शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सातारा जिल्ह्यात ५.३१ लाख जणांचे ई-केवायसी बाकी, अन्यथा रेशन होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:42 IST

जिल्हा पुरवठा विभागाकडून शिबिरांचे नियोजन

सातारा : धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांचे शंभर टक्के ई-केवायसी होणे गरजेचे आहे. परंतु, शासनाने वेळोवेळ मुदत वाढवून देऊनही ग्राहक ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. आता राज्य शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. मुदतीत केवायसी न केल्यास रेशन बंद होऊ शकते. अद्याप ५ लाख ३१ हजार जणांचे ई-केवासी बाकी आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटाच्या लाभार्थीचे शिधापत्रिकेत संलग्न असलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे, शिधापत्रिकेत नमूद व्यक्ती तीच आहे याची खात्री करण्यासाठी तसेच १०० टक्के ई-केवायसी प्रमाणीकरण होण्याकरिता लाभार्थींना त्यांच्या स्वगृही न जाता कोणत्याही रास्तभाव दुकानातून ई-केवायसी करण्याची सुविधा ई-पॉस मशीनवर उपलब्ध करून दिली आहे.ज्या लाभार्थीचे ई-केवायसी प्रलंबित आहे, अशा सर्वांचे १५ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावरून सर्व तालुका कार्यालयांना रास्तभाव दुकान स्तरावर कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अन्यथा रेशन होणार बंदशासनाने वेळोवेळी मुदत देऊनही ही बाब गंभीर्याने घेतली नाही. आता शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. शासनाचे एकूण १७ लाख ६१ हजार ५७२ बाकी आहेत. यापैकी १२ लाख ३० हजार ५६२ जणांची ई-केवायसी झाली आहेत तर अद्याप ५ लाख ३१ हजार १० जणांची अद्याप बाकी आहे. मुदतीत ई-केवायसी न झाल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे.जेवढ्यांचे आधारकार्ड तेवढ्यांचे मिळणार धान्यई-केवायसी करण्यासाठी ग्राहकांना गावातील रेशन दुकानातच संपर्क साधावा लागणार आहे. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. जितक्या सदस्यांचे आधारकार्ड सादर झाले, तितक्याच सदस्यांचे रेशन कार्डवर उपलब्ध होणार आहे. ही प्रक्रिया गावपातळीवर दुकानदार पार पाडणार आहेत.

ज्या लाभार्थींनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी स्वतःचे आधार कार्ड व शिधापत्रिका घेऊन जवळच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. - वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर