शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराची साथ पण प्रदूषणामुळे लोणंदची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:03 IST

लोणंदच्या विकासाला चालना मिळावी म्हणून लोणंदकरांनी मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती. ती साकार होण्यासाठी आपल्या जमिनीही कवडीमोल दराने दिल्या आणि स्वप्नांना आकार देऊन रोजगारही उपलब्ध झाला.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : शेतपिकांचाही श्वास लागलाय गुदमरूभूमिपुत्रांना रोजगाराची आशा फोल-लोणंदचा विकास की भकास

संतोष खरात ।लोणंद : लोणंदच्या विकासाला चालना मिळावी म्हणून लोणंदकरांनी मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती. ती साकार होण्यासाठी आपल्या जमिनीही कवडीमोल दराने दिल्या आणि स्वप्नांना आकार देऊन रोजगारही उपलब्ध झाला. मात्र, या औद्योगिकीकरणामुळे लोणंदचा विकास झालाय खरा; पण प्रदूषणामुळे स्थनिकांचाच नव्हे तर शेतपिकांचाही श्वास आता गुदमरायला लागलाय.

औद्योगिकीकरणाचा फायदा स्थानिकांना होत नाही, हेच या विकासाचे दुर्दैव म्हणावे लागेल. या औद्योगिकीकरणामुळे विकास झाला असला तरी लोणंदकर मात्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललेत. खंडाळा तालुक्यातील लोणंद म्हणजे कांद्याच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध गाव. औद्योगिक वसाहती स्थापन होण्यापूर्वी हा खंडाळा तालुका दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध होता. उजाड माळरान जमिनी आाणि पावसाचे दुर्भीक्ष असल्याने पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते.

वीर धरण अगदी शेजारी असूनही दुष्काळ हा शेतकऱ्यांच्या पाचविलाच पुजलेला. वाढती बेरोजगारी आणि शेतीला पाणी नसल्याने अनेकांनी आपल्या संसाराचा गाडा गावाकडून मुंबई, पुण्याकडे वळविला होता. या भागातील काही जागा मालकांचा या औद्योगिक वसाहतीस विरोधही होता. या विरोध करणाºयांना स्थानिक नेते व त्यांच्या सहकाºयांनी औद्योगिक वसाहतीबाबतचे महत्त्व पटवून दिले. औद्योगिक वसाहतीमुळे लोणंदच्या युवकांना रोजगार उपलब्ध होणार होता. या पडीक जमिनीला चांगला भावही मिळणार असल्याने विरोधक शांत झाले. लोणंदमध्ये महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाच्या नामफलक मोठ्या दिमाखात उभा राहून लोणंदकरांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र रोजगाराचे स्वप्न अर्पूण राहिले. 

लोणंदमधील जनतेने लोणंदमध्ये औद्योगिक वसाहतीबाबत काही स्वप्ने पाहिली होती. ज्या भावनेने व समर्पण वृत्तीने औद्यागिक वसाहत स्थापन होण्यासाठी प्रयत्न केले गेले व औद्योगिक वसाहत स्थापन होण्यासाठी ज्या लोकांनी त्याग केला त्यांना मात्र दुर्दैवाने अपेक्षित फळ मिळाले नाही.- अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, ज्येष्ठ नेतेज्या लोकांनी यासाठी आपल्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या. त्या भूमिपुत्रांना आता प्रदूषणामुळे जगणे असह्य झाले आहे. औद्योगिक वसाहती स्थापन झाल्यावर लोणंदचीच नव्हे तर तालुक्याची बेराजगारी कमी हाईल, अनेक भूमिपुत्रांना कायमचा रोजगार मिळेल ही भाबडी आशा फोल ठरली आहे.- प्रा. रघुनाथ शेळके, लोणंद

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण