शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ स्थापनेअभावी गाळप परवाने लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 17:50 IST

सातारा जिल्ह्यात सर्वच कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज आहेत. १ नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांना गाळप परवाने मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र मंत्री समितीच्या बैठकीअभावी कारखान्यांना गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. गाळप परवाने मिळण्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देसाखर कारखाने प्रतीक्षेत १५ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही

सागर गुजरसातारा : जिल्ह्यात सर्वच कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज आहेत. १ नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांना गाळप परवाने मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र मंत्री समितीच्या बैठकीअभावी कारखान्यांना गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. गाळप परवाने मिळण्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन होण्याची वाट पाहावी लागणार आहे.सहकारी व खासगी तत्त्वावर चालविल्या जाणाऱ्या कारखान्यांना पुणे साखर आयुक्तांमार्फत गाळप परवाने दिले जातात. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी परवान्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. सप्टेंबरअखेर परवान्यांसाठी कागदपत्रे सादर करण्याची मुदत होती. मंत्री समितीच्या बैठकीत कारखान्यांना काही अटी व नियम लागू करून गाळप परवाने दिले जातात. यंदा मात्र परवाने मिळण्याच्या वेळेत नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती झालेली नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्री समितीची बैठक होईल, या बैठकीत ठरल्यानंतर गाळप परवाने दिले जाणार आहेत.यंदा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर राज्यात विधानसभेची निवडणूक लागली. २ नोव्हेंबरपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होणे अपेक्षित होते; परंतु सत्ता स्थापनेची हुतूतू सुरू झाली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने त्यांना शिवसेनेच्या आधारावरच पुन्हा बहुमत मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह प्रमुख कॅबिनेट मंत्रिपदासाठी अडून बसली असल्याने मंत्रिमंडळ स्थापनेसाठी अजून किती कालावधी लागतोय, याची वाटच पाहावी लागणार आहे. या परिस्थितीत साखर हंगाम लांबण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, साखर आयुक्तांनी त्यांच्या पातळीवर साखर गाळप परवाने देण्याचा निर्णय घेतला तर कारखान्यांना वेळेत परवाने मिळून गाळपही सुरू होऊ शकते, यासाठी सर्वच कारखान्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसºया बाजूला मराठवाड्यातील कारखाने डिसेंबरमध्ये परवाने मिळावेत, यासाठी आग्रही असल्याचे समजते.प्रमुख कारखाने आणि त्यांचे मागील वर्षाचे ऊस गाळप

  1. कृष्णा सहकारी साखर कारखाना :  ११ लाख ५८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप; १४ लाख ९३ हजार ३६० पोती साखर निर्मिती
  2. किसन वीर कारखाना : ५ लाख ७७ हजार ९५० मेट्रिक टन ऊस गाळप; ६ लाख २ हजार ३७० पोती साखर निर्मिती
  3. बाळासाहेब देसाई कारखाना : १ लाख ९६ हजार ३१५ मेट्रिक टन ऊस गाळप; २ लाख ३० जार ५७५ पोती साखर निर्मिती
  4. प्रतापगड : १ लाख ७५ हजार ८१२ मेट्रिक टन ऊस गाळप; १ लाख ९२ हजार ७०० पोती साखर निर्मिती
  5. खंडाळा : २ लाख ३६ हजार १४३ मेट्रिक टन ऊस गाळप; २ लाख ३२ हजार ६५० पोती साखर निर्मितीचौकट...यंदा टनेज वाढणारयंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ऊन आणि पाऊस असे वातावरण राहिल्याने ऊस उत्पादनासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. याचा चांगला परिणाम होऊन उसाचे टनेज वाढणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.कोट....कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. ऊसशेतीचे मोठे क्षेत्र हे कृष्णा नदीकाठी होते. त्यात पाणी शिरल्याने यंदा ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले. मागील वर्षी १३ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा मात्र कारखान्याकडील नोंदीनुसार १२ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे.- एस. एन. दळवी, कार्यकारी संचालक, कृष्णा सहकारी साखर कारखाना, रेठरे बुद्रुक

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर