शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

शिस्तबद्ध, सुरक्षित वाहतुकीवर राहणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:27 IST

वाढते अपघात हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात. - अस्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग

ठळक मुद्दे ‘ब्लॅक स्पॉट’वर उपाययोजना आवश्यक

संजय पाटील।क-हाड : दंडात्मक कारवाई हा वाहतुकीला शिस्त लावण्याचा एक भाग असला तरी फक्त कारवाई करून संभाव्य अपघात टाळता येणार नाहीत. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास बहुतांश अपघात टाळता येतील. शिस्तबद्ध, अपघातविरहित आणि सुरक्षित वाहतुकीवर आमचा भर राहील, असे मत महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी व्यक्त केले.

प्रश्न : अपघाती क्षेत्र किती? त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?उत्तर : शेंद्रे ते पेठनाक्यापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग तसेच कºहाड-सांगली, कºहाड-विटा, कºहाड-कोयनानगर, कºहाड-कोकरूड, कºहाड-तासगाव हे मार्ग आमच्या अखत्यारीत येतात. या हद्दीत २६ ठिकाणे अपघाती आहेत. त्या-त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना महामार्ग प्राधिकरण आणि बांधकाम विभागाला सुचविल्या आहेत.

प्रश्न : जोडरस्ते सुरक्षित आहेत का?उत्तर : उपमार्ग ज्याठिकाणी महामार्गाला जोडले जातात त्याठिकाणी महामार्गावर रम्बलर तसेच उपमार्गावर गतिरोधक उभारण्याची सूचना केली आहे. या उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. त्याचबरोबर उपमार्गावरील अडथळे हटविण्याबाबत महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला आहे. पूर्वसूचना देणारे फलक, ब्लिंकर्स बसविण्याबाबतही मागणी करण्यात आली आहे.

प्रश्न : सुरक्षित वाहतुकीसाठी कशावर भर राहील?उत्तर : लेनकटिंग, वेगमर्यादा ओलांडणे, विनाहेल्मेट दुचाकी प्रवास, सिटबेल्ट नसणे, धोकादायक माल वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी असते. त्यामुळे अशा चालकांवर कटाक्षाने कारवाई केली जात आहे. तसेच त्यांना समजही दिली जात आहे.

महामार्गावर वाहने अडवत नाहीच!महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे कारवाईसाठी कोणतेही वाहन थांबविण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत नाही. अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार सुरक्षित ठिकाणी कारवाई केली जाते. ई-चलन पद्धतीने दंड आकारणी केली जात असल्याने वाहने अडविण्याचा प्रश्नच नाही.

कोल्हापूर नाका धोकादायक!कोल्हापूर नाक्यावरील वाढते अपघात पाहता याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. सातारा-कोल्हापूर लेनवरील एक लेन कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या वाहनांसाठी वापरात यावी, अशी आमची सूचना आहे. त्याचबरोबर याठिकाणी उड्डाण पूल झाल्यास अपघात टळतील. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. याबाबत संबंधित विभागाशी आम्ही पत्रव्यवहारही केला आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसhighwayमहामार्ग