शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

मंत्रिमंडळ स्थापनेअभावी गाळप परवाने लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 17:50 IST

सातारा जिल्ह्यात सर्वच कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज आहेत. १ नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांना गाळप परवाने मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र मंत्री समितीच्या बैठकीअभावी कारखान्यांना गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. गाळप परवाने मिळण्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

ठळक मुद्देसाखर कारखाने प्रतीक्षेत १५ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही

सागर गुजरसातारा : जिल्ह्यात सर्वच कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज आहेत. १ नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांना गाळप परवाने मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र मंत्री समितीच्या बैठकीअभावी कारखान्यांना गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. गाळप परवाने मिळण्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन होण्याची वाट पाहावी लागणार आहे.सहकारी व खासगी तत्त्वावर चालविल्या जाणाऱ्या कारखान्यांना पुणे साखर आयुक्तांमार्फत गाळप परवाने दिले जातात. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी परवान्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. सप्टेंबरअखेर परवान्यांसाठी कागदपत्रे सादर करण्याची मुदत होती. मंत्री समितीच्या बैठकीत कारखान्यांना काही अटी व नियम लागू करून गाळप परवाने दिले जातात. यंदा मात्र परवाने मिळण्याच्या वेळेत नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती झालेली नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्री समितीची बैठक होईल, या बैठकीत ठरल्यानंतर गाळप परवाने दिले जाणार आहेत.यंदा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर राज्यात विधानसभेची निवडणूक लागली. २ नोव्हेंबरपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होणे अपेक्षित होते; परंतु सत्ता स्थापनेची हुतूतू सुरू झाली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने त्यांना शिवसेनेच्या आधारावरच पुन्हा बहुमत मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह प्रमुख कॅबिनेट मंत्रिपदासाठी अडून बसली असल्याने मंत्रिमंडळ स्थापनेसाठी अजून किती कालावधी लागतोय, याची वाटच पाहावी लागणार आहे. या परिस्थितीत साखर हंगाम लांबण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, साखर आयुक्तांनी त्यांच्या पातळीवर साखर गाळप परवाने देण्याचा निर्णय घेतला तर कारखान्यांना वेळेत परवाने मिळून गाळपही सुरू होऊ शकते, यासाठी सर्वच कारखान्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुसºया बाजूला मराठवाड्यातील कारखाने डिसेंबरमध्ये परवाने मिळावेत, यासाठी आग्रही असल्याचे समजते.प्रमुख कारखाने आणि त्यांचे मागील वर्षाचे ऊस गाळप

  1. कृष्णा सहकारी साखर कारखाना :  ११ लाख ५८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप; १४ लाख ९३ हजार ३६० पोती साखर निर्मिती
  2. किसन वीर कारखाना : ५ लाख ७७ हजार ९५० मेट्रिक टन ऊस गाळप; ६ लाख २ हजार ३७० पोती साखर निर्मिती
  3. बाळासाहेब देसाई कारखाना : १ लाख ९६ हजार ३१५ मेट्रिक टन ऊस गाळप; २ लाख ३० जार ५७५ पोती साखर निर्मिती
  4. प्रतापगड : १ लाख ७५ हजार ८१२ मेट्रिक टन ऊस गाळप; १ लाख ९२ हजार ७०० पोती साखर निर्मिती
  5. खंडाळा : २ लाख ३६ हजार १४३ मेट्रिक टन ऊस गाळप; २ लाख ३२ हजार ६५० पोती साखर निर्मितीचौकट...यंदा टनेज वाढणारयंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ऊन आणि पाऊस असे वातावरण राहिल्याने ऊस उत्पादनासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. याचा चांगला परिणाम होऊन उसाचे टनेज वाढणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.कोट....कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. ऊसशेतीचे मोठे क्षेत्र हे कृष्णा नदीकाठी होते. त्यात पाणी शिरल्याने यंदा ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले. मागील वर्षी १३ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा मात्र कारखान्याकडील नोंदीनुसार १२ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे.- एस. एन. दळवी, कार्यकारी संचालक, कृष्णा सहकारी साखर कारखाना, रेठरे बुद्रुक

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर