शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सातारा जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

By नितीन काळेल | Updated: May 20, 2024 19:26 IST

तीन लाख लोकांची तडफड; दोन लाख जनावरांचा हंबरडा

सातारा : जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती निर्माण झाली असून, सव्वा तीन लाख लोकांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठीही दाहीदिशा भटकंती सुरू आहे. तसेच चारा आणि पाणीही वेळेत मिळत नसल्याने दोन लाख जनावरांचा हंबरडा सुरू आहे. माळरानेही काळवंडली आहेत. त्यामुळे चाऱ्याच्या शोधात शेतकरीही भटकू लागलाय.जिल्ह्यात दर चार - पाच वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. २०१८ साली जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट होते. त्यावेळी अनेक गावांत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो पशुधन छावण्यात होते. त्याचठिकाणी शेतकऱ्यांनीही संसार थाटलेला. त्यानंतर आता दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस कमी राहिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासूनच दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाने वाई, खंडाळा या संपूर्ण तालुक्याबरोबरच इतर ६०हून अधिक महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, दुष्काळाच्या सवलती किती प्रमाणात लागू झाल्या याविषयी आजही शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. सध्या तर जिल्ह्यात पाणी आणि चाऱ्याचा मोठा गहन प्रश्न आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. माणमध्ये १०५ गावे आहेत. त्यातील ७१ गावे आणि ४३७ वाड्यावस्त्यांवर टंचाईच्या झळा आहेत. या गावातील १ लाख २४ हजार ६२३ लोकांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. १ लाख १९ हजार ७१५ पशुधनही टँकरवर अवलंबून आहे. माण तालुक्यात सध्या ८५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातही टंचाईची भीषणता वाढली आहे. ५२ गावे आणि १४५ वाडीवस्त्यांवर टँकरची चाके फिरू लागली आहेत. ३९ टँकरने ८१ हजार ३८४ नागरिकांना आणि १९ हजार ६४२ जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातही दुष्काळाची चिंता आहे. सध्या ४० गावे आणि ९९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर सुमारे ६४ हजार नागरिक आणि ३७ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. या भागातील ३३ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सध्या २६ टँकरने ४२ हजार नागरिक आणि २४ हजार ६५६ जनावरांना पाणी देण्यात येत आहे. खंडाळा तालुक्यातील दोन गावांत टंचाई आहे. त्यासाठी एक टँकर सुरू असून, १ हजार ३३० नागरिक आणि १५९ पशुधनाला आधार मिळाला आहे. वाई तालुक्यात ६ गावे आणि ५ वाड्यांना, तर पाटणमधील २ गावे तसेच ८ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. कऱ्हाड तालुक्यातही ७ गावांतील ५ हजार नागरिक आणि ३ हजार जनावरांना ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

२१३ गावे अन् ६९४ वाड्यांसाठी १९९ टँकरचा धुरळाजिल्ह्यात २०१८ प्रमाणचे टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, सध्या २१३ गावे आणि ६९४ वाडीवस्त्यांत टंचाईची झळ पोहोचली आहे. एकूण ३ लाख २७ हजार ५५६ नागरिक आणि २ लाख १० हजार २०२ पशुधनाला १९९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुका ७५ टक्के टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक गावांतून टँकरला मागणी होत आहे. त्यामुळे लवकरच आणखी टंचाईग्रस्त गावांची आणि टँकरची संख्याही वाढणार आहे.

६१ विहिरी अन् ५० बोअरवेल अधिग्रहणजिल्ह्यात टंचाईच्या गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर लोकांना जवळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या ६१ विहिरी आणि ५० बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातूनही लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ