शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ, व्यापारी निमसोडच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:58 IST

दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने ह्यहोत्याचे नव्हते केले.ह्ण पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा युरोपातील अनेक व्यापाऱ्यांची पावले खटाव तालुक्यातील निमसोडच्या द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.

ठळक मुद्देयुरोपीयन व्यापारी निमसोडच्या बांधावरगोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ

स्वप्नील शिंदे सातारा : दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले. पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा युरोपातील अनेक व्यापाऱ्यांची पावले खटाव तालुक्यातील निमसोडच्या द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात उन्हाळ्यात दरवर्षी पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र, काही शेतकरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून डाळिंब, द्राक्ष आणि इतर पिकांद्वारे आपली शेती फुलवली आहे. मायणी परिसरात तर द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात सुमारे ४१६ हेक्टरवर द्राक्षाचा बागा आहेत.यंदा मे महिन्यात दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण झाली होती. अशावेळी शेतकऱ्यांनी ५० किलोमीटरवरून टँकरने पाणी विकत आणून बागा जगविल्या. अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली. तसेच शेततळी उभारून पाण्याची व्यवस्था केली. पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने बागांची छाटणी केली; पण त्याच वेळी अवकाळी पाऊस पडल्याने बागांचे मोठे नुकसान झाले.संकटावर मात करण्याचा निर्धार करून शेतकरी कामाला लागले. पुन्हा बागा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू करून तब्बल ४१७ जिगरबाज शेतकऱ्यांनी युरोप आणि आखाती देशांमध्ये द्राक्षाची निर्यात करण्यासाठी शासनाकडे नोंदणी केली.खटाव तालुक्यामध्ये पिकविल्या जाणाऱ्या द्राक्षाला युरोपामधील अनेक देशांमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांशी करार करण्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधवर पोहोचले आहेत. त्यांनी बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्राथमिक बोलणी केली आहे. त्यानंतर त्यांच्याशी करार केला जाणार आहे.

सध्या आफ्रिकेत द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. भारतातील द्राक्षाला युरोपात चांगली मागणी असून, येथील बागांची इतर देशांपेक्षा खटाव परिसरात चांगली निगा राखली जात आहे.- यॉन व्हॅन अ‍ॅडल, व्यापारी, नेदरलँड

टॅग्स :fruitsफळेSatara areaसातारा परिसर