शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सातारा जिल्ह्यातील उन्हाळी क्षेत्र घटणार; पिकांवर ‘पाणी’ फेरणार

By नितीन काळेल | Updated: February 13, 2024 19:33 IST

सातारा : जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने उन्हाळी पीक क्षेत्रात वाढ झाली होती. पण, गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी ...

सातारा : जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने उन्हाळी पीक क्षेत्रात वाढ झाली होती. पण, गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. परिणामी कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा उन्हाळी क्षेत्र (ऊस सोडून) पाच हजार हेक्टरपर्यंत राहणार असले तरी प्रत्यक्षात पेरणी कमीच होऊ शकते. यामध्ये भुईमूगच मुख्य पीक राहणार आहे.जिल्ह्यातील शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. जूनमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर चार महिने जिल्ह्यात पाऊस पडतो. यावरच खरीप तसेच रब्बी हंगामही अवलंबून असतो. तसेच पावसाने धरणे आणि तलाव भरल्यानंतर उन्हाळ्यातही शेतकरी विविध पिके घेतात. पण, गेल्यावर्षी पावसाने दगा दिला. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झाले. त्यामुळे जवळपास ३० टक्के पावसाची तूट राहिली आहे.परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान झाले. तसेच आता रब्बी हंगामात पक्व स्थितीत असतानाही पिकांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे. यामुळे पिकांची उत्पादकता घटणार आहे. याचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसणार आहे. असे असतानाच आता कृषी विभागाचे उन्हाळी हंगामाकडे लक्ष लागलेले आहे. यासाठी जिल्ह्यात किती क्षेत्र राहणार, याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने सध्या पूर्णपणे दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामावर परिणाम होणार आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा उन्हाळी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ४ हजार ८०३ हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये भुईमुगाचे २ हजार ६९९ हेक्टर राहू शकते. तसेच मका क्षेत्र २ हजार हेक्टरवर राहण्याचा अंदाज आहे. मक्याचे ३१ हेक्टर राहू शकते. यावर्षी उन्हाळी पिकांना पाणी कमी पडणाार असल्याने क्षेत्रात घट होऊ शकते.गतवर्षी पाच हजार हेक्टरवर पेर..जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच हजार हेक्टरवर उन्हाळी पेरणी झालेली होती. १०४ टक्के पेरणी झालेली. यामध्ये उन्हाळी भुईमुगाचे २८०० हेक्टरवर क्षेत्र होते. तर उन्हाळी बाजरीचे ९८१ हेक्टर तसेच मकेची पेरणी एक हजार हेक्टरवर झाली होती. सोयाबीन ८० हेक्टरवर घेण्यात आलेले. महाबळेश्वर वगळता सर्वच तालुक्यात उन्हाळी पिके घेण्यात आलेली.

उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात घट..

मागील दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली होती. २०२२ मध्ये उन्हाळ्यात १६०० हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आलेले. पण, वर्षभरापासून सोयाबीनचा दर उतरल्याने शेतकरी उन्हाळी सोयाबीन घेण्याकडे दुर्लक्ष करु लागलेत. त्यामुळे गेल्यावर्षी उन्हाळ्यात ८० हेक्टरवर सोयाबीन घेतले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ