शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

ंमिनिट उशीर झाला तरी परीक्षेला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:24 IST

गोडोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश मिळणार नाही. तसेच परीक्षेची वेळ संपेपर्यंत परीक्षा दालनातच बसून राहावे लागणार आहे. राज्य माध्यमिक व ...

गोडोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश मिळणार नाही. तसेच परीक्षेची वेळ संपेपर्यंत परीक्षा दालनातच बसून राहावे लागणार आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने झटपट परीक्षा देऊन पळ काढणाºया आणि परीक्षेला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला. या निर्णयाचा काहीसा ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.दहावी, बारावी परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्यावर्षी राज्यात गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी आगामी परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परीक्षेसाठी उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याच्या निर्णयासोबतच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गातच बसून राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेचा विचार करता मंडळाने परीक्षेला उपस्थित राहण्याच्या नियमात बदल करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना नैसर्गिक विधीसाठी वर्गातून बाहेर जाता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटं आधी प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात येते, तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो; पण आता परीक्षेची वेळ सुरू झाली की विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. यापूर्वी परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्धातासापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र उशिरा येणाºया विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करून ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत.परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना केवळ स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी आहे. त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार होणार नाही, याची जबाबदारी पर्यवेक्षकांची राहील, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .दरम्यान, शिक्षकांनी या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळेत गैरप्रकार करतात. या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असाही सूर उमटायला लागला आहे.गैरप्रकारांना नक्की आळा बसेलगतवर्षी झालेल्या काही गैरप्रकारामुळे माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे नक्कीच गैरप्रकारांना आळा बसेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांचे उशिरा येण्याचे कारण खरच योग्य असेल तर त्यांनाही प्रवेश दिला जाईल. तरीही विद्यार्थी पालकांनी वेळेत कसे पोहोचू याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपप्राचार्य विजयकुमार पिसाळ यांनी केले.