शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सातारा जिल्ह्यातील ९५ गावांत लम्पीचा शिरकाव, बळिराजाबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 17:22 IST

सातारा जिल्ह्यातील १० तालुक्यांत आतापर्यंत लम्पीचा प्रसार झाला आहे, तर बाधित पशुधनाचा आकडा १२८८ झाला आहे.

सातारा : जिल्ह्यातील बळिराजासमोर लम्पी त्वचारोगाचे संकट वाढत असून, मंगळवारी आणखी आठ जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत लम्पीमुळे ८३ पशुधनाचा बळी गेला आहे, तर दुसरीकडे बाधितांचा आकडा वाढत जात १२८८ वर पोहोचलाय. तर जिल्ह्यातील ९५ गावांत लम्पी बाधित पशुधन आढळून आले आहे.

मागील एक महिन्यापासून राज्यात लम्पी त्वचारोगाचा प्रसार वाढला आहे. सातारा जिल्ह्यात तर दररोज नवनवीन गावांत बाधित पशुधन आढळत आहे. यामुळे बळिराजाबरोबरच प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्यातील १० तालुक्यांत आतापर्यंत लम्पीचा प्रसार झाला आहे, तर बाधित पशुधनाचा आकडा १२८८ झाला आहे. सोमवारपर्यंत ११४७ जनावरे बाधित होती. मंगळवारी एकाच दिवसांत नवीन १४१ जनावरे स्पष्ट झाली. त्यातच मंगळवारी आणखी ८ जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला. त्यामुळे या रोगाने मृत झालेल्या पशुधनाची संख्या ८३ वर पोहोचली आहे.

सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचारोग झालेले पहिले जनावर २ सप्टेंबरला कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी येथे आढळून आले होते. त्यानंतर पहिल्या बाधित जनावराचा मृत्यूही वाघेरीतच झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत विविध उपाययोजना हाती घेतल्या. लसीकरण करणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. आता तर सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार गाय आणि बैलांना लम्पी प्रतिबंधित लसीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाने तयारी केली आहे. यासाठी जनावरांसाठी खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचीही मदत घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील अशा ६०० हून अधिक खासगी डॉक्टरांना प्रशासनाने ऑर्डर दिली आहे. तसेच प्रत्येक लसीकरणामागे त्यांना पैसे देण्यात येणार आहेत. यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत गायी आणि बैलांना लसीकरण उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वासही पशुसंवर्धन विभागाला आहे.

पावणेतीन लाख जनावरांना लसीकरण...

जिल्ह्यात आतापर्यंत गाय आणि बैल यांनाच लम्पी त्वचारोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने गाय आणि बैलांच्या लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यातील या पशुधनाची संख्या ३ लाख ५२ हजार इतकी आहे. आतापर्यंत २ लाख ८२ हजार १३१ पशुधनाला लस देण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग