शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

रस्त्याच्या लायकीनुसार पैसे घेताय का -टोलचा झोल मिटवाच ! पैसे भरू.. गुणवत्ता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 10:45 PM

टोलमुक्तीसाठी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर मांडली जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असताना नागरिकांनी टोल का म्हणून द्यायचा, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. टोलनाक्याची गरज, उपलब्ध सोयी, यापासून टोल नाक्यापासून मिळणारे उत्पन्न, तो कोणाचा, त्याचा मलिदा कोण लाटतं? इथंपर्यंतच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावर उद्रेक

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याच्या हद्दीतील रस्त्याची गुणवत्ता, वाहनचालकांना पुरविण्यात येणा-या सुविधा बघून मगच टोल आकारणी व्हावी, अशी साद सोशल मीडियावर दिली गेली. त्यावर तब्बल दहा हजार लोकं व्यक्त झाले. त्यात ‘टोलचा झोल मिटवा आणि सातारकरांना वाचवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सातारा मतदारसंघात सध्या राजकीय घमासान सुरू आहे. लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीतच दोन दिवसांपूर्वी टोलमुक्तीबाबत समाजमाध्यमांवर एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टोलमुक्तीसाठी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर मांडली जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असताना नागरिकांनी टोल का म्हणून द्यायचा, असा संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. टोलनाक्याची गरज, उपलब्ध सोयी, यापासून टोल नाक्यापासून मिळणारे उत्पन्न, तो कोणाचा, त्याचा मलिदा कोण लाटतं? इथंपर्यंतच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

टोलमुक्ती नावाने सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या पेजवर सुमारे दहा हजार लोकांनी आपली परखड मते व्यक्त केली आहेत. काहींनी आंदोलनाचा तर कोणी निवडणूक प्रचार सभांमध्ये निषेध नोंदविण्याचेही सल्ले दिले आहेत.पैसे भरू.. गुणवत्ता हवीसातारकरांनी कधीही टोलला विरोध केला नव्हता. रस्त्याची गुणवत्ता ढासळल्याने होणाºया अपघातांची संख्या वाढतेय, अशा स्थितीत ‘जसे रस्ते तसे टोलचे पैसे’ ही लोकभावना असल्याचे रवींद्र नलवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtollplazaटोलनाका