शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

आनंदाच्या शिधाचा नाही पत्ता; गौरी-गणपतीचा सण तीन आठवड्यावर, गोरगरिबांसमोर मोठा प्रश्न उभा

By दीपक देशमुख | Updated: August 5, 2025 16:51 IST

लोकानुनय करणाऱ्या घोषणा करताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागत असल्याने सरकारची दमछाक

दीपक देशमुखसातारा : गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन आठवड्यावर आले तरी शासनाकडून आनंदाच्या शिधाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा शिधा मिळणार काय ? असा सवाल गोरगरीब जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. शासनाने ऐनवेळी घोषणा केल्यास शासनाच्या वितरण व्यवस्थेवरही मोठा ताण येणार असून, सण संपल्यानंतर लोकांच्या हाती शिधा पडणार आहे. त्यामुळेच वेळीच निर्णय करून गरिबांचा सण गोड करावा, अशी मागणी होत आहे.शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने वर्षभरातील महत्त्वाच्या सण - उत्सवात लाभार्थींना शंभर रुपयात आनंदाच्या शिधाचे वितरण करण्यात येते. गेल्यावर्षी गौरी-गणपतीचा सण ७ सप्टेंबर २०२४ रोजी होता. त्यावेळी आनंदाचा शिधा देण्याचा शासननिर्णय जवळपास दोन महिने अगोदर दि. १२ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला होता. तरीही सणादिवशी अनेकांना शिधा मिळाला नाही. पितृ पंधरवडा संपल्यानंतरही वाटप सुरूच होते. म्हणजेच जिल्ह्यातील सुमारे ४ लाख शिधासंच वाटपाला दोन महिनेही अपुरे पडले. यंदा ४.२८ कार्डधारक आहेत. गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला असून, तीन आठवडे उरलेत. तरीही शिधाची अधिकृत घोषणा झालेली नाही. ऐनवेळी घोषणा केल्यास वाटपाचे नियोजन करून शिधा हाती पडायला उशिर होणार आहे. त्यामुळे गरिबांचा सण शासन गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित आहे.

शासनाची दमछाकलोकानुनय करणाऱ्या घोषणा करताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागत असल्याने सरकारची दमछाक होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. याच आर्थिक ताणामुळे अनेक शासकीय कामांची बिले रखडल्याचा आरोप होत आहे. आता ‘आनंदाचा शिधा’ रखडतोय का, असा सवाल उपस्थित होत असून, नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

प्रशासनावरही ताण आनंदाच्या शिधाच्या निविदा, शिधा जिन्नसाचा संच बनवणे, प्रत्येक जिल्ह्यातील गोदामात पोहोच करणे आणि तेथून स्वस्त धान्य दुकानापर्यंत नेण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. मात्र, ऐनवेळी घोषणा केल्यास 'आनंदाचा शिधा' वेळेत देणे शक्य होणार नाही.मागील शिधासंचातील जिन्नस शंभर रुपयातयोजना जाहीर झाल्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांकडून आनंदाचा शिधा शंभर रुपयात देण्यात येतो. यामध्ये प्रत्येकी एक किलो चणाडाळ, साखर, रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल असा शिधासंच मिळतो.