शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

By नितीन काळेल | Updated: May 20, 2024 19:26 IST

तीन लाख लोकांची तडफड; दोन लाख जनावरांचा हंबरडा

सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती निर्माण झाली असून, सव्वा तीन लाख लोकांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठीही दाहीदिशा भटकंती सुरू आहे. तसेच चारा आणि पाणीही वेळेत मिळत नसल्याने दोन लाख जनावरांचा हंबरडा सुरू आहे. माळरानेही काळवंडली आहेत. त्यामुळे चाऱ्याच्या शोधात शेतकरीही भटकू लागलाय.जिल्ह्यात दर चार - पाच वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. २०१८ साली जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट होते. त्यावेळी अनेक गावांत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो पशुधन छावण्यात होते. त्याचठिकाणी शेतकऱ्यांनीही संसार थाटलेला. त्यानंतर आता दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस कमी राहिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाने वाई, खंडाळा या संपूर्ण तालुक्याबरोबरच इतर ६०हून अधिक महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, दुष्काळाच्या सवलती किती प्रमाणात लागू झाल्या याविषयी आजही शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. सध्या तर जिल्ह्यात पाणी आणि चाऱ्याचा मोठा गहन प्रश्न आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. माणमध्ये १०५ गावे आहेत. त्यातील ७१ गावे आणि ४३७ वाड्यावस्त्यांवर टंचाईच्या झळा आहेत. या गावातील १ लाख २४ हजार ६२३ लोकांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. १ लाख १९ हजार ७१५ पशुधनही टँकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या ८५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातही टंचाईची भीषणता वाढली आहे. ५२ गावे आणि १४५ वाडीवस्त्यांवर टँकरची चाके फिरू लागली आहेत. ३९ टँकरने ८१ हजार ३८४ नागरिकांना आणि १९ हजार ६४२ जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातही दुष्काळाची चिंता आहे. सध्या ४० गावे आणि ९९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर सुमारे ६४ हजार नागरिक आणि ३७ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. या भागातील ३३ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सध्या २६ टँकरने ४२ हजार नागरिक आणि २४ हजार ६५६ जनावरांना पाणी देण्यात येत आहे. खंडाळा तालुक्यातील दोन गावांत टंचाई आहे. त्यासाठी एक टँकर सुरू असून, १ हजार ३३० नागरिक आणि १५९ पशुधनाला आधार मिळाला आहे. वाई तालुक्यात ६ गावे आणि ५ वाड्यांना, तर पाटणमधील २ गावे तसेच ८ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. कऱ्हाड तालुक्यातही ७ गावांतील ५ हजार नागरिक आणि ३ हजार जनावरांना ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

२१३ गावे अन् ६९४ वाड्यांसाठी १९९ टँकरचा धुरळाजिल्ह्यात २०१८ प्रमाणचे टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, सध्या २१३ गावे आणि ६९४ वाडीवस्त्यांत टंचाईची झळ पोहोचली आहे. एकूण ३ लाख २७ हजार ५५६ नागरिक आणि २ लाख १० हजार २०२ पशुधनाला १९९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुका ७५ टक्के टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक गावांतून टँकरला मागणी होत आहे. त्यामुळे लवकरच आणखी टंचाईग्रस्त गावांची आणि टँकरची संख्याही वाढणार आहे.

६१ विहिरी अन् ५० बोअरवेल अधिग्रहणजिल्ह्यात टंचाईच्या गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर लोकांना जवळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या ६१ विहिरी आणि ५० बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातूनही लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ