शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

पाणी पेटू लागले; साताऱ्यातील शेतकरी कृष्णेत घेणार जलसमाधी

By नितीन काळेल | Updated: November 9, 2023 18:58 IST

लाभक्षेत्रात पाणी सोडण्याची मागणी : ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली बळीराजा आक्रमक 

सातारा : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून धरणातही पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करण्यात येत असून टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध भागातून धरणातील पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न पेटू लागला असून आता कृष्णा, उरमोडी, कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी १७ नोव्हेंबरला कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याचा इशाराही दिला आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयनेसह प्रमुख मोठी धरणे आहेत. यामध्ये कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी आदी धरणांचा समोवश आहे. यामधील कोयनेसह काही धरणांचे पाणी हे सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी सोडण्याची तरतूद आहे. मात्र, यावर्षी पाऊस कमी असल्याने या धरणांतच कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात टंचाई वाढणार असल्याने पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा लागणार आहे. तसेच याबाबत पालकमंत्र्यांनीही धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील शेतकरी पाणी सोडण्यासाठी आक्रमक झाले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्यातील असंख्य शेतकरी कृष्णा, उरमोडी, कण्हेर डाव्या कालव्यातून पाणी घेऊन शेती करतात. परंतु या हंगामात सातारा सिंचन विभागाकडून आमच्या हक्काचे पाणी दुष्काळ टंचाईच्या नावाखाली अधिकाराचा गैरवापर करून सोडले जात आहे. एकप्रकारे या पाण्याची चोरी होत आहे. त्यातच ही बाब पुराव्यानिशी सिद्ध केल्याने आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. तसेच लेखी आश्वासन देऊनही कृष्णा नदी पात्र आणि कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यास सुडभावनेने टाळाटाळ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत.तसेच कमी पावसाचे कारण सांगून जिहे-कठापूर योजनेचे व आमच्या हक्काचे पाणी नियमबाह्य पध्दतीने पळविले जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता बाधित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन १७ नोव्हेंबर रोजी सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर येथे कृष्णा नदीत जलसमाधी घेणार आहोत. तरी याची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी विनंती आहे.निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनभाऊ सांळुखे, वाहतूक संघ अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ यांच्यासह राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, राजेंद्र शेडगे, बजरंग कणसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदीWaterपाणी