शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ, व्यापारी निमसोडच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:58 IST

दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने ह्यहोत्याचे नव्हते केले.ह्ण पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा युरोपातील अनेक व्यापाऱ्यांची पावले खटाव तालुक्यातील निमसोडच्या द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.

ठळक मुद्देयुरोपीयन व्यापारी निमसोडच्या बांधावरगोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ

स्वप्नील शिंदे सातारा : दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले. पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा युरोपातील अनेक व्यापाऱ्यांची पावले खटाव तालुक्यातील निमसोडच्या द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात उन्हाळ्यात दरवर्षी पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र, काही शेतकरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून डाळिंब, द्राक्ष आणि इतर पिकांद्वारे आपली शेती फुलवली आहे. मायणी परिसरात तर द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात सुमारे ४१६ हेक्टरवर द्राक्षाचा बागा आहेत.यंदा मे महिन्यात दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण झाली होती. अशावेळी शेतकऱ्यांनी ५० किलोमीटरवरून टँकरने पाणी विकत आणून बागा जगविल्या. अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली. तसेच शेततळी उभारून पाण्याची व्यवस्था केली. पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने बागांची छाटणी केली; पण त्याच वेळी अवकाळी पाऊस पडल्याने बागांचे मोठे नुकसान झाले.संकटावर मात करण्याचा निर्धार करून शेतकरी कामाला लागले. पुन्हा बागा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू करून तब्बल ४१७ जिगरबाज शेतकऱ्यांनी युरोप आणि आखाती देशांमध्ये द्राक्षाची निर्यात करण्यासाठी शासनाकडे नोंदणी केली.खटाव तालुक्यामध्ये पिकविल्या जाणाऱ्या द्राक्षाला युरोपामधील अनेक देशांमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांशी करार करण्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधवर पोहोचले आहेत. त्यांनी बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्राथमिक बोलणी केली आहे. त्यानंतर त्यांच्याशी करार केला जाणार आहे.

सध्या आफ्रिकेत द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. भारतातील द्राक्षाला युरोपात चांगली मागणी असून, येथील बागांची इतर देशांपेक्षा खटाव परिसरात चांगली निगा राखली जात आहे.- यॉन व्हॅन अ‍ॅडल, व्यापारी, नेदरलँड

टॅग्स :fruitsफळेSatara areaसातारा परिसर