिल्ह्यातील कारखाने शेतकऱ्यांना दर देण्यात मात्र मागच्या पायावर आहेत. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी १४४ दिवस गाळप हंगाम करून ९९ लाख ८ हजार २१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले, त्यातून १ कोटी ११ लाख ६३ हजार ४२० क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ११.२७ टक्के इतका राहिला आहे.जरंडेश्वर कारखान्याने जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त १४ लाख ३८ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले त्यातून १६ लाख ५६ हजार १५० क्विंटल साखर निर्मिती केली. कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यामध्ये पहिल्या दहा कारखान्यांच्या यादीत सहावा क्रमांक मिळवला असून तब्बल १२.६७ टक्के साखर उतारा मिळवला आहे.शेतकऱ्यांना दर देण्याच्या बाबतीत कारखान्यांनी आखडता हात घेतल्याचे पाहायला मिळते. साखर निर्मिती आणि उताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कारखाने सर्वात पुढे असले तरी शेतकऱ्यांना ऊसाचा दर देण्यामध्ये मागे पडले. राज्यातील ज्या दहा कारखान्यांनी शेतकऱ्यांना चांगला दर दिला त्या १० कारखान्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांपैकी एकाही कारखान्याचे नाव नाही. कोरोनाचे संकट असतानादेखील साताऱ्यातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत.

जिल्ह्यातील सह्याद्री, कृष्णा, जरंडेश्वर हे कारखाने गाळपमध्ये पुढे असले तरी कुठल्याही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची पूर्णपणे एफआरपी दिलेली नाही. किसनवीर कारखान्याने तर अनेक वर्षांपासून एफ आर पी थकवलेली आहे. तीन वर्षे सतत या कारखान्याला साखर आयुक्तांमार्फत नोटीस बजावली जाते; परंतु कुठल्याही प्रकारची वसुली होत नाही.राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र