शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

सुशिक्षितांच्या अशिक्षितपणाचा कळस !

By admin | Updated: December 1, 2014 00:22 IST

रस्त्यालगतच कचऱ्याचे ढीग : शिकल्या-सवरलेल्यांकडूनच स्वच्छतेला हरताळ

मलकापूर : देशभर ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरूच आहे़ मलकापूर नगरपंचायतीनेही या अभियानाची जोमात सुरुवात केली आहे़ मात्र सुशिक्षित म्हणवून घेणारे नागरिकच रस्त्याकडेला कचरा टाकत आहेत़ शहराच्या दृष्टीने ही खेदाची बाबआहे़ डेंग्यूची साथ विचारात घेता मलकापुरात नगरपंचायतीने स्वच्छतेची विशेष मोहीम हाती घेतली आहे़ नगरपंचायतीत ६५ कर्मचाऱ्यांसह ३० ते ३५ महिलांना रोजंदारीवर काम देऊन शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची साफसफाईचे काम करण्यात येत आहे़सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यालगतची साफसफाईही नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे़ याशिवाय पाच घंटागाड्या गल्लोगल्ली कचरा गोळा करतात. दोन ट्रॅक्टरच्या साह्याने हॉटेलसह व्यावसायिकांचा ओला कचरा गोळा करण्याचे काम सातत्याने सुरू आह़े़ शहरातील मुख्य ठिकाणी २४ कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत़ कचरा गोळा करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुविधा नगरपंचायतीने उपलब्ध केल्या आहेत़ शहरातील नव्वद टक्के नागरिक सुशिक्षित आहेत. मात्र, सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या काहीनीच अशिक्षितपणाचा कळस केला आहे़ स्वच्छतेबाबत सर्वत्र अनेक उपक्रम सुरू असताना, असे नागरिक राजरोसपणे रस्त्याकडेलाच कचऱ्याचे ढीग टाकत आहेत़ प्रशासन पुढे स्वच्छता करते आणि पाठीमागे ही मंडळी कचरा नाल्यात टाकतात, अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनही हतबल झाले आहे़ (वार्ताहर)दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान शिवछावा चौक परिसरात वास्तव्यास असलेली काही शिक्षक मंडळी कचरा घंटागाडीत न टाकता रस्त्याकडेलाच टाकतात. संबंधित शिक्षकांनी इतरांना स्वच्छतेचे धडे देण्याऐवजी त्यांनाच इतरांनी धडे देण्याची वेळ आली़ त्यावरही कहर करून ‘मी कचरा रस्त्याकडेलाच टाकणार तुम्ही कोण विचारणार,’ असा सवाल करून दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, असे म्हणण्याची वेळ आली आहे.