शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

गावठाण वाढीच्या निर्णयामुळे फुटली कोंडी ! विधेयक मंजुरीचे फायदे : शासनाच्या योजनांनाही मिळेल गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:55 IST

सातारा : ग्रामपंचायतींचे गावठाण २०० मीटरने वाढविण्याचे विधेयक विधानसभेत संमत झाले आहे. या निर्णयामुळे मोठी कोंडी फुटली आहे.

ठळक मुद्देकाय होतील फायदे गायरानची जागा सरकारी प्रकल्पांसाठी मिळेलजमीन नसल्याने आवास योजना रखडल्या होत्या, त्यांना गती सार्वजनिक प्रकल्पांसाठी जागेचा प्रश्न राहणार नाही गावठाणाबाहेर घरे बांधून राहिलेल्यांना मोठा दिलासा

सातारा : ग्रामपंचायतींचे गावठाण २०० मीटरने वाढविण्याचे विधेयक विधानसभेत संमत झाले आहे. या निर्णयामुळे मोठी कोंडी फुटली आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अधिकाºयांना येणाºया अडचणी यामुळे सुटल्या आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना ग्रामीण भागासाठी राबविल्या जातात. त्यापैकी रमाई घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजना यांचे प्रभावी काम सातारा जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान, उपलब्ध गावठाणात जागा नसल्याने अनेकांचे घराचे स्वप्न अधुरे राहिले होते. शेती क्षेत्रावर नियमानुसार घरे बांधता येत नव्हती. त्यातून मोठी कोंडी निर्माण झाली होती. शासनाला इच्छा असूनही गरजूंना घरे देता येत नव्हते.

शासनाच्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी गायरानाची जागा घेण्यासाठी विविध खात्यांची एनओसी गरजेची होती. प्रस्ताव तयार करून तो विविध कार्यालयात फिरून काही कालावधीनंतर तो मंजूर होत असे, अथवा अनेकदा तो नामंजूर होऊनही प्रकल्पही रखडले जात होते.गावठाणात जागा उपलब्ध नसल्याने अनेकांनी गावठाणाबाहेर असणाºया कृषी क्षेत्रात घरे बांधली. लोकसंख्या वाढीमुळे लोकांना दुसरा पर्यायच उरला नव्हता. दरम्यान, संबंधितांच्या घरांची नोंदच ग्रामपंचायतींमध्ये होऊ शकली नव्हती. घरफळा घ्यायचा म्हटला तरी ते किचकट होते.

आता ही घरे अधिकृतपणे ग्रामपंचायतींच्या दफ्तरात नोंदली जाऊन पाणी पट्टी व घरफळा असे कर ग्रामपंचायतींना मिळणार आहेत. तसेच ग्रामपंचायतीही या वाढीव गावठाणात राहणाºया लोकांना सुविधा पुरवू शकणार आहे. या भागांमध्ये गटार, रस्ते, वीज अशा बाबी देण्यात आता कोणताही अडथळा राहणार नाही, तसेच ग्रामपंचायतींचे उत्पन्नही वाढायला मदत होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत होणार आहे. 

शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या करत असताना अनेक जागेची चिंता भासत होती. विशेषत: शासकीय योजनांतून गरिबांना देण्यात येणाºया घरांच्या बाबतीत जिथे जागांचा अभाव होता, त्यांना घरासाठी जागा उपलब्ध करून देणे आता शक्य होऊ शकेल.- डॉ. कैलास शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद