शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पाणी पेटू लागले; साताऱ्यातील शेतकरी कृष्णेत घेणार जलसमाधी

By नितीन काळेल | Updated: November 9, 2023 18:58 IST

लाभक्षेत्रात पाणी सोडण्याची मागणी : ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली बळीराजा आक्रमक 

सातारा : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून धरणातही पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करण्यात येत असून टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध भागातून धरणातील पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न पेटू लागला असून आता कृष्णा, उरमोडी, कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी १७ नोव्हेंबरला कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याचा इशाराही दिला आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयनेसह प्रमुख मोठी धरणे आहेत. यामध्ये कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी आदी धरणांचा समोवश आहे. यामधील कोयनेसह काही धरणांचे पाणी हे सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी सोडण्याची तरतूद आहे. मात्र, यावर्षी पाऊस कमी असल्याने या धरणांतच कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात टंचाई वाढणार असल्याने पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा लागणार आहे. तसेच याबाबत पालकमंत्र्यांनीही धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील शेतकरी पाणी सोडण्यासाठी आक्रमक झाले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्यातील असंख्य शेतकरी कृष्णा, उरमोडी, कण्हेर डाव्या कालव्यातून पाणी घेऊन शेती करतात. परंतु या हंगामात सातारा सिंचन विभागाकडून आमच्या हक्काचे पाणी दुष्काळ टंचाईच्या नावाखाली अधिकाराचा गैरवापर करून सोडले जात आहे. एकप्रकारे या पाण्याची चोरी होत आहे. त्यातच ही बाब पुराव्यानिशी सिद्ध केल्याने आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. तसेच लेखी आश्वासन देऊनही कृष्णा नदी पात्र आणि कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यास सुडभावनेने टाळाटाळ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत.तसेच कमी पावसाचे कारण सांगून जिहे-कठापूर योजनेचे व आमच्या हक्काचे पाणी नियमबाह्य पध्दतीने पळविले जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता बाधित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन १७ नोव्हेंबर रोजी सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर येथे कृष्णा नदीत जलसमाधी घेणार आहोत. तरी याची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी विनंती आहे.निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनभाऊ सांळुखे, वाहतूक संघ अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ यांच्यासह राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, राजेंद्र शेडगे, बजरंग कणसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदीWaterपाणी