शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याने हिऱ्यापोटी गारगोटी - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 22:54 IST

पोरकटपणाचा प्रकार; साताऱ्यातील दरे गावी पत्रकारांशी संवाद

सातारा : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज देशात दुमदुमत होता. पण, नाशकात बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याचे पाप करण्यात आले. खरे म्हणजे हा दुर्दैवी आणि पोरकटपणाचा प्रकार आहे. नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार फिरवता येणार नाहीत. त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण येथे खरी ठरली,’ असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला.

महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘२०१९ मध्ये स्वत:चा वैयक्तिक स्वार्थ, खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि विचार सोडले. निवडणुकीतही लोक बरोबर राहत नाहीत म्हणून स्वार्थासाठी तडजोड केली. लोकांच्या मनातूनच साफ उतरल्याने त्यांच्याजवळ कोणी थांबत नाही. म्हणूनच नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा नकली आवाज काढण्याचे पाप केले. या गारगोट्यांनीच व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ज्यांचा विरोध आणि तिरस्कार केला. त्यांच्याच मांडीवर बसण्याचे पापही त्यांनी केले आहे. आपलं पाप झाकण्यासाठी बेजबाबदार वर्तनाचं समर्थन सुरू केलं आहे.

आमच्यावर आरोप केले. आरोपांचा किस काढला. तरीही निवडणुकीत २० जागा मिळवल्या. आम्ही ८० जागा लढवून २० जिंकल्या. एआयचा आवाज काढून बाळासाहेबांचे विचार बदलू शकत नाही. एकनाथ शिंदेबद्दल मत बदलू शकत नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या दाढीची त्यांना चिंता आहे. या दाढीनेच भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती. टांगा पलटी आणि घोडे फरार झाले होते. बाळासाहेब यांचा नकली आवाज काढल्याने सोडून जाणारी माणसे थांबतील हा त्यांचा भ्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधलं. काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. पण, ते शिव्याशाप देतात. वक्फ बोर्डाची लाखो एकर जमीन होती. हे लाटण्याचे काम सुरू होते. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे याचा फायदा सर्वसामान्य आणि गरीब मुस्लिम समाजाला होईल, अशी भूमिका होती, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले

मला गाव आहे; ते लंडनला जातात...

मी गावी आलो तरी त्यांना चिंता असते. गाव माझं आहे. त्यांना गावं नाहीत. ते लंडनला जातात. त्यांना थोडी जर वाटत असेल तर त्यांनी पाेरकट आणि थिल्लरपणा सोडावा. बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करू नका. तसेच त्यांना वेदना होतील, असे कामही करू नका, असा सल्लाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSatara areaसातारा परिसर