शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

By नितीन काळेल | Updated: May 20, 2024 19:26 IST

तीन लाख लोकांची तडफड; दोन लाख जनावरांचा हंबरडा

सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती निर्माण झाली असून, सव्वा तीन लाख लोकांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठीही दाहीदिशा भटकंती सुरू आहे. तसेच चारा आणि पाणीही वेळेत मिळत नसल्याने दोन लाख जनावरांचा हंबरडा सुरू आहे. माळरानेही काळवंडली आहेत. त्यामुळे चाऱ्याच्या शोधात शेतकरीही भटकू लागलाय.जिल्ह्यात दर चार - पाच वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. २०१८ साली जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट होते. त्यावेळी अनेक गावांत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो पशुधन छावण्यात होते. त्याचठिकाणी शेतकऱ्यांनीही संसार थाटलेला. त्यानंतर आता दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस कमी राहिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाने वाई, खंडाळा या संपूर्ण तालुक्याबरोबरच इतर ६०हून अधिक महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, दुष्काळाच्या सवलती किती प्रमाणात लागू झाल्या याविषयी आजही शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. सध्या तर जिल्ह्यात पाणी आणि चाऱ्याचा मोठा गहन प्रश्न आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. माणमध्ये १०५ गावे आहेत. त्यातील ७१ गावे आणि ४३७ वाड्यावस्त्यांवर टंचाईच्या झळा आहेत. या गावातील १ लाख २४ हजार ६२३ लोकांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. १ लाख १९ हजार ७१५ पशुधनही टँकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या ८५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातही टंचाईची भीषणता वाढली आहे. ५२ गावे आणि १४५ वाडीवस्त्यांवर टँकरची चाके फिरू लागली आहेत. ३९ टँकरने ८१ हजार ३८४ नागरिकांना आणि १९ हजार ६४२ जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातही दुष्काळाची चिंता आहे. सध्या ४० गावे आणि ९९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर सुमारे ६४ हजार नागरिक आणि ३७ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. या भागातील ३३ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सध्या २६ टँकरने ४२ हजार नागरिक आणि २४ हजार ६५६ जनावरांना पाणी देण्यात येत आहे. खंडाळा तालुक्यातील दोन गावांत टंचाई आहे. त्यासाठी एक टँकर सुरू असून, १ हजार ३३० नागरिक आणि १५९ पशुधनाला आधार मिळाला आहे. वाई तालुक्यात ६ गावे आणि ५ वाड्यांना, तर पाटणमधील २ गावे तसेच ८ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. कऱ्हाड तालुक्यातही ७ गावांतील ५ हजार नागरिक आणि ३ हजार जनावरांना ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

२१३ गावे अन् ६९४ वाड्यांसाठी १९९ टँकरचा धुरळाजिल्ह्यात २०१८ प्रमाणचे टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, सध्या २१३ गावे आणि ६९४ वाडीवस्त्यांत टंचाईची झळ पोहोचली आहे. एकूण ३ लाख २७ हजार ५५६ नागरिक आणि २ लाख १० हजार २०२ पशुधनाला १९९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुका ७५ टक्के टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक गावांतून टँकरला मागणी होत आहे. त्यामुळे लवकरच आणखी टंचाईग्रस्त गावांची आणि टँकरची संख्याही वाढणार आहे.

६१ विहिरी अन् ५० बोअरवेल अधिग्रहणजिल्ह्यात टंचाईच्या गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर लोकांना जवळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या ६१ विहिरी आणि ५० बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातूनही लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ