शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

By नितीन काळेल | Updated: May 20, 2024 19:26 IST

तीन लाख लोकांची तडफड; दोन लाख जनावरांचा हंबरडा

सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती निर्माण झाली असून, सव्वा तीन लाख लोकांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठीही दाहीदिशा भटकंती सुरू आहे. तसेच चारा आणि पाणीही वेळेत मिळत नसल्याने दोन लाख जनावरांचा हंबरडा सुरू आहे. माळरानेही काळवंडली आहेत. त्यामुळे चाऱ्याच्या शोधात शेतकरीही भटकू लागलाय.जिल्ह्यात दर चार - पाच वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. २०१८ साली जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट होते. त्यावेळी अनेक गावांत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो पशुधन छावण्यात होते. त्याचठिकाणी शेतकऱ्यांनीही संसार थाटलेला. त्यानंतर आता दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस कमी राहिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाने वाई, खंडाळा या संपूर्ण तालुक्याबरोबरच इतर ६०हून अधिक महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, दुष्काळाच्या सवलती किती प्रमाणात लागू झाल्या याविषयी आजही शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. सध्या तर जिल्ह्यात पाणी आणि चाऱ्याचा मोठा गहन प्रश्न आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. माणमध्ये १०५ गावे आहेत. त्यातील ७१ गावे आणि ४३७ वाड्यावस्त्यांवर टंचाईच्या झळा आहेत. या गावातील १ लाख २४ हजार ६२३ लोकांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. १ लाख १९ हजार ७१५ पशुधनही टँकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या ८५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातही टंचाईची भीषणता वाढली आहे. ५२ गावे आणि १४५ वाडीवस्त्यांवर टँकरची चाके फिरू लागली आहेत. ३९ टँकरने ८१ हजार ३८४ नागरिकांना आणि १९ हजार ६४२ जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातही दुष्काळाची चिंता आहे. सध्या ४० गावे आणि ९९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर सुमारे ६४ हजार नागरिक आणि ३७ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. या भागातील ३३ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सध्या २६ टँकरने ४२ हजार नागरिक आणि २४ हजार ६५६ जनावरांना पाणी देण्यात येत आहे. खंडाळा तालुक्यातील दोन गावांत टंचाई आहे. त्यासाठी एक टँकर सुरू असून, १ हजार ३३० नागरिक आणि १५९ पशुधनाला आधार मिळाला आहे. वाई तालुक्यात ६ गावे आणि ५ वाड्यांना, तर पाटणमधील २ गावे तसेच ८ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. कऱ्हाड तालुक्यातही ७ गावांतील ५ हजार नागरिक आणि ३ हजार जनावरांना ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

२१३ गावे अन् ६९४ वाड्यांसाठी १९९ टँकरचा धुरळाजिल्ह्यात २०१८ प्रमाणचे टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, सध्या २१३ गावे आणि ६९४ वाडीवस्त्यांत टंचाईची झळ पोहोचली आहे. एकूण ३ लाख २७ हजार ५५६ नागरिक आणि २ लाख १० हजार २०२ पशुधनाला १९९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुका ७५ टक्के टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक गावांतून टँकरला मागणी होत आहे. त्यामुळे लवकरच आणखी टंचाईग्रस्त गावांची आणि टँकरची संख्याही वाढणार आहे.

६१ विहिरी अन् ५० बोअरवेल अधिग्रहणजिल्ह्यात टंचाईच्या गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर लोकांना जवळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या ६१ विहिरी आणि ५० बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातूनही लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ