शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

सातारा जिल्ह्यात ५.३१ लाख जणांचे ई-केवायसी बाकी, अन्यथा रेशन होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:42 IST

जिल्हा पुरवठा विभागाकडून शिबिरांचे नियोजन

सातारा : धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांचे शंभर टक्के ई-केवायसी होणे गरजेचे आहे. परंतु, शासनाने वेळोवेळ मुदत वाढवून देऊनही ग्राहक ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. आता राज्य शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. मुदतीत केवायसी न केल्यास रेशन बंद होऊ शकते. अद्याप ५ लाख ३१ हजार जणांचे ई-केवासी बाकी आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटाच्या लाभार्थीचे शिधापत्रिकेत संलग्न असलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे, शिधापत्रिकेत नमूद व्यक्ती तीच आहे याची खात्री करण्यासाठी तसेच १०० टक्के ई-केवायसी प्रमाणीकरण होण्याकरिता लाभार्थींना त्यांच्या स्वगृही न जाता कोणत्याही रास्तभाव दुकानातून ई-केवायसी करण्याची सुविधा ई-पॉस मशीनवर उपलब्ध करून दिली आहे.ज्या लाभार्थीचे ई-केवायसी प्रलंबित आहे, अशा सर्वांचे १५ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्तरावरून सर्व तालुका कार्यालयांना रास्तभाव दुकान स्तरावर कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अन्यथा रेशन होणार बंदशासनाने वेळोवेळी मुदत देऊनही ही बाब गंभीर्याने घेतली नाही. आता शासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. शासनाचे एकूण १७ लाख ६१ हजार ५७२ बाकी आहेत. यापैकी १२ लाख ३० हजार ५६२ जणांची ई-केवायसी झाली आहेत तर अद्याप ५ लाख ३१ हजार १० जणांची अद्याप बाकी आहे. मुदतीत ई-केवायसी न झाल्यास धान्य बंद होण्याची शक्यता आहे.जेवढ्यांचे आधारकार्ड तेवढ्यांचे मिळणार धान्यई-केवायसी करण्यासाठी ग्राहकांना गावातील रेशन दुकानातच संपर्क साधावा लागणार आहे. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. जितक्या सदस्यांचे आधारकार्ड सादर झाले, तितक्याच सदस्यांचे रेशन कार्डवर उपलब्ध होणार आहे. ही प्रक्रिया गावपातळीवर दुकानदार पार पाडणार आहेत.

ज्या लाभार्थींनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी स्वतःचे आधार कार्ड व शिधापत्रिका घेऊन जवळच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. - वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर