शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दिलासा! पावसाच्या हजेरीमुळे सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई थोडी कमी

By नितीन काळेल | Updated: October 3, 2023 19:16 IST

तरीही ९६ टॅंकर सुरू, माणमध्ये टॅंकर कमी

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस काही भागात चांगला झाल्याने टंचाईची स्थिती कमी होत आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या १०२ वरुन आता ९६ पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या ८६ गावे आणि ४०४ वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. त्यामुळे पावसाची ३५ टक्के तूट आहे. ही तूट दुष्काळी तालुक्यात अधिक आहे. परिणामी आजही अनेक भागात पाऊस पडत असताना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तरीही मागील १५ दिवसांत जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे काही गावांचे आणि अनेक वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणारे टॅंकर बंद झाले आहेत.जिल्ह्यात सध्यस्थितीत माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे. ४७ गावे आणि ३४४ वाड्यांतील ७३ हजार नागरिक आणि ५७ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी ६१ टॅंकर सुरू आहेत. तर तालुक्यातील पांगरी, वडगाव, मोगराळे, पाचवड, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, मार्डी, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, धुळदेव, ढाकणी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, वाकी, रांजणी, हवालदारवाडी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, इंजबाव, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, विरळी, कुरणेवाडी आदी गावांना आणि त्या अंतर्गत वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खटाव तालुक्यातील २१ गावे आणि २४ वाड्यांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. या टॅंकरवर २९ हजार नागरिक आणि ८ हजार २४९ जनावरांची तहान अवलंबून आहे. यासाठी १४ टॅंकर सुरू आहेत. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. फलटण तालुक्यातही १० गावे आणि ३६ वाड्यांसाठी १२ टॅंकर सुरू आहे. यावर प्रत्येकी १५ हजार नागरिक आणि पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातीलही चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी आदी सहा गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. वाई तालुक्यात चांगला पाऊस होतो. पण, सध्या तालुक्यातील चांदक आणि आनंदपूर गावासाठी टॅंकर सुरू आहेत.माणमध्ये टॅंकर कमी..माण तालुक्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती काही प्रमाणात कमी झालेली आहे. आठवड्यात टॅंकरची संख्या सहाने कमी झाली आहे. सध्या ६१ टॅंकरने नागरिकांना तसेच पशुधनाला पाणीपुरवठा केला जातोय. तर लोकांना पाणीपुरवठा होण्यासाठी १९ विहिरी आणि ३२ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. अधिग्रहण विहिरींची संख्या खटाव तालुक्यात सर्वाधिक आहे. तर जिल्ह्यात सध्या १ लाख ३४ हजार नागरिक आणि ८३ हजार पशुधनासाठी टॅंकर सुरू आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीRainपाऊस