शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

अस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 14:11 IST

Rain Flood Satara :सातारा जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसं हिरावून नेली. कष्टानं उभं केलेलं घर, पेरलेलं पीक अन पाळीव जनावरं मातीत गाडली गेली. एवढं सारं झालं असलं तरी राजकीय नेते मंडळी, प्रशासन अन् सजग नागरिकांमुळे जगलेली माणसं पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतायत!

ठळक मुद्देअस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांना विविध सेवाभावी संस्थाकडून मदतीचा ओघ सुरु

सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसं हिरावून नेली. कष्टानं उभं केलेलं घर, पेरलेलं पीक अन पाळीव जनावरं मातीत गाडली गेली. एवढं सारं झालं असलं तरी राजकीय नेते मंडळी, प्रशासन अन् सजग नागरिकांमुळे जगलेली माणसं पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतायत!जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने मदत कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखा येथे करण्यात आली आहे. या शाखेचे पथक प्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते या असून जिल्ह्यातील सामाजिक संघटना, संस्था तसेच नागरिकांनी मदत दयावयाची असेल त्यांनी जिल्हा पुरवठा शाखेत मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले, त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहचणे आवश्यक असल्याने बिस्कीट, चिवडा, फरसाण, राजगिरा लाडू या स्वरुपामध्ये स्नॅक्स तसेच साखर, तांदूळ, आटा, डाळ, तेल, तिखट, मीठ इतर कोरडा शिधा तसेच ब्लँकेट, चादरी, टॉवेल, ताडपत्री अशा स्वरुपाची मदत करण्याचे आवाहन कक्षामार्फत करण्यात आले होते.जिल्ह्यातील सामाजिक संघटना व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसादानंतर जमा झालेल्या मदत तातडीने पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यात पाठविण्यात आली आहे. मदत ही संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत गरजूंना वाटप करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून २४ जुलै च्या शासन निर्णयानुसार पुरबाधीत कुटुंबांना प्रतीकुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर कोरोसीनचेही वाटप करण्या आले आहे. वाटप हे ग्रामदक्षता समिती सदस्यांसमोर करण्याची सूचना देण्यात आली असून वाटपात गैरप्रकार केल्यास संबंधितावर गंभीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.जिल्हा प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी मदत दिली आहे. यामध्ये सातारा तालुका रेशन दुकान संघटना, शंकर बर्गे, सुलतानवाडी ता. कोरेगाव, संजय निकम, जयंत गरज, कोविड डिफेडर ग्रुप, सातारा, मच्छींद्र गोरे, सातारा, हेमंत त्रिगुणे, श्रीकांत शेटे, सातारा, तहसील कार्यालय, सातारा, पार्ले-जी कंपनी, शुभम-इन हॉटेल, क्रेडाई, सातारा, श्री स्वामी सेवा मेडिकल फौंडेशन, एमएसडब्ल्यु महाविद्यालय, जकातवाडी, अण्णासाहेब कल्याणी माजी विद्यार्थी बॅच, जाणीव विकास स. संस्था, दिलीप देशमुख, मे. पालेकर फूड, विठ्ठल भोसले, कांचन शेटे, राजधानी हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट असो. सातारा, कोडोली कृतज्ञता मंच व कोडोली ग्रामस्थ, बौद्ध विकास तरुण मंडळ लिंब, मार्सिया मेटर इंडिया, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, वसुंधरा पर्यावरण संस्था व सातारा व कोरेगाव येथील शासकीय गोदामातील व वाहतुकदारांचे हमाल कामगार यांनी पुरग्रस्तांसाठी मदत जिल्हा पुरवठा कार्यालयात जमा केली आहे.

याव्यतिरिक्त जिल्ह्यातील छोट्या छोट्या मित्र मंडळांनी, सार्वजनिक उत्सव मंडळांनी आपल्या परीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.पुनर्वसनाचे काम करण्यावरही भरपाटण, वाई, जावली, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्सखलन झाले असल्याने बाधित लोक भयग्रस्त असल्याने आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या लोकांनी नोडल अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडेही मागील आठवड्यात हीच मागणी करण्यात आलेली होती. 

 

टॅग्स :floodपूरRainपाऊसSatara areaसातारा परिसर