शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नवीन आराखड्यामुळे खंडाळ्यातील औद्योगिकीकरण धोक्यात !

By admin | Updated: May 7, 2017 14:46 IST

विकासात अडसर : शासनाकडून अधिसूचना प्रसिध्द ; ग्रीन झोनविरोधात तीव्र लढ्याचे संकेत

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. ७ : सातारा जिल्ह्यासाठी शासनाने नवीन प्रारूप प्रादेशिक आराखड्याची अधिसुचना प्रसिद्ध केली असून या आदेशाने खंडाळा तालुक्यातील औद्योगिकिकरण विकास धोक्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासात मोठा अडसर निर्माण होणार असल्याने याबाबत जागृकता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी खंडाळा तालुका ग्रीन झोन विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला असून भविष्यातील ग्रीन झोन विरोधातील लढा तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. सातारा प्रादेशिक झोन २०३६ पर्यंत प्रस्तावित केला आहे. जिल्ह्यातील १२८९० हेक्टर औद्योगिक क्षेत्रापैकी ३३१८ हेक्टर क्षेत्र खंडाळ्यात आहे. मात्र, या नव्या नियमाचा परिणाम तालुक्यावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. या अधिसुचनेचे दुष्परिणाम भावी पिढीला भोगावे लागणार असल्याने तालुक्याच्या वतीने हरकत दाखल करण्यासाठी तालुक्यातील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, शेतकरी, तरुण व नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने ३० मार्च रोजी सातारा जिल्ह्यासाठी नविन प्रारूप प्रादेशिक आराखड्याची (झोनिंग व रिजनल प्लॅन) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या आदेशानूसार खंडाळा तालुक्यातील ९५ टक्के भाग हा ग्रीन झोन मध्ये घेतला आहे. यामुळे तालुक्यामध्ये यापुढे कोणताही विकास होणे शक्य नाही. शासनाच्या उद्योग खात्यामार्फत तालुक्यातील औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन म्हणून गेली २५ वर्षे विविध योजना कार्यान्वित आहेत. तर दुसऱ्या बाजुला नगरविकास मंत्रालय हे रिजनल प्लॅनच्या नावाखाली विकासाला अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग धोरणानूसार १९९३ सालापासून खंडाळा तालुका डी झोनमध्ये असताना येथे वाढत असणाऱ्या इंडस्ट्रिजला या आदेशाने खूप मोठा अडसर निर्माण होणार आहे. यामुळे औद्योगिक प्रगती पूर्ण थांबून रोजगार निर्मिती बंद पडणार आहे. ग्रीन झोनमुळे खेडी व शहरांच्या वाढीवर निर्बंध येणार आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना आपल्याच शेतात कोणताही उद्योग व्यवसाय उभा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या प्रारूप आराखड्यामुळे तालुक्यातील प्रत्येक घटकावर त्याचे विपरित परिणाम होणार असून या सुलतानी आदेशाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकमुखी लढा उभारण्याची गरज आहे.ग्रीन झोन विरोधी कृती समितीने या विषयी गावोगावी जनजागृती केली असून महाराष्ट्र दिनी झालेल्या ग्रामसभेत तालुक्यातील गावांमधून या प्रारूप प्रादेशिक आराखड्यास विरोध असल्याबाबत ठराव केला आहे. केंद्र सरकारने सत्तेवर येताच मुंबई-बेंगलोर महामार्गाच्या दुतर्फा इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभा करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रची घोषणा करीत औद्योगीकीकरणास चालना देण्याचे सूतोवाच हे फक्त बोलण्यापुरतेच आहे की काय? या अन्यायकारक आदेशाला विरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे. अन्यथा यापुढे राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना सामान्य जनतेच्या भविष्याबाबत कोणतीही काळजी नसल्याचे स्पष्ट होणार असून याबाबतचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. - बंडू ढमाळ,

अध्यक्ष कृती समिती खंडाळा