शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

ंमिनिट उशीर झाला तरी परीक्षेला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:24 IST

गोडोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश मिळणार नाही. तसेच परीक्षेची वेळ संपेपर्यंत परीक्षा दालनातच बसून राहावे लागणार आहे. राज्य माध्यमिक व ...

गोडोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश मिळणार नाही. तसेच परीक्षेची वेळ संपेपर्यंत परीक्षा दालनातच बसून राहावे लागणार आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने झटपट परीक्षा देऊन पळ काढणाºया आणि परीक्षेला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला. या निर्णयाचा काहीसा ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.दहावी, बारावी परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्यावर्षी राज्यात गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी आगामी परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परीक्षेसाठी उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याच्या निर्णयासोबतच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गातच बसून राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेचा विचार करता मंडळाने परीक्षेला उपस्थित राहण्याच्या नियमात बदल करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधीसाठी वर्गातून बाहेर जाता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं आधी प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात येते, तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो; पण आता परीक्षेची वेळ सुरू झाली की विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. यापूर्वी परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्धातासापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र उशिरा येणाºया विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करून ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत.परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना केवळ स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी आहे. त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार होणार नाही, याची जबाबदारी पर्यवेक्षकांची राहील, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .दरम्यान, शिक्षकांनी या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळेत गैरप्रकार करतात. या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असाही सूर उमटायला लागला आहे.गैरप्रकारांना नक्की आळा बसेलगतवर्षी झालेल्या काही गैरप्रकारामुळे माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे नक्कीच गैरप्रकारांना आळा बसेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांचे उशिरा येण्याचे कारण खरच योग्य असेल तर त्यांनाही प्रवेश दिला जाईल. तरीही विद्यार्थी पालकांनी वेळेत कसे पोहोचू याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपप्राचार्य विजयकुमार पिसाळ यांनी केले.