शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा ‘पट्टा पडला’

By admin | Updated: June 2, 2015 00:30 IST

‘सह्याद्री’ सहा जूनपर्यंत चालणार : ७५ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप; ८८ लाख क्विंटल साखरेची निर्मिती

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना वगळता उर्वरीत सर्वच साखर कारखान्यांनी आपल्या चालू गाळप हंगामातील नोंद असलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करीत या हंगामाचा यशस्वी समारोप केला. गतवर्षीच्या तुलनेत चालू हंगामात वाढ होवून या हंगामात ७५ लाख मे. टन उसाचे गाळप करीत जवळपास ८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन जिल्ह्यातील कारखान्याकडून झाले आहे. ‘कही खुशी कही गम’ याप्रमाणे चालू हंगाम हा कारखानदार तोडकऱ्यांसाठी दिवाळीचा तर ऊस उत्पादकांसाठी मात्र शिमगाच ठरला. या हंगामाच्या शुभारंभा पासूनच ऊस दराचे नैराश्य कायम राहिले. गतवर्षी प्रमाणे चालू वर्षी कोणतीही संघटना ऊस दरासाठी रस्त्यावर उतरलीच नसल्याने कारखानदारांनी आपल्या इच्छेप्रमाणे ऊस दर जाहीर करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा दर देताना केंद्राने जाहीर केलेल्या एफआरपी प्रमाणे दर देण्याचे बंधन नव्या सरकारने घेतल्याने जिल्ह्यातील किसनवीर, प्रतापगड, अजिंक्यतारा, सह्याद्री कारखान्यांनी एफआरपी पोटी पहिला हप्ता देऊन उर्वरीत रक्कम दुसऱ्या हप्त्याने देण्याची भूमिका घेत शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. राज्य शासनाने ही कारखानदारांसाठी पॅकेज जाहीर केले. मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालीच नसल्याने चालू हंगाम संपला तरी एफआरपी रक्कमेचा फरक शेतकऱ्यांच्या ऊस बील खात्यावर जमा झाला नाही. यामुळे यापुढे हा फरक मिळेल याबाबत प्रश्नच उपस्थित होत आहे. प्रतीवर्षी ऊस दराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चालू वर्षी गाळप हंगामापूर्वीच ऊस दर नियंत्रण समितीची स्थापणा झाली. मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना या कमिटीचे अध्यक्ष बनविले. व शेतकरी संघटना, प्रतिनिधी व कारखानदार प्रतिनिधी अशी कमिटी स्थापण झाली. या कमिटीबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या मात्र, ही कमिटी पहिल्याच मिटिंगमध्ये कारखानदार व शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यात ऊसदराबाबत एकमत न झाल्याने कमिटी बंद पडली. हंगामात नव्याने गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड या कारखान्याची भर पडली. या शिवाय फलटण येथील स्वराज इंडिया या कारखान्यानेही चाचणी गाळप हंगाम घेतल्यामुळे जिल्ह्यातील आव्हानात्मक वाटणारे ऊसाचे क्षेत्र संपविण्याचे काम वेळेत साध्य झाले. जिल्ह्यात सद्य:स्थितीस सह्याद्री हा एकमेव साखर कारखाना सुरू असून ६ ते ७ जून पर्यंत सह्याद्री कार्यक्षेत्रातील नोंद असलेला संपूर्ण ऊस गाळप केला जाईल, असा विश्वास कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर) तोडकऱ्यांनी केला जल्लोष कारखान्याचा पट्टा पडण्याचा दिवस म्हणजे ऊस तोडणी मजुरांसाठी एक प्रकारे आनंद सोहळाच असतो. या दिवशी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नारळ व ऊसाच्या छावळ्यांनी सजावट केली जाते. तसेच गुलाल व फटाक्यांच आतषबाजी करीत ऊसाने भरलेल्या वाहनांनी मिरवणूक काढली जाते. ऊस तोडणी मजूर या दिवसाचे मोठ्या जलोषात स्वागत करतात. असाच जल्लोष जिल्ह्यातील अजिंक्यतारा, प्रतापगड व किसन वीर कारखान्याच्या ऊस तोडणी मजूरांनी केला. किसन वीर, प्रतापगड कारखाना कार्यक्षेत्रात कारखान्याकडे नोंदविण्यात आलेल्या संपूर्ण ऊसाची तोडणी झाली आहे. काही अडचणीमुळे थोड्या क्षेत्रातील ऊस शिल्लक राहिला आहे. - विजय वाबळे, कार्यकारी संचालक, किसन वीर कारखाना